शहरं
Join us  
Trending Stories
1
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?
2
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 
3
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
4
"दिल्लीत ठाकरेंचा मान काय ते लक्षात आलं, आमच्यासोबत असताना ते..."; CM देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर बाण
5
'माझे मित्र पुतिन...', ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान PM मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला; भारत भेटीचे आमंत्रण दिले
6
"...नाहीतर भारताने अमेरिकेला गुड बाय म्हणावं"; शशी थरूर यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला
7
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
8
Nashik: पती-पत्नीने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी मारत आयुष्य संपवले, लग्नाला झाली होती ११ वर्ष
9
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
10
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
11
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
12
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
13
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
14
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
15
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
16
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
17
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
18
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
19
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
20
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी

"राहुल गांधींच्या सुरक्षेला धोका"; भारत जोडो न्याय यात्रेबाबत खरगेंचं अमित शाह यांना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2024 11:38 IST

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना याबाबत पत्र लिहिलं आहे.

राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेदरम्यान आसाममध्ये झालेल्या घटनेबाबत काँग्रेसने राज्याचे मुख्यमंत्री हिमंता बिस्व सरमा यांच्या सरकारवर जोरदार हल्लाबोल सुरूच ठेवला आहे. य़ाच दरम्यान आता काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना याबाबत पत्र लिहिलं आहे. राहुल गांधींची सुरक्षा पुन्हा पुन्हा धोक्यात असल्याचं खरगे यांनी म्हटलं आहे. याबाबत त्यांनी आसाम पोलिसांवर आरोपही केले आहेत.

काँग्रेस अध्यक्षांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे की, मणिपूर ते मुंबई अशी 14 जानेवारीला सुरू झालेली भारत जोडो यात्रा आसाममध्ये पोहोचल्यानंतर असे काही प्रसंग आले की आसाम पोलिसांना राहुल गांधी यांच्या संरक्षण करण्यासाठी पुढे यायचं होतं, पण तसं झालं नाही. अरुणाचल प्रदेशातून काँग्रेसची यात्रा आसामच्या सोनितपूर जिल्ह्यात परतली तेव्हा तेथील स्थानिक अधीक्षक, जे सीएम सरमा यांचे बंधूही आहेत, त्यांनी काँग्रेसच्या यात्रेवर भाजपा कार्यकर्त्यांनी केलेला हल्ला प्रेक्षक म्हणून पाहिला, असा आरोप खरगे यांनी केला.

मल्लिकार्जुन खरगे असेही म्हणाले की, "भाजपा कार्यकर्त्यांनी काँग्रेस सोशल मीडिया टीम आणि पक्षाचे सरचिटणीस जयराम रमेश यांच्याशी झटापट केली आणि त्यांच्या गाडीवरही हल्ला केला. या लोकांनी भारत जोडो न्याय यात्रेच्या विरोधात घोषणाबाजी केली आणि वाहनांवरील यात्रेचे पोस्टरही फाडले."

"22 जानेवारी रोजी भाजपा कार्यकर्त्यांनी राहुल गांधींचा ताफा नागाव जिल्ह्यात अडवला, ज्यामुळे त्यांच्या सुरक्षेसाठी अत्यंत धोकादायक परिस्थिती निर्माण झाली. या सर्व धक्कादायक घटनांदरम्यान, जेव्हा-जेव्हा भाजपाचे कार्यकर्ते राहुल गांधींच्या जवळ येतात तेव्हा आसाम पोलीस प्रेक्षक म्हणून पाहत राहिले, त्यामुळे काही लोक राहुल गांधींची सुरक्षा तोडण्याचा प्रयत्न करत राहिले."

अमित शाह यांनी या प्रकरणात हस्तक्षेप करून यात्रा नियोजित प्रमाणे पार पाडावी, अशी मागणी खरगे यांनी केली. राहुल गांधी किंवा भारत जोडो न्याय यात्रेत सहभागी होणारा काँग्रेसचा कोणताही कार्यकर्ता जखमी झाल्यामुळे यात्रेत कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी केंद्रीय गृहमंत्र्यांचा हस्तक्षेप आवश्यक आहे, असे ते म्हणाले आहेत. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसMallikarjun Khargeमल्लिकार्जुन खर्गेAmit Shahअमित शाह