शहरं
Join us  
Trending Stories
1
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
2
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
3
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
4
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
5
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
6
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
7
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
8
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
9
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
10
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
11
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
12
VIDEO: पाहावं ते नवलंच... मुलीने चक्क केली ख्रिसमस ट्री हेअरस्टाईल, नेटकऱ्यांना हसू आवरेना
13
बेस प्राईस अवघी ३० लाख, पण लिलावात या ५ खेळाडूंवर पडला पैशांचा पाऊस, बनले करोडपती
14
गीझर-हीटरमुळे तुमचे वीज बिल जास्त येतंय? या स्मार्ट टिप्स वापरून पैसे वाचवा
15
IPL 2026: ऑक्शनमध्ये चेन्नईचा मोठा डाव! १४ कोटी खर्च केले, पण परफेक्ट खेळाडू निवडला, धोनीची जागा घेणार?
16
BJP Assets: 2014 पूर्वी भाजपाच्या तिजोरीत किती पैसा होता? 11 वर्षांत किती वाढला? जाणून थक्क व्हाल!
17
आत्मनिर्भर भारताच्या दिशेने मोठे पाऊल, भारतातील पहिला स्वदेशी 64- बिट मायक्रोप्रोसेसर Dhruv64 लाँच
18
तब्बल ८ कोटी २० लाखांची बोली, दिल्ली कॅपिटल्सने संघात घेतलेला अकीब नबी दार कोण?
19
बाँडी बिचवर हल्ला करणाऱ्या साजिदचं भारताशी कनेक्शन समोर, २७ वर्षांपूर्वी सोडलं होतं हैदराबाद
20
आईने पाय धरले, तर वडिलांनी गळा आवळला; निवृत्त पोलिस अधिकाऱ्याने मुलीला संपवले, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

मोदींना पराभूत करण्याची ताकद काँग्रेसमध्ये नाही, राहुल गांधींना ओवैसींचा खोचक टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2018 18:23 IST

असुदुद्दीन ओवैसी यांच्या एमआयएम पक्षाने तेलंगणात 7 जागांवर विजय मिळवत घवघवीत यश संपादन केलं.

हैदराबाद - एआयएमआयएमचे प्रमुख असुदुद्दीन ओवैसी यांनी काँग्रेसच्या विजयावर खोचक प्रतिक्रिया दिली आहे. भाजपला पराभूत करायचे असेल तर सर्वच समविचारी पक्षांनी एकत्र येणे गरजेचं आहे. आगामी 2019 च्या निवडणुकीत मोदींचा पराभव करता येईल, एवढी क्षमता काँग्रेसमध्ये नाही, असेही ओवैसींनी म्हटलं आहे. विशेष म्हणजे तेलंगणातील विजयानंतर आणि इतर तीन राज्यात काँग्रेसला मिळालेल्या यशानंतर ओवैसींनी काँग्रेसला सूचक इशारा दिला आहे.

असुदुद्दीन ओवैसी यांच्या एमआयएम पक्षाने तेलंगणात 7 जागांवर विजय मिळवत घवघवीत यश संपादन केलं. तर प्रचारसभांमध्येही ओवैसींनी काँग्रेस आणि राहुल गांधींवर टाका केली होती. आता, काँग्रेसला मिळालेल्या यशानंतरही ओवैसींनी काँग्रेसला सूचक इशारा दिला आहे. भाजपला पराभूत करायचे असल्यास सर्वच विरोधी पक्षांनी एकत्र येणे गरजेचे आहे. काँग्रेस आणि भाजपेत्तर पक्षांनी एकत्र येऊन आगामी निवडणूक लढवावी. भाजपला पराभूत करणे ही आम्हा सर्वांची जबाबदारी आहे. काँग्रेस हा देशासाठी पर्याय ठरू शकत नाही. भाजपला पराभूत करायचे असेल आणि नरेंद्र मोदींना पंतप्रधान बनण्यापासून रोखायचे असेल तर भाजपाविरोधी सर्वच पक्षांनी एकत्र यायला हवं. कारण, एकट्या काँग्रेसजवळ ती क्षमता नाही, असे ओवैसींनी म्हटले आहे. तसेच तेलंगणातील विजयाबद्दल समाधान व्यक्त करत चंद्रशेखर राव यांच्याकडून अपेक्षा व्यक्त केल्या आहेत. चंद्रशेखर राव हे भाजपाविरोधी सर्वच पक्षांची एकत्र मोट बांधतील आणि भाजपच्या पराभवाचा पाया रचतील, असेही ओवैसी म्हणाले. 

दरम्यान, तेलंगणात ओवैसींच्या पक्षाला 7 जागांवर विजय मिळाला असून भाजपाला केवळ एक जागा जिंकता आली आहे. तर काँग्रेसलाही तेलंगणात म्हणावे तितके यश आले नाही. त्यामुळे काँग्रेसने तीन राज्यात जरी यश मिळवले असले तरी, या यशामुळे ते मोदींना पराभूत करू शकत नाहीत, असेच ओवैसींनी सूचवले आहे.  

टॅग्स :Asaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीcongressकाँग्रेसBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी