शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
13
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
14
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
15
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
16
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
17
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
18
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
19
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
20
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर

मोदींना नेहमीच खलनायक ठरवणे अयोग्य; काँग्रेस नेत्यांचं मतं

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2019 3:19 PM

मोदींनी अशी कामं केली जी मागील काळात झाली नाही. त्यामुळे जनता त्यांचं कौतुक करत आहे. हे जोपर्यंत आपण समजून घेत नाही, तोपर्यंत या व्यक्तीविरुद्ध लढा देणे कठीण आहे.

नवी दिल्ली - एकापाठोपाठ दोन काँग्रेस नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना खलनायक ठरवून दाखवणे अयोग्य असल्याचे म्हटले आहे. काँग्रेसचे वरिष्ठ नेते जयराम रमेश आणि अभिषेक मनू सिंघवी यांनी या संदर्भात मत मांडून काँग्रेसला घरचा आहेर दिला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नेहमीच खलनायक ठरवून जगासमोर दाखवणे चुकीचे आहे. विरोधक त्यांना अयोग्य ठरवून त्यांची मदत करत असल्याचे मत अभिषेक मनू सिंघवी यांनी व्यक्त केले. याआधी माजी केंद्रीयमंत्री जयराम रमेश यांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामाचे महत्त्व कमी करणे योग्य नाही. यातून काहीही साध्य होणार नसल्याचे म्हटले होते.

सिंघवी यांनी रमेश यांच्या ट्विटचा हवाला देत म्हटले की, मी नेहमीच सांगत आलोय मोदींना खलनायक ठरविणे योग्य नाही. केवळ ते देशाचे पंतप्रधान आहे म्हणून नव्हे तर असं केल्याने मोदींना मदत होते. कामाचे मुल्यांकन व्यक्त केंद्रीत नव्हे तर मुद्दांवर असावे. मोदींची उज्ज्वला योजना चांगली असल्याचे यावेळी सिंघवी यांनी सांगितले.

याआधी जयराम रमेश म्हणाले होते की, मोदींनी २०१४ ते २०१७ या कालावधीत केलेल्या कामांमुळे ते पुन्हा सत्तेत परतले. मोदी सरकार पूर्णपणे नकारात्मक नक्कीच नाही, असं त्यांनी एका कार्यक्रमात म्हटले. मोदी सर्वसामान्यांना जोडणाऱ्या भाषेत बोलतात. मोदींनी अशी कामं केली जी मागील काळात झाली नाही. त्यामुळे जनता त्यांचं कौतुक करत आहे. हे जोपर्यंत आपण समजून घेत नाही, तोपर्यंत या व्यक्तीविरुद्ध लढा देणे कठीण आहे. तसेच कायम त्यांना खलनायक ठरवल्याने त्यांचा मुकाबला करणे अशक्य असल्याचे रमेश यांनी नमूद केले होते.