शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

"काँग्रेसनं मुस्लिमांना 'कोटा' देऊन आरक्षण कमकुवत केले, 'त्या' आश्वासनांवरही मोदी सरकार ठाम"; शाह यांचं मोठं विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2024 11:51 IST

"हरल्यानंतरही ते अहंकारी झाले आहेत. काँग्रेसने हे लक्षात ठेवायला हवे की, ते 2024 च्या लोकसभा निवडणुकीत पराभूत झाले आहेत आणि भाजपने जेवढ्या जागा जिंकल्या आहेत, तेवढ्या विरोधी पक्षाला गेल्या तीन निवडणुकीतही जिंकता आलेल्या नाहीत..."

देशातील विद्यमान आरक्षण व्यवस्थेसोबत कुठल्याही प्रकारे छेडछाड केली जाणार नाही. यावर नरेंद्र मोदी सरकार ठाम आहे. मात्र, काँग्रेसने मुस्लिमांना अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागास प्रवर्गांचा कोटा देऊन आरक्षण व्यवस्था कमकुवत करण्याचे काम केले, असा आरोप केंद्रिय गृहमंत्री अमित शाह यांनी केला आहे. 

लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधत शाह पुढे म्हणाले, "हरल्यानंतरही ते अहंकारी झाले आहेत. काँग्रेसने हे लक्षात ठेवायला हवे की, ते 2024 च्या लोकसभा निवडणुकीत पराभूत झाले आहेत आणि भाजपने जेवढ्या जागा जिंकल्या आहेत, तेवढ्या विरोधी पक्षाला गेल्या तीन निवडणुकीतही जिंकता आलेल्या नाहीत." शाह 'आज तक'च्या एका कार्यक्रमात बोलत होते.

शाह म्हणाले, 240 जागांसह विद्यमान मोदी सरकार आणि गेल्यावेळचे 303 जागा असलेले सरकार यांच्यात कुठलाही फरक नाही. कारण हे सरकार अजूनही, 'एक देश, एक निवडणूक', "असंवैधानिक" वक्फ कायद्यातील दुरुस्ती, राष्ट्रीय सुरक्षा मजबूत करणे आणि भारताला जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनवण्याच्या. आपल्या आश्वासनांवर ठाम आहे.

नक्षलवादासंदर्भात बोलताना शाह म्हणाले, "भारत 31 मार्च 2026 पर्यंत नक्सल समस्येतून मुक्त होईल, अशा माझा ठाम विश्वास आहे. त्या दिशेने सुरक्षा दल काम करत आहेत. काही जिल्हे वगळता देशातील बहुतांश भागात नक्षलवादी हिंसाचार संपुष्टात आला आहे."

जम्मू-काश्मीरमधील परिस्थितीसंदर्भात विचारले असता शाह म्हणाले, "केंद्रशासित प्रदेशात हिंसाचारात लक्षणीय घट झाली आहे. तेथे लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाही शांततेत पार पडल्या आहेत. यावेळी, जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा बहाल करण्याच्या शक्यतेसंदर्भात बोलताना शाह म्हणाले, हे योग्य वेळी केले जाईल, मात्र, जाहीरपणे कोणतीही टाइमलाइन देऊ शकत नाहीत." 

टॅग्स :Amit Shahअमित शाहcongressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी