शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
6
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
7
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
8
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
9
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
10
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
11
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
12
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
13
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
14
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
15
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
16
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
17
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
18
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
19
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
20
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."

अहंकारी आणि सत्तांध मोदी सरकारपुढे काँग्रेस झुकला नाही, झुकणार नाही! - सोनिया गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2018 15:52 IST

देशातील नागरिकांच्या मनात काँग्रेसबद्दल आजही प्रेम आहे आणि त्या जोरावर पक्ष पुन्हा भरारी घेईल - सोनिया गांधी

नवी दिल्लीः 'सब का साथ, सब का विकास', 'न खाऊंगा न खाने दुंगा' ही नरेंद्र मोदी यांनी केलेली घोषणाबाजी निव्वळ ड्रामेबाजी होती, सत्ता मिळवण्यासाठी - खुर्ची मिळवण्यासाठी केलेली चाल होती, हे आता जनतेच्या लक्षात आलं आहे. गेल्या चार वर्षांत त्यांनी काँग्रेसला संपवण्यासाठी साम-दाम-दंड-भेद सगळ्याचा वापर केला. पण सत्तेच्या अहंकारापुढे काँग्रेस पक्ष कधी झुकला नाही आणि झुकणारही नाही, असा निर्धार काँग्रेसच्या माजी अध्यक्ष आणि यूपीएच्या नेत्या सोनिया गांधी यांनी आज काँग्रेसच्या महाअधिवेशनात व्यक्त केला. 

देशातील नागरिकांच्या मनात काँग्रेसबद्दल आजही प्रेम आहे आणि त्या जोरावर पक्ष पुन्हा भरारी घेईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. अत्यंत आव्हानात्मक काळात राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली असून व्यक्तिगत आशा-अपेक्षा, अहंकार दूर सारून सर्वांनी त्यांना सहकार्य करावं, असं आवाहनही सोनिया गांधींनी केलं. 

सोनिया गांधी म्हणाल्या, 

>> काँग्रेस हा केवळ राजकीय पक्ष नाही, तर तो एक विचार आहेत. त्यात भारतीय संस्कृतीची प्रतिमा दिसते. काँग्रेसशी आपलं नातं अधिक दृढ करण्याची ही वेळ आहे. 

>> देशाची दिशा, धोरण काँग्रेसने ठरवणं गरजेचं आहे, देशवासीयांच्या आशा-आकांक्षा जाणून काँग्रेसनं देशाच्या राजकारणाचा सूत्रधार झालं पाहिजे.  >> ४० वर्षांपूर्वी इंदिरा गांधी यांच्या दणदणीत विजयाने देशाच्या राजकारणाचं चित्र पालटून टाकलं होतं. काँग्रेस शक्तिशाली पक्ष ठरला होता. तशीच कामगिरी आपण येत्या काळात करू आणि राजकारणाला नवी दिशा मिळेल. 

>> जे लोक देशाच्या राजकारणातून काँग्रेसचं अस्तित्वच मिटवू इच्छित होते, त्यांना लोकांच्या मनात काँग्रेसबद्दल किती प्रेम आहे, याची जाणीव नाही. 

>> मला राजकारणात कधीच यायचं नव्हतं, पण परिस्थितीमुळे यावं लागलं. त्यानंतर, तुमच्या शक्तीच्या जोरावर आपण मोठं यश मिळवलं. डॉ. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली असाध्य ते साध्य करून दाखवलं. 

>> कोट्यवधी जनतेच्या जीवनात बदल घडवणाऱ्या योजना आपण राबवल्या. पण आज या योजनांकडे मोदी सरकार दुर्लक्ष करतंय, त्या कमकुवत करतंय.  

>> गेल्या चार वर्षांत अहंकारी आणि सत्तांध सरकारने काँग्रेसला संपण्यासाठी खूप कारस्थानं केली. पण आम्हीच त्यांचा खोटेपणा आणि भ्रष्टाराच पुराव्यांसह जनतेपुढे उघड केला आहे. 

>> ज्या राज्यात काँग्रेसचं सरकार नाही, तिथे भाजपाचे अत्याचार सहन करूनही पक्षासाठी झटणाऱ्या कार्यकर्त्यांचं अभिनंदन आणि कौतुक. 

टॅग्स :Sonia Gandhiसोनिया गांधीcongressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी