शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

"बांगलादेशमधील हिंदूंची नाही तर, गाझाची कांग्रेसला चिंता’’, हिंमता बिस्वा सरमा यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2024 21:09 IST

Himmata Biswa Sarma Criticize Congress: आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी बांगलादेशमधील हिंदूंच्या प्रश्नावरून काँग्रेसवर बोचरी टीका केली आहे. त्यांनी सांगितले की, काँग्रेस पक्ष हा बांगलादेशमधील हिंदूंपेक्षा गाझाबाबत अधिक चिंतीत आहे.

आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी बांगलादेशमधील हिंदूंच्या प्रश्नावरून काँग्रेसवर बोचरी टीका केली आहे. त्यांनी सांगितले की, काँग्रेस पक्ष हा बांगलादेशमधील हिंदूंपेक्षा गाझाबाबत अधिक चिंतीत आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या संघटनात्मक बैठकीमध्ये सहभागी होण्यासाठी रांची येथे आले होते.  

बांगलादेशमधील अशांततेबाबत चिंता व्यक्त करताना हिमंता बिस्वा सरमा म्हणाले की,  बांगलादेशमधील परिस्थिती खूपच वाईट आहे. त्या परिस्थितीचं वर्णन शब्दांत करता येणार नाही. केंद्र सरकार मुत्सद्देगिरीच्या माध्यमातून या मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करेल. तसेच परिस्थितीमध्ये हळूहळू सुधारणा करेल.  हिमंता बिस्वा सरमा यांनी बिरसा मुंडा विमानतळावर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना हे विधान केलं. 

यावेळी काँग्रेसला टीकेचं लक्ष्य करताना हिमंता बिस्वा सरमा म्हणाले की, काँग्रेसच्या नेत्यांनी गाझामधील अल्पसंख्याकांसाठी आंदोलन केलं. मात्र बांगलादेशमधील हिंदूंसाठी त्यांनी कितीवेळा आवाज उठवलाय? जगभरात समस्यांचा सामना करत असलेल्या मुस्लिमांसोबत आपण उभे आहोत, मात्र हिंदूंच्या सोबत नाही, हे काँग्रेसने दाखवून दिले आहे, अशी टीका सरमा यांनी केली. 

बांगलादेशमधून होत असलेल्या लोकांच्या पलायनाबाबत हिमंता बिस्वा सरमा म्हणाले की, केंद्र सरकारने कुणालाही सीमा पार करण्याची परवानगी दिलेली नाही.  या प्रश्वावर हा तोडगा असू शकत नाही. मुत्सद्देगिरीच्या माध्यमाचा वापर करणं आणि बांगलादेशमधील त्यांची सुरक्षा सुनिश्चित करणं, हाच यावरील उपाय आहे. बांगलादेशच्या सीमेला लागून असलेल्या पूर्ण पूर्व क्षेत्रात हिंदूंच्या संख्येत घट झाली आहे. आसाममध्ये हिंदू लोकसंख्या ९.२३ टक्क्यांनी घटली आहे. तर बांगलादेशमध्ये हिंदूंची संख्या १३.५ टक्क्यांनी घटली आहे.  

टॅग्स :BangladeshबांगलादेशBJPभाजपाcongressकाँग्रेस