शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

अहंकारी आणि सत्तांध मोदी सरकारपुढे काँग्रेस झुकला नाही, झुकणार नाही! - सोनिया गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2018 15:52 IST

देशातील नागरिकांच्या मनात काँग्रेसबद्दल आजही प्रेम आहे आणि त्या जोरावर पक्ष पुन्हा भरारी घेईल - सोनिया गांधी

नवी दिल्लीः 'सब का साथ, सब का विकास', 'न खाऊंगा न खाने दुंगा' ही नरेंद्र मोदी यांनी केलेली घोषणाबाजी निव्वळ ड्रामेबाजी होती, सत्ता मिळवण्यासाठी - खुर्ची मिळवण्यासाठी केलेली चाल होती, हे आता जनतेच्या लक्षात आलं आहे. गेल्या चार वर्षांत त्यांनी काँग्रेसला संपवण्यासाठी साम-दाम-दंड-भेद सगळ्याचा वापर केला. पण सत्तेच्या अहंकारापुढे काँग्रेस पक्ष कधी झुकला नाही आणि झुकणारही नाही, असा निर्धार काँग्रेसच्या माजी अध्यक्ष आणि यूपीएच्या नेत्या सोनिया गांधी यांनी आज काँग्रेसच्या महाअधिवेशनात व्यक्त केला. 

देशातील नागरिकांच्या मनात काँग्रेसबद्दल आजही प्रेम आहे आणि त्या जोरावर पक्ष पुन्हा भरारी घेईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. अत्यंत आव्हानात्मक काळात राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली असून व्यक्तिगत आशा-अपेक्षा, अहंकार दूर सारून सर्वांनी त्यांना सहकार्य करावं, असं आवाहनही सोनिया गांधींनी केलं. 

सोनिया गांधी म्हणाल्या, 

>> काँग्रेस हा केवळ राजकीय पक्ष नाही, तर तो एक विचार आहेत. त्यात भारतीय संस्कृतीची प्रतिमा दिसते. काँग्रेसशी आपलं नातं अधिक दृढ करण्याची ही वेळ आहे. 

>> देशाची दिशा, धोरण काँग्रेसने ठरवणं गरजेचं आहे, देशवासीयांच्या आशा-आकांक्षा जाणून काँग्रेसनं देशाच्या राजकारणाचा सूत्रधार झालं पाहिजे.  >> ४० वर्षांपूर्वी इंदिरा गांधी यांच्या दणदणीत विजयाने देशाच्या राजकारणाचं चित्र पालटून टाकलं होतं. काँग्रेस शक्तिशाली पक्ष ठरला होता. तशीच कामगिरी आपण येत्या काळात करू आणि राजकारणाला नवी दिशा मिळेल. 

>> जे लोक देशाच्या राजकारणातून काँग्रेसचं अस्तित्वच मिटवू इच्छित होते, त्यांना लोकांच्या मनात काँग्रेसबद्दल किती प्रेम आहे, याची जाणीव नाही. 

>> मला राजकारणात कधीच यायचं नव्हतं, पण परिस्थितीमुळे यावं लागलं. त्यानंतर, तुमच्या शक्तीच्या जोरावर आपण मोठं यश मिळवलं. डॉ. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली असाध्य ते साध्य करून दाखवलं. 

>> कोट्यवधी जनतेच्या जीवनात बदल घडवणाऱ्या योजना आपण राबवल्या. पण आज या योजनांकडे मोदी सरकार दुर्लक्ष करतंय, त्या कमकुवत करतंय.  

>> गेल्या चार वर्षांत अहंकारी आणि सत्तांध सरकारने काँग्रेसला संपण्यासाठी खूप कारस्थानं केली. पण आम्हीच त्यांचा खोटेपणा आणि भ्रष्टाराच पुराव्यांसह जनतेपुढे उघड केला आहे. 

>> ज्या राज्यात काँग्रेसचं सरकार नाही, तिथे भाजपाचे अत्याचार सहन करूनही पक्षासाठी झटणाऱ्या कार्यकर्त्यांचं अभिनंदन आणि कौतुक. 

टॅग्स :Sonia Gandhiसोनिया गांधीcongressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी