शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

७० वर्ष ज्यांनी अन्याय केला, ते आता 'न्याय' करणार का? - नरेंद्र मोदी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2019 18:07 IST

जवाहरलाल नेहरुंपासून इंदिरा गांधी आणि मनमोहन सरकारपर्यंत देशातील जनतेवर काँग्रेसने अन्याय केला ते गरिबांना न्याय काय देणार? अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर केली आहे

नवी दिल्ली - जवाहरलाल नेहरुंपासून इंदिरा गांधी आणि मनमोहन सरकारपर्यंत देशातील जनतेवर काँग्रेसने अन्याय केला ते गरिबांना न्याय काय देणार? अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदींनीकाँग्रेसवर केली आहे. देशातील या नामदार कुटुंबाने गरिबी हटावचा नारा देऊन गरिबांच्या मतांवर डल्ला मारण्याचा प्रयत्न केला असा टोला नरेंद्र मोदी यांनी गांधी कुटुंबाचं नाव न घेता लगावला आहे. 

देशाची निवडणूक ही लोकांवर केंद्रित झाली आहे. पाच वर्षाने देशाने इतकी प्रगती केली आहे की आता लोकांनी विचार करायचा आहे. देशाला पुढे घेऊन जायचं आहे की मागे परत आणायचं आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीला सामोरं जाताना देशातील लोकांपुढे आत्मविश्वास आहे. २०१४ ते २०१९ हा काळ देशातील जनतेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी होता तर २०१९ नंतरचा काळ भारताला जगात सर्वात पुढे नेण्याचा आहे असा विश्वास नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. एका हिंदी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत मोदी बोलत होते. 

या मुलाखतीत बोलताना नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली. यावेळी मोदी म्हणाले की, देशाच्या स्वातंत्र्यानंतर ७० वर्षामध्ये काँग्रेसला गरिबी हटवता आली नाही, आता ते सांगतात न्याय होणार? देशातून काँग्रेस हटेल तेव्हाच न्याय होईल. २६/११ नंतर भारतीय हवाई दलाने स्ट्राईक करायला हवं होतं. काँग्रेसने आदेश देऊन न्याय केला का? १९८४ च्या शिख दंगलीतील आरोपींना शिक्षा देऊन जनतेशी न्याय केला का? काँग्रेसच्या अन्यायाची यादी मोठी आहे ते सांगितलं तर भलीभोठी यादी बनेल ते आता जनतेला सांगत आहेत आता होणार न्याय? असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसला लगावला. 

आगामी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी काँग्रेसकडून गरिबांसाठी न्याय ही योजना आणण्याचं आश्वासन देण्यात आलंय, जर देशात काँग्रेसचं सरकार आलं तर गरिबांना दरवर्षी ७२ हजार रुपये देण्याची घोषणा काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली होती. काँग्रेसच्या याच न्याय योजनेवर पंतप्रधानांनी टीका केली आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकNarendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेसsurgical strikeसर्जिकल स्ट्राइकBJPभाजपा