शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
4
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
5
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
6
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
7
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
8
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
9
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
10
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
11
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
12
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
13
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
14
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
15
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
16
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
17
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
18
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
19
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
20
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
Daily Top 2Weekly Top 5

सरकारने गरिबांच्या खात्यात 7,500 रुपये जमा करावेत, काँग्रेसची मागणी; सादर करणार असा 'प्लॅन'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2020 18:40 IST

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वात तयार करण्यात आलेल्या सल्लागार समितीची पहिली बैठक आज पार पडली. यानंतर काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी मोदी सरकारकडे ही मागणी केली आहे.

ठळक मुद्देलॉकडाऊनमध्ये गरिबांच्या बँक खात्यात मोदी सरकारने जमा केलेली मदत अपुरी असल्याचे काँग्रेसने म्हटले आहेमाजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वात तयार करण्यात आलेल्या सल्लागार समितीची पहिली बैठक आज पार पडलीकाँग्रेस आपला प्लॅन लवकरच सरकारला सोपवणार आहे

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये गरिबांच्या बँक खात्यात मोदी सरकारने जमा केलेली मदत अपुरी आहे. त्यामुळे सरकराने त्यांच्या खात्यात 7,500 रुपये टाकावेत. प्रत्येक जनधन खाते, पेन्शन खाते आणि पीएम शेतकरी खात्यात ही रक्कम सरकारने जमा करावी, अशी मागणी काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वात तयार करण्यात आलेल्या सल्लागार समितीची पहिली बैठक आज पार पडली. यानंतर काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी मोदी सरकारकडे ही मागणी केली आहे.

असा आहे काँग्रेसचा प्लॅन काँग्रेस पक्षाच्या सल्लागार समितीच्या पहिल्या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयांसदर्भात जयराम रमेश यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमाने पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, लघू आणि मध्यम उद्योगांचे पुनरुज्जीवन करणे, पीक खरेदी आणि स्थलांतराच्या समस्येवर काँग्रेस पक्षाने एक सविस्तर प्लॅन तयार केला आहे. हा प्लॅन 1 ते 2 दिवसांत मोदी सरकारला सोपवला जाईल. 

जयराम रमेश म्हणाले, 'सरकारने आतापर्यंत जी पावले उचलली आहेत ती पुरेशी नाहीत. आम्हीही सरकारला सल्ला देणार आहोत. लघू आणि मध्यम उद्योगांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी आम्ही एक ठोस प्लॅन तयार केला आहे. हा प्लॅन आम्ही लवकरच सरकारला सोपवणार आहोत. या बैठकीत मनमोहन सिंग आणि काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनीही लघू आणि मध्यम उद्योगांना मदत देण्यावर जोर दिला आहे. तसेच काँग्रेस सल्लागार समितीची बैठक दर दुसऱ्या दिवशी होईल, असेही रमेश यांनी म्हटले आहे.

'एमपी सरकार पाडण्यातच व्यस्त होते मोदी सरकार' -मोदी सरकारने कोरोना महामारीचा सामना करण्याच्या तयारीवर लक्षच दिले नाही. त्यांचे लक्ष केवळ मध्य प्रदेशातील काँग्रेस सरकार पाडण्यावरच होते, असा आरोपही काँग्रेसने केला आहे.

टॅग्स :congressकाँग्रेसSonia Gandhiसोनिया गांधीRahul Gandhiराहुल गांधीManmohan Singhमनमोहन सिंगNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाGovernmentसरकार