शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात मोठी घडामोड! बड्या असामीला अटक; बिल्डर बाळाच्या ड्रायव्हरला दोन दिवस डांबलेले
2
Arvind Kejriwal : "भाजपामध्ये उत्तराधिकारीवरून भांडण सुरू, मोदींना अमित शाहांना..."; केजरीवालांचा मोठा दावा
3
"इलेक्शन मोडमधून सरकार बाहेर आले असेल..."; दुष्काळावरुन जयंत पाटलांचा सरकारवर निशाणा
4
एस जयशंकर २० मिनिटे रांगेत राहिले, मतदार यादीत नावच नव्हते; मग मतदान कसे केले? 
5
१.८३ कोटी महिलांनी टाळले मतदान; आदिवासी मतदारसंघांमध्ये महिला मतांचा टक्का चांगला, शहरी भागात मात्र अनास्थाच 
6
विधानपरिषद निवडणूक: चारपैकी दोन ठिकाणी ठाकरेंनी उमेदवार दिले; पोतनिसांचे तिकीट कापले, विश्वासू शिलेदाराला पुन्हा संधी
7
श्रीमंतासाठी वेगळा न्याय, राग येणे साहजिकच; पोर्शे अपघात प्रकरणी प्रसिद्ध वकिलांची प्रतिक्रिया
8
Success Story : पैशांमुळे सुटलं शिक्षण, स्टेशनवर काढले दिवस; मेहनतीच्या जोरावर उभी केली ₹९२००० कोटींची कंपनी
9
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीदरम्यान मारहाण, टीएमसी कार्यकर्ता ठार; भाजपवर आरोप
10
Adani च्या 'या' शेअरची सेन्सेक्स इंडेक्समध्ये एन्ट्री; Wipro ची घेतली जागा, एक्सपर्ट म्हणाले, "खरेदी..."
11
कशा मिळतील ४०० पेक्षा जास्त जागा? मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केले आश्चर्य; ‘इंडिया’ला बहुमत मिळण्याचा दावा
12
आता अकरावी, बारावीला इंग्रजीची सक्ती नाही; कोणत्याही दोन भारतीय भाषा निवडता येणार
13
Vicco चे अध्यक्ष यशवंत पेंढारकर यांचं निधन, वयाच्या ८५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
14
आजचे राशीभविष्य २५ मे २०२४; सकाळी सौख्य व समाधान लाभेल, दुपारी...
15
पोर्शे अपघात प्रकरणा : होय...! पोलिसांकडूनच निष्काळजीपणा झाला; आयुक्तांची कबुली 
16
पुणे पोर्शे अपघात प्रकरण; कारवाईत दिरंगाई, दोन पीआय निलंबित
17
लैलाच्या सावत्र वडिलांना कोर्टाने ठोठावली फाशी; अभिनेत्रीसह सहा जणांची केली होती हत्या
18
मध्य प्रदेशातील 'नर्सिंग'प्रकरणी कडक कारवाईचे संकेत, एक लाख विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला
19
राज्याचा ७३% भाग दुष्काळाच्या छायेत, राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष; शरद पवार यांचा आरोप 
20
...तर दरवर्षी ७.५ लाख मृत्यू टाळता येणे शक्य; ८ पैकी १ मृत्यू जीवाणू संसर्गामुळे, लॅन्सेटचा अहवाल

काँग्रेसला युपीमध्ये प्रदेशाध्यक्ष मिळेना; प्रियांका गांधी यांची ऑफर पाच नेत्यांनी नाकारली

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2022 12:21 PM

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर अजय कुमार लल्लू यांनी चार महिन्यांपूर्वीच प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यांची जागा घेण्यास काँग्रेसचा एकही नेता तयार नाही. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष कोणाला नियुक्त करावे, असा प्रश्न काँग्रेससमोर निर्माण झाला आहे.

आदेश रावल -नवी दिल्ली :काँग्रेसच्याउत्तर प्रदेश प्रभारी, सरचिटणीस प्रियांका गांधी यांना प्रदेशाध्यक्ष मिळत नाही. त्यांनी पाच नेत्यांना प्रदेशाध्यक्ष होण्याचा प्रस्ताव दिला, परंतु सर्वांनी नकार दिला. गेल्या चार महिन्यांपासून हे पद रिक्त आहे. मात्र, ती जबाबदारी घेण्यास एकही नेता तयार नसल्याचे चित्र उत्तर प्रदेशमध्ये निर्माण झाले आहे.उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर अजय कुमार लल्लू यांनी चार महिन्यांपूर्वीच प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यांची जागा घेण्यास काँग्रेसचा एकही नेता तयार नाही. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष कोणाला नियुक्त करावे, असा प्रश्न काँग्रेससमोर निर्माण झाला आहे.१० मार्च रोजी उत्तर प्रदेशसह पाच राज्यांत विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले होते. काँग्रेसचा या पाचही राज्यांत पराभव झाला. उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणूक काँग्रेसने प्रियांका गांधी यांच्या नेतृत्त्वात लढविली होती. उर्वरित चार राज्ये पंजाब, उत्तराखंड, गोवा व मणिपूर येथेही काॅंग्रेसला अपयशच हाती आले हाेते. त्यानंतर तेथील प्रदेशाध्यक्ष तातडीने बदलण्यात आले. परंतु उत्तर प्रदेशबाबत अद्याप निर्णय होऊ शकलेला नाही. राज्यात पक्षाला केवळ २ जागांवर समाधान मानावे लागले होते. यातील एक आमदार आराधना मिश्रा (मोना) या प्रमोद तिवारी यांच्या भगिनी असून, त्यांना विधिमंडळ पक्षाचा नेता निवडण्यात आले. दुसरे आमदार वीरेंद्र चौधरी यांनी प्रदेशाध्यक्ष होण्यास नकार दिला. त्यामुळे या पदावर कोणाची निवड करावी, हा प्रश्न निर्माण झाला आहे.

प्रदेशाध्यक्षपदासाठी या नेत्यांचा नकार -माजी राज्यसभा सदस्य व छत्तीसगढचे प्रभारी पी. एल. पुनिया, राजस्थानमधून नुकतेच राज्यसभेसाठी निवडले गेलेले प्रमोद तिवारी, माजी प्रदेशाध्यक्ष निर्मल खत्री, माजी विधिमंडळ नेते प्रदीप माथूर व आ. वीरेंद्र चौधरी यांना प्रस्ताव देण्यात आला होता. परंतु सर्वांनी नकार दिला. 

टॅग्स :congressकाँग्रेसPriyanka Gandhiप्रियंका गांधीUttar Pradeshउत्तर प्रदेश