शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
5
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
6
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
7
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
8
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
9
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
10
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
11
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
12
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
13
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
14
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
15
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
16
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
17
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
18
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
19
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
20
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज

७० वर्ष ज्यांनी अन्याय केला, ते आता 'न्याय' करणार का? - नरेंद्र मोदी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2019 18:07 IST

जवाहरलाल नेहरुंपासून इंदिरा गांधी आणि मनमोहन सरकारपर्यंत देशातील जनतेवर काँग्रेसने अन्याय केला ते गरिबांना न्याय काय देणार? अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर केली आहे

नवी दिल्ली - जवाहरलाल नेहरुंपासून इंदिरा गांधी आणि मनमोहन सरकारपर्यंत देशातील जनतेवर काँग्रेसने अन्याय केला ते गरिबांना न्याय काय देणार? अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदींनीकाँग्रेसवर केली आहे. देशातील या नामदार कुटुंबाने गरिबी हटावचा नारा देऊन गरिबांच्या मतांवर डल्ला मारण्याचा प्रयत्न केला असा टोला नरेंद्र मोदी यांनी गांधी कुटुंबाचं नाव न घेता लगावला आहे. 

देशाची निवडणूक ही लोकांवर केंद्रित झाली आहे. पाच वर्षाने देशाने इतकी प्रगती केली आहे की आता लोकांनी विचार करायचा आहे. देशाला पुढे घेऊन जायचं आहे की मागे परत आणायचं आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीला सामोरं जाताना देशातील लोकांपुढे आत्मविश्वास आहे. २०१४ ते २०१९ हा काळ देशातील जनतेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी होता तर २०१९ नंतरचा काळ भारताला जगात सर्वात पुढे नेण्याचा आहे असा विश्वास नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. एका हिंदी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत मोदी बोलत होते. 

या मुलाखतीत बोलताना नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली. यावेळी मोदी म्हणाले की, देशाच्या स्वातंत्र्यानंतर ७० वर्षामध्ये काँग्रेसला गरिबी हटवता आली नाही, आता ते सांगतात न्याय होणार? देशातून काँग्रेस हटेल तेव्हाच न्याय होईल. २६/११ नंतर भारतीय हवाई दलाने स्ट्राईक करायला हवं होतं. काँग्रेसने आदेश देऊन न्याय केला का? १९८४ च्या शिख दंगलीतील आरोपींना शिक्षा देऊन जनतेशी न्याय केला का? काँग्रेसच्या अन्यायाची यादी मोठी आहे ते सांगितलं तर भलीभोठी यादी बनेल ते आता जनतेला सांगत आहेत आता होणार न्याय? असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसला लगावला. 

आगामी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी काँग्रेसकडून गरिबांसाठी न्याय ही योजना आणण्याचं आश्वासन देण्यात आलंय, जर देशात काँग्रेसचं सरकार आलं तर गरिबांना दरवर्षी ७२ हजार रुपये देण्याची घोषणा काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली होती. काँग्रेसच्या याच न्याय योजनेवर पंतप्रधानांनी टीका केली आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकNarendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेसsurgical strikeसर्जिकल स्ट्राइकBJPभाजपा