शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
2
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
3
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
4
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
5
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
6
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
7
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
8
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
9
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
10
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
11
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
12
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
13
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
14
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
15
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
16
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
17
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?
18
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
19
इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलचा मोठा निर्णय! जगभरातील दूतावास बंद केले; आता बदल्याची भीती
20
'जे धाडसी होत होते ते मारले गेले'; ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली; म्हणाले, "करार करा नाहीतर..."

७० वर्ष ज्यांनी अन्याय केला, ते आता 'न्याय' करणार का? - नरेंद्र मोदी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2019 18:07 IST

जवाहरलाल नेहरुंपासून इंदिरा गांधी आणि मनमोहन सरकारपर्यंत देशातील जनतेवर काँग्रेसने अन्याय केला ते गरिबांना न्याय काय देणार? अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर केली आहे

नवी दिल्ली - जवाहरलाल नेहरुंपासून इंदिरा गांधी आणि मनमोहन सरकारपर्यंत देशातील जनतेवर काँग्रेसने अन्याय केला ते गरिबांना न्याय काय देणार? अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदींनीकाँग्रेसवर केली आहे. देशातील या नामदार कुटुंबाने गरिबी हटावचा नारा देऊन गरिबांच्या मतांवर डल्ला मारण्याचा प्रयत्न केला असा टोला नरेंद्र मोदी यांनी गांधी कुटुंबाचं नाव न घेता लगावला आहे. 

देशाची निवडणूक ही लोकांवर केंद्रित झाली आहे. पाच वर्षाने देशाने इतकी प्रगती केली आहे की आता लोकांनी विचार करायचा आहे. देशाला पुढे घेऊन जायचं आहे की मागे परत आणायचं आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीला सामोरं जाताना देशातील लोकांपुढे आत्मविश्वास आहे. २०१४ ते २०१९ हा काळ देशातील जनतेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी होता तर २०१९ नंतरचा काळ भारताला जगात सर्वात पुढे नेण्याचा आहे असा विश्वास नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. एका हिंदी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत मोदी बोलत होते. 

या मुलाखतीत बोलताना नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली. यावेळी मोदी म्हणाले की, देशाच्या स्वातंत्र्यानंतर ७० वर्षामध्ये काँग्रेसला गरिबी हटवता आली नाही, आता ते सांगतात न्याय होणार? देशातून काँग्रेस हटेल तेव्हाच न्याय होईल. २६/११ नंतर भारतीय हवाई दलाने स्ट्राईक करायला हवं होतं. काँग्रेसने आदेश देऊन न्याय केला का? १९८४ च्या शिख दंगलीतील आरोपींना शिक्षा देऊन जनतेशी न्याय केला का? काँग्रेसच्या अन्यायाची यादी मोठी आहे ते सांगितलं तर भलीभोठी यादी बनेल ते आता जनतेला सांगत आहेत आता होणार न्याय? असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसला लगावला. 

आगामी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी काँग्रेसकडून गरिबांसाठी न्याय ही योजना आणण्याचं आश्वासन देण्यात आलंय, जर देशात काँग्रेसचं सरकार आलं तर गरिबांना दरवर्षी ७२ हजार रुपये देण्याची घोषणा काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली होती. काँग्रेसच्या याच न्याय योजनेवर पंतप्रधानांनी टीका केली आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकNarendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेसsurgical strikeसर्जिकल स्ट्राइकBJPभाजपा