शहरं
Join us  
Trending Stories
1
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
2
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
3
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
4
Amit Shah : "दीदींनी 5 वर्षे प्रचार केला तरी..."; अमित शाह यांनी ममता बॅनर्जींना दिलं जाहीर आव्हान
5
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
6
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
7
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
8
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
9
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
10
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
11
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
12
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
13
"असं असेल तर MS Dhoni ने खेळूच नये..."; Harbhajan Singh भडकला, CSK vs PBKS सामन्यानंतर व्यक्त केला संताप
14
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
15
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
16
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
17
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
18
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
19
माता न तू वैरिणी; नवऱ्यासोबत भांडणाचा राग, चिमुकल्याला मगरींनी भरलेल्या नदीत फेकले...
20
Eknath Shinde : धर्मवीर चित्रपटात राजन विचारेंबाबत दाखवलेलं सर्व खोटं, विचारे नकली शिष्य; एकनाथ शिंदेंनी सगळंच सांगितलं

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर काँग्रेसची संसदेवर धडक

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2018 4:13 AM

उद्योगपतींचे कोट्यवधींचे कर्ज माफ करणारे मोदी सरकार शेतकरी विरोधी असल्याचाआरोप करीत कॉँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मोदी विरोधी घोषणा देत संसद परिसर दणाणून सोडला.

नवी दिल्ली : उद्योगपतींचे कोट्यवधींचे कर्ज माफ करणारे मोदी सरकार शेतकरी विरोधी असल्याचाआरोप करीत कॉँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मोदी विरोधी घोषणा देत संसद परिसर दणाणून सोडला. मंगळवारी संसद मार्गावर अखिल भारतीय किसान शेतमजूर काँग्रेसतर्फे हे आंदोलन करण्यात आले. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, राजस्थान, हरियाणा, गुजरात, तामिळनाडू सह इतर राज्यातील शेतकरी ‘जबाब दो, हिसाब दो’ची घोषणा बुलंद करीत मोठ्या संख्येने सहभागी झाले.अखिल भारतीय किसान शेतमजूर सेलचे राष्ट्रीय अध्यक्ष नाना पटोले, काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते रणदीप सुरजेवाला, गुजरातचे प्रभारी राजीव सातव, उत्तर प्रदेशचे प्रदेशाध्यक्ष राज बब्बर, उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री हरिष रावत, अनुसूचित जाती सेलचे राष्टÑीय अध्यक्ष डॉ. नितीन राऊत तसेच इतर नेते उपस्थित होते. दुपारी अडीचच्या सुमारास शेतकºयांनी पटोलेंच्या नेतृत्वात संसदेला घेराव घालण्यासाठी आंदोलन स्थळावरुन मार्गक्रमण केले. आंदोलकांना रोखण्यासाठी त्यामुळे पोलिसांचा प्रचंड बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पटोलेंनी काही आंदोलकांसह बॅरेकेडवर चढून घोषणाबाजी के ली. पोलिसांनी नाना पटोलेंसह काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. मोठ्या संख्येने शेतकºयांना एकत्रित करुन वातवरण निर्मिती करण्यात काँग्रेस यशस्वी झाल्याची चर्चा होती.>मोदी हटाओ -सातवशेतकरी क र्जमाफीसंबधी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी प्रश्न विचारतात तेव्हा शेतकरी कर्जमाफी हा आमचा अजेंडा नसल्याचे उत्तर केंद्र सरकार देते. अनिल अंबानी यांच्या सोबत पॅरिसमध्ये मोदी भेट घेतात. सत्तेवर येतातच पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर यांनी शेतकºयांना कर्जमाफी दिली. राहुल गांधींच्या सांगण्यावरुन कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरमय्यांनी कर्जमाफी दिली. गेल्या वर्षात महाराष्ट्राने शेतकºयांचे कर्जमाफ केले. प्रत्यक्षात वर्ष उलटून केवळ ५ टक्के शेतकºयांनाच कर्जमाफी मिळाल्याचा दावा खासदार राजीव सातव यांनी केला.

टॅग्स :congressकाँग्रेस