शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
5
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
6
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
7
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
8
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
9
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
10
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
11
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
12
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
13
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
14
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
15
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
16
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
17
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
18
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
19
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
20
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य

मोदींना पराभूत करण्याची ताकद काँग्रेसमध्ये नाही, राहुल गांधींना ओवैसींचा खोचक टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2018 18:23 IST

असुदुद्दीन ओवैसी यांच्या एमआयएम पक्षाने तेलंगणात 7 जागांवर विजय मिळवत घवघवीत यश संपादन केलं.

हैदराबाद - एआयएमआयएमचे प्रमुख असुदुद्दीन ओवैसी यांनी काँग्रेसच्या विजयावर खोचक प्रतिक्रिया दिली आहे. भाजपला पराभूत करायचे असेल तर सर्वच समविचारी पक्षांनी एकत्र येणे गरजेचं आहे. आगामी 2019 च्या निवडणुकीत मोदींचा पराभव करता येईल, एवढी क्षमता काँग्रेसमध्ये नाही, असेही ओवैसींनी म्हटलं आहे. विशेष म्हणजे तेलंगणातील विजयानंतर आणि इतर तीन राज्यात काँग्रेसला मिळालेल्या यशानंतर ओवैसींनी काँग्रेसला सूचक इशारा दिला आहे.

असुदुद्दीन ओवैसी यांच्या एमआयएम पक्षाने तेलंगणात 7 जागांवर विजय मिळवत घवघवीत यश संपादन केलं. तर प्रचारसभांमध्येही ओवैसींनी काँग्रेस आणि राहुल गांधींवर टाका केली होती. आता, काँग्रेसला मिळालेल्या यशानंतरही ओवैसींनी काँग्रेसला सूचक इशारा दिला आहे. भाजपला पराभूत करायचे असल्यास सर्वच विरोधी पक्षांनी एकत्र येणे गरजेचे आहे. काँग्रेस आणि भाजपेत्तर पक्षांनी एकत्र येऊन आगामी निवडणूक लढवावी. भाजपला पराभूत करणे ही आम्हा सर्वांची जबाबदारी आहे. काँग्रेस हा देशासाठी पर्याय ठरू शकत नाही. भाजपला पराभूत करायचे असेल आणि नरेंद्र मोदींना पंतप्रधान बनण्यापासून रोखायचे असेल तर भाजपाविरोधी सर्वच पक्षांनी एकत्र यायला हवं. कारण, एकट्या काँग्रेसजवळ ती क्षमता नाही, असे ओवैसींनी म्हटले आहे. तसेच तेलंगणातील विजयाबद्दल समाधान व्यक्त करत चंद्रशेखर राव यांच्याकडून अपेक्षा व्यक्त केल्या आहेत. चंद्रशेखर राव हे भाजपाविरोधी सर्वच पक्षांची एकत्र मोट बांधतील आणि भाजपच्या पराभवाचा पाया रचतील, असेही ओवैसी म्हणाले. 

दरम्यान, तेलंगणात ओवैसींच्या पक्षाला 7 जागांवर विजय मिळाला असून भाजपाला केवळ एक जागा जिंकता आली आहे. तर काँग्रेसलाही तेलंगणात म्हणावे तितके यश आले नाही. त्यामुळे काँग्रेसने तीन राज्यात जरी यश मिळवले असले तरी, या यशामुळे ते मोदींना पराभूत करू शकत नाहीत, असेच ओवैसींनी सूचवले आहे.  

टॅग्स :Asaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीcongressकाँग्रेसBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी