शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

“इंडिया आघाडीला स्पष्ट बहुमत मिळेल, २ दिवसांत PM पदाचा निर्णय घेणार”; काँग्रेस नेत्याचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2024 10:02 IST

Congress Jairam Ramesh News: २००४ लोकसभा निवडणुकीप्रमाणेच यंदाही निकाल येतील. दोन दिवसांत पंतप्रधान कोण असेल, याची घोषणा केली जाईल, असे काँग्रेसने म्हटले आहे.

Congress Jairam Ramesh News: लोकसभा निवडणुकीचे पाच टप्प्यातील मतदान झाले असून, आता फक्त दोन टप्प्यांचे मतदान होणार आहे. तर ४ जून रोजी निकाल लागणार आहे. पाच टप्पे झाल्यानंतर विरोधक आणि सत्ताधाऱ्यांकडून अनेक दावे-प्रतिदावे केले जात आहेत. यातच आता इंडिया आघाडीला चांगला जनाधार मिळणार असून, स्पष्ट बहुमत मिळेल आणि त्यानंतर दोन दिवसांत पंतप्रधान कोण असेल, याचा निर्णय जाहीर केला जाईल, असा दावा करण्यात आला आहे. 

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महासचिव जयराम रमेश यांनी याबाबत दावा केला आहे. सर्वांत मोठ्या पक्षाचा नेते पंतप्रधान पदाचा मुख्य दावेदार असेल, २००४ प्रमाणे प्रक्रिया केली जाईल, असे जयराम रमेश यांनी म्हटले आहे. राहुल गांधी पंतप्रधानपदाचे दावेदार असतील का, असा प्रश्न जयराम रमेश यांना विचारण्यात आला होता. यावर पंतप्रधानपदाच्या उमेदवाराबाबत मतदान झाल्यानंतर निर्णय घेण्यात येईल, असे ते म्हणाले.

शॉर्टकट ही मोदींची कार्यशैली, आमची नाही

सन २००४ मध्ये काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांना बहुमत मिळाल्याच्या चार दिवसांत मनमोहन सिंग यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. यावेळी ४ दिवसही लागणार नाहीत. दोन दिवसांत पंतप्रधानांच्या नावाची घोषणा केली जाईल. खासदार एकत्रितपणे निवड करतील. ती एक प्रक्रिया आहे. आम्ही शॉर्टकटवर विश्वास ठेवत नाही. ही मोदींची कार्यशैली असू शकते, आम्ही अहंकारी नाही, निकाल येतील, स्पष्ट जनादेश असेल, निर्णायक जनादेश असेल. यानंतर काही तासांत पंतप्रधानांच्या नावाची घोषणा केली जाईल. सर्वात मोठ्या पक्षाचा उमेदवारच पंतप्रधान असेल. २००४ मध्ये जसे घडले होते तसे होईल, असे जयराम रमेश यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, २००४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकांची पुनरावृत्ती यंदा पुन्हा पाहायला मिळेल. भाजपाच्या एनडीएचे इंडिया शायनिंग फ्लॉप झाले होते. तसेच आताही दिसून येईल. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या काही टप्प्यातील मतदानानंतर अनेक ठिकाणचे चित्र स्पष्ट झाले आहे. त्यामुळे भाजपाच्या कामगिरीबाबत पंतप्रधान मोदी यांच्या मनात भीती निर्माण झाली आहे, अशी टीका जयराम रमेश यांनी केली.

 

 

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४congressकाँग्रेसINDIA Opposition Allianceइंडिया आघाडी