शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
2
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
3
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
4
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
5
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
6
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
7
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
8
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
9
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
10
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
11
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
12
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
13
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
14
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
15
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
16
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
17
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
18
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
19
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
20
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!

"राहुल गांधींच्या सुरक्षेला धोका"; भारत जोडो न्याय यात्रेबाबत खरगेंचं अमित शाह यांना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2024 11:38 IST

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना याबाबत पत्र लिहिलं आहे.

राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेदरम्यान आसाममध्ये झालेल्या घटनेबाबत काँग्रेसने राज्याचे मुख्यमंत्री हिमंता बिस्व सरमा यांच्या सरकारवर जोरदार हल्लाबोल सुरूच ठेवला आहे. य़ाच दरम्यान आता काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना याबाबत पत्र लिहिलं आहे. राहुल गांधींची सुरक्षा पुन्हा पुन्हा धोक्यात असल्याचं खरगे यांनी म्हटलं आहे. याबाबत त्यांनी आसाम पोलिसांवर आरोपही केले आहेत.

काँग्रेस अध्यक्षांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे की, मणिपूर ते मुंबई अशी 14 जानेवारीला सुरू झालेली भारत जोडो यात्रा आसाममध्ये पोहोचल्यानंतर असे काही प्रसंग आले की आसाम पोलिसांना राहुल गांधी यांच्या संरक्षण करण्यासाठी पुढे यायचं होतं, पण तसं झालं नाही. अरुणाचल प्रदेशातून काँग्रेसची यात्रा आसामच्या सोनितपूर जिल्ह्यात परतली तेव्हा तेथील स्थानिक अधीक्षक, जे सीएम सरमा यांचे बंधूही आहेत, त्यांनी काँग्रेसच्या यात्रेवर भाजपा कार्यकर्त्यांनी केलेला हल्ला प्रेक्षक म्हणून पाहिला, असा आरोप खरगे यांनी केला.

मल्लिकार्जुन खरगे असेही म्हणाले की, "भाजपा कार्यकर्त्यांनी काँग्रेस सोशल मीडिया टीम आणि पक्षाचे सरचिटणीस जयराम रमेश यांच्याशी झटापट केली आणि त्यांच्या गाडीवरही हल्ला केला. या लोकांनी भारत जोडो न्याय यात्रेच्या विरोधात घोषणाबाजी केली आणि वाहनांवरील यात्रेचे पोस्टरही फाडले."

"22 जानेवारी रोजी भाजपा कार्यकर्त्यांनी राहुल गांधींचा ताफा नागाव जिल्ह्यात अडवला, ज्यामुळे त्यांच्या सुरक्षेसाठी अत्यंत धोकादायक परिस्थिती निर्माण झाली. या सर्व धक्कादायक घटनांदरम्यान, जेव्हा-जेव्हा भाजपाचे कार्यकर्ते राहुल गांधींच्या जवळ येतात तेव्हा आसाम पोलीस प्रेक्षक म्हणून पाहत राहिले, त्यामुळे काही लोक राहुल गांधींची सुरक्षा तोडण्याचा प्रयत्न करत राहिले."

अमित शाह यांनी या प्रकरणात हस्तक्षेप करून यात्रा नियोजित प्रमाणे पार पाडावी, अशी मागणी खरगे यांनी केली. राहुल गांधी किंवा भारत जोडो न्याय यात्रेत सहभागी होणारा काँग्रेसचा कोणताही कार्यकर्ता जखमी झाल्यामुळे यात्रेत कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी केंद्रीय गृहमंत्र्यांचा हस्तक्षेप आवश्यक आहे, असे ते म्हणाले आहेत. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसMallikarjun Khargeमल्लिकार्जुन खर्गेAmit Shahअमित शाह