शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईन ठप्प; केवळ सीएसएमटी ते वाशीपर्यंतच लोकल सुरु, ट्रान्स हार्बरवही परिणाम
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
4
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
5
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
6
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
7
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
8
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
9
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
10
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
11
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
12
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
13
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
14
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
15
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
16
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
17
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
18
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
19
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
20
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया

"सीमेवर लढणाऱ्या सैनिकांच्या हातात काठी देता, ती काय RSS ची शाखा आहे का?" 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2020 16:36 IST

"आपण आपल्या सैनिकांना निःशस्त्रपणे कसं काय पाठवलं? जर ते लढले असते आणि काही झालं असतं तर मी समजू शकतो. मात्र त्यांना लढण्याची संधीच मिळाली नाही."

भारत आणि चीन सैनिकांमध्ये गलवान खोऱ्यात संघर्ष झाला. भारतीय सीमेवरील गलवान खोऱ्यात चिनी सैनिकांच्या हल्ल्यात भारताचे 20 जवान शहीद झाले. काही वृत्तसंस्था व वृत्तवाहिन्यांनी भारताने या कारवाईला जशास तसे उत्तर देत चीनचे 43 सैनिक मारल्याचा दावाही केला आहे. मात्र चीनने अद्याप मृतांचा आकडा जाहीर केलेला नाही. याच दरम्यान काँग्रेसचे नेते हुसेन दलवाई यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. 

हुसेन दलवाई यांनी आपण सीमेवर लढणाऱ्या आपल्या सैनिकांना निःशस्त्रपणे कसं काय पाठवलं? असा सवाल उपस्थित केला आहे. तसेच 'सैनिक जर लढले असते व काही झालं असतं तर मी समजू शकतो. मात्र त्यांना लढण्याची संधीच मिळाली नाही. तुम्ही त्यांच्या हातात काठी देता, ती काय RSS ची शाखा आहे का? मग तिथे सैनिकांना का पाठवता, RSS च्या लोकांना तिथे पाठवा, काठी घेऊन ते सीमेची सुरक्षा करतील' असं म्हणत टोला लगावला आहे. 

'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे, ती चांगली गोष्ट आहे. मात्र ही बैठक फार उशीरा होत आहे. आधीच व्हायला हवी होती. घुसखोरी किती प्रमाणात झाली याची पूर्णपणे माहिती मिळणे आवश्यक आहे. यामध्ये देशाला विश्वासात घेणं देखील अत्यंत गरजेचं आहे. ते मोठ्याप्रमाणावर आतमध्ये आले आहेत. दुःखद म्हणजे आपले 20 जवान शहीद झाले आहेत आणि ते निःशस्त्र गेले होते. चीनचे सैनिक खिळे व लोखंड बसवलेल्या काठ्या घेवून आले होते. त्या काठ्यांनी त्यांनी मारहाण केली. त्यांचा एकही सैनिक मेला नाही. आपले जवान शहीद झाले तर अनेकजण जखमी झाले. जखमी झालेले आता लवकरात लवकर सीमेवर पुन्हा जातील असं सांगितलं जात आहे. मात्र मला तसं वाटत नाही. मोठ्याप्रमाणावर नुकसान झालं आहे. आपण आपल्या सैनिकांना निःशस्त्रपणे कसं काय पाठवलं? जर ते लढले असते आणि काही झालं असतं तर मी समजू शकतो. मात्र त्यांना लढण्याची संधीच मिळाली नाही. तुम्ही त्यांच्या हातात काठी देता, ती काय RSS ची शाखा आहे का? मग तिथे सैनिकांना का पाठवतात, RSS च्या लोकांना काठी घेऊन पाठवा, ते सीमेची सुरक्षा करतील' असं हुसेन दलवाई यांनी म्हटलं आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

वरात, विधीसह रंगला विवाहसोहळा पण लग्नात नवरी ऐवजी होता पुतळा... एका लग्नाची गोष्ट

Flipkart Big Saving Days : खूशखबर! फ्लिपकार्टवर धमाकेदार सेल, स्मार्टफोन्सवर मिळणार बंपर सूट

कोरोना संकटात राम कदम यांचा दहीहंडीबाबत महत्त्वाचा निर्णय

हत्या की आत्महत्या? पुण्यापाठोपाठ 'या' शहरात 6 जणांचे मृतदेह आढळल्याने खळबळ

खतरनाक! डोंगराच्या टोकावर उभं राहून त्याने मारली बॅक फ्लिप अन्...; Video जोरदार व्हायरल

CoronaVirus News : धडकी भरवणारी आकडेवारी! देशात कोरोनाच्या रुग्णसंख्येने गाठला नवा उच्चांक

"पंडित नेहरूंना दोष देणार्‍यांनी आत्मपरीक्षण केले तरी 20 जवानांचे बलिदान सार्थकी लागेल!"

ऑस्ट्रेलियावर मोठा सायबर हल्ला; सरकारसह खासगी क्षेत्रालाही फटका

 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघIndiaभारतchinaचीनcongressकाँग्रेसIndian Armyभारतीय जवानHussein Dalwaiहुसेन दलवाई