शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
2
ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी
3
नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
4
सुरक्षा दलांची मोठी कारवाई; ओडिशातील गुम्मा जंगलात 4 माओवाद्यांचा खात्मा
5
खळबळजनक रिपोर्ट! रशिया, भारत आणि फिलीपिन्स...कोणकोणत्या देशांच्या जमिनीवर चीनची करडी नजर?
6
सीक्रेट सांतानं कर्मचाऱ्याला दिलेलं गिफ्ट पाहून तरुणी भलत्याच खूश झाल्या, असं काय मिळालं?
7
"कांगारूंना कसं हरवायचं? ते शास्त्र फक्त शास्त्रींकडेच! इंग्लंडने त्यांनाच कोच करावं"
8
Travel : जगातील एक 'असे' ठिकाण, जिथे वेळेचे कोणतेच बंधन नाही! घड्याळ तर कुणी वापरतच नाही
9
Vinayak Pande and Yatin Wagh: उद्धव ठाकरेंचा आदेश, विनायक पांडे- यतिन वाघ यांची पक्षातून हकालपट्टी; राऊतांची पोस्ट!
10
'खेलरत्न'साठी हार्दिक! दिव्या देशमुखसह २४ खेळाडू अर्जुन पुरस्कारासाठी नामांकित; इथं पाहा संपूर्ण यादी
11
ज्यांनी घेतलीय त्यांनी मागच्या सीटवर बसू नका, या देशाने घातली मारुती सुझुकीच्या Fronx विक्रीवर बंदी...
12
Astrology: २०२६ आधी 'या' ३ गोष्टी केल्याने होईल मोठा लाभ; ज्योतिषांनी दिला नवीन वर्षाचा कानमंत्र!
13
"युतीमुळे तुम्हाला फरक पडत नाही, तर तोंडाची डबडी का वाजवताय?", संजय राऊत भाजपा नेत्यांवर भडकले
14
१७ वर्षानंतर तारिक रहमान बांगलादेशात परतले; राजकीय हालचालींना वेग, भारतासाठी फायद्याचे की तोट्याचे
15
"कोणालाच सत्य माहित नव्हतं...", ९ वर्षांनंतर शिल्पा शिंदेने 'भाबीजी घर पर हैं' सोडण्यामागचं सांगितलं कारण
16
एका वर्षात 'ग्रॅच्युइटी' मिळण्याचा नियम कागदावरच; नव्या लेबर कोडची प्रतीक्षा लांबली! का होतोय उशीर?
17
जीएसटी कमी होऊन, दोन महिनेही झाले नाहीत तोच कारच्या किंमती महागणार; मारुतीपासून महिंद्रापर्यंत सर्वच कंपन्या वाढवणार किमती
18
नांदेडमध्ये काळजाचा थरकाप! आई-वडील घरात मृतावस्थेत, तर मुलांनी रेल्वेखाली संपवलं आयुष्य
19
संतापजनक घटना! नातीनं विरोधात जाऊन लग्न केलं, संतापलेल्या आजीने नातीच्या ४० दिवसांच्या बाळाला संपवलं
20
जिथे कोंडी केली, तेच ठिकाण ‘गेम चेंजर’ ठरणार; ठाकूरांना खिंडीत गाठण्यासाठी भाजपाची रणनीती!
Daily Top 2Weekly Top 5

देशाच्या अर्थव्यवस्थेला भूसुरुंगावर बसवून गेले होते काँग्रेस सरकार, नरेंद्र मोदींची घणाघाती टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2018 17:57 IST

काँग्रेस सरकार देशाच्या अर्थव्यवस्थेला भूसुरुंगावर बसवून गेले होते, असा घणाघाती आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला

नवी दिल्ली  - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बँकांच्या थकीत कर्जांसाठी काँग्रेसच्या नेतृत्वाखालील सरकारला दोषी ठरवतानाच आपल्या सरकारने थकीत कर्जदारांना एक रुपयाचेही कर्ज दिले नसल्याचा दावा केला आहे. तसेच काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीए सरकारच्या आर्थिक धोरणांवर टीका करताना हे सरकार देशाच्या अर्थव्यवस्थेला भूसुरुंगावर बसवून गेले होते, असा घणाघाती आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक (आयपीपीबी) चे उदघाटन केले. यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना मोदींनी देशातील बँकिंग प्रणालीच्या सद्यस्थितीचा लेखाजोखा मांडतानाच काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. ते म्हणाले, " थकबाकीदारांकडून पै पै वसूल करण्याचे काम सरकार करत आहे. यूपीए सरकारच्या काळात काही नामदारांना एका फोनवर सहा वर्षांमध्ये लाखो कोटी रुपयांचे कर्जवाटप करण्यात आले. जेव्हा आम्ही सरकार स्थापन केले. त्यानंतर काही दिवसांनी काँग्रेस या देशाची अर्थव्यवस्था भूसुरुंगावर ठेवून गेली आहे, असे आम्हाला वाटू लागले." 

 

यावेळी मोदींनी बँकांमधून करण्यात आलेल्या बेसुमार कर्जवाटपावरही बोट ठेवले. ते म्हणाले,  स्वातंत्र्यानंतर 2008 पर्यंत देशातील सर्व बँकांनी एकूण 18 लाख कोटींचे कर्जवाटप केले होते. मात्र 2008 पासून पुढच्या सहा वर्षांमध्ये हा आकडा वाढून 52 लाख कोटींपर्यंत पोहोचला. कर्ज घेऊन जा, नंतर मोदी येईल आणि रडारड करेल, असेच धोरण सुरू होते. म्हणजेच स्वातंत्र्यानंतर जितके कर्ज दिले गेले, त्याच्या दुप्पट कर्जवाटप गेल्या सरकारच्या सहा वर्षांच्या कार्यकाळात दिले गेले,"  मात्र थकीत कर्जवसुलीसाठी सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत. थकबाकीदारांकडून पै पै वसूल केली जाईल. तसेच आमच्या सरकारच्या काळात अशा थकीत कर्जदारांना एक रुपयाचेही कर्ज दिले गेलेले नाही, असा दावाही मोदींनी केला.

 यावेळी पोस्टल बँकेच्या सुविधेचेही मोदींनी कौतुक केले. इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेच्या सुविधेमधून लोकांपर्यंत पोहोचणारे टपाल सेवक हे केवळ डिजिटल बँकरच नव्हे तर सर्वसामान्यांसाठी डिजिटल टिचर ठरतील, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. तसेच गेल्या तिमाहीत देशाच्या विकास दरात झालेल्या वाढीबाबतही त्यांनी समाधान व्यक्त केले. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीIndiaभारतEconomyअर्थव्यवस्थाcongressकाँग्रेसPoliticsराजकारण