शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

देशाच्या अर्थव्यवस्थेला भूसुरुंगावर बसवून गेले होते काँग्रेस सरकार, नरेंद्र मोदींची घणाघाती टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2018 17:57 IST

काँग्रेस सरकार देशाच्या अर्थव्यवस्थेला भूसुरुंगावर बसवून गेले होते, असा घणाघाती आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला

नवी दिल्ली  - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बँकांच्या थकीत कर्जांसाठी काँग्रेसच्या नेतृत्वाखालील सरकारला दोषी ठरवतानाच आपल्या सरकारने थकीत कर्जदारांना एक रुपयाचेही कर्ज दिले नसल्याचा दावा केला आहे. तसेच काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीए सरकारच्या आर्थिक धोरणांवर टीका करताना हे सरकार देशाच्या अर्थव्यवस्थेला भूसुरुंगावर बसवून गेले होते, असा घणाघाती आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक (आयपीपीबी) चे उदघाटन केले. यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना मोदींनी देशातील बँकिंग प्रणालीच्या सद्यस्थितीचा लेखाजोखा मांडतानाच काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. ते म्हणाले, " थकबाकीदारांकडून पै पै वसूल करण्याचे काम सरकार करत आहे. यूपीए सरकारच्या काळात काही नामदारांना एका फोनवर सहा वर्षांमध्ये लाखो कोटी रुपयांचे कर्जवाटप करण्यात आले. जेव्हा आम्ही सरकार स्थापन केले. त्यानंतर काही दिवसांनी काँग्रेस या देशाची अर्थव्यवस्था भूसुरुंगावर ठेवून गेली आहे, असे आम्हाला वाटू लागले." 

 

यावेळी मोदींनी बँकांमधून करण्यात आलेल्या बेसुमार कर्जवाटपावरही बोट ठेवले. ते म्हणाले,  स्वातंत्र्यानंतर 2008 पर्यंत देशातील सर्व बँकांनी एकूण 18 लाख कोटींचे कर्जवाटप केले होते. मात्र 2008 पासून पुढच्या सहा वर्षांमध्ये हा आकडा वाढून 52 लाख कोटींपर्यंत पोहोचला. कर्ज घेऊन जा, नंतर मोदी येईल आणि रडारड करेल, असेच धोरण सुरू होते. म्हणजेच स्वातंत्र्यानंतर जितके कर्ज दिले गेले, त्याच्या दुप्पट कर्जवाटप गेल्या सरकारच्या सहा वर्षांच्या कार्यकाळात दिले गेले,"  मात्र थकीत कर्जवसुलीसाठी सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत. थकबाकीदारांकडून पै पै वसूल केली जाईल. तसेच आमच्या सरकारच्या काळात अशा थकीत कर्जदारांना एक रुपयाचेही कर्ज दिले गेलेले नाही, असा दावाही मोदींनी केला.

 यावेळी पोस्टल बँकेच्या सुविधेचेही मोदींनी कौतुक केले. इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेच्या सुविधेमधून लोकांपर्यंत पोहोचणारे टपाल सेवक हे केवळ डिजिटल बँकरच नव्हे तर सर्वसामान्यांसाठी डिजिटल टिचर ठरतील, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. तसेच गेल्या तिमाहीत देशाच्या विकास दरात झालेल्या वाढीबाबतही त्यांनी समाधान व्यक्त केले. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीIndiaभारतEconomyअर्थव्यवस्थाcongressकाँग्रेसPoliticsराजकारण