शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

सरकारने गरिबांच्या खात्यात 7,500 रुपये जमा करावेत, काँग्रेसची मागणी; सादर करणार असा 'प्लॅन'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2020 18:40 IST

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वात तयार करण्यात आलेल्या सल्लागार समितीची पहिली बैठक आज पार पडली. यानंतर काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी मोदी सरकारकडे ही मागणी केली आहे.

ठळक मुद्देलॉकडाऊनमध्ये गरिबांच्या बँक खात्यात मोदी सरकारने जमा केलेली मदत अपुरी असल्याचे काँग्रेसने म्हटले आहेमाजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वात तयार करण्यात आलेल्या सल्लागार समितीची पहिली बैठक आज पार पडलीकाँग्रेस आपला प्लॅन लवकरच सरकारला सोपवणार आहे

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये गरिबांच्या बँक खात्यात मोदी सरकारने जमा केलेली मदत अपुरी आहे. त्यामुळे सरकराने त्यांच्या खात्यात 7,500 रुपये टाकावेत. प्रत्येक जनधन खाते, पेन्शन खाते आणि पीएम शेतकरी खात्यात ही रक्कम सरकारने जमा करावी, अशी मागणी काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वात तयार करण्यात आलेल्या सल्लागार समितीची पहिली बैठक आज पार पडली. यानंतर काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी मोदी सरकारकडे ही मागणी केली आहे.

असा आहे काँग्रेसचा प्लॅन काँग्रेस पक्षाच्या सल्लागार समितीच्या पहिल्या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयांसदर्भात जयराम रमेश यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमाने पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, लघू आणि मध्यम उद्योगांचे पुनरुज्जीवन करणे, पीक खरेदी आणि स्थलांतराच्या समस्येवर काँग्रेस पक्षाने एक सविस्तर प्लॅन तयार केला आहे. हा प्लॅन 1 ते 2 दिवसांत मोदी सरकारला सोपवला जाईल. 

जयराम रमेश म्हणाले, 'सरकारने आतापर्यंत जी पावले उचलली आहेत ती पुरेशी नाहीत. आम्हीही सरकारला सल्ला देणार आहोत. लघू आणि मध्यम उद्योगांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी आम्ही एक ठोस प्लॅन तयार केला आहे. हा प्लॅन आम्ही लवकरच सरकारला सोपवणार आहोत. या बैठकीत मनमोहन सिंग आणि काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनीही लघू आणि मध्यम उद्योगांना मदत देण्यावर जोर दिला आहे. तसेच काँग्रेस सल्लागार समितीची बैठक दर दुसऱ्या दिवशी होईल, असेही रमेश यांनी म्हटले आहे.

'एमपी सरकार पाडण्यातच व्यस्त होते मोदी सरकार' -मोदी सरकारने कोरोना महामारीचा सामना करण्याच्या तयारीवर लक्षच दिले नाही. त्यांचे लक्ष केवळ मध्य प्रदेशातील काँग्रेस सरकार पाडण्यावरच होते, असा आरोपही काँग्रेसने केला आहे.

टॅग्स :congressकाँग्रेसSonia Gandhiसोनिया गांधीRahul Gandhiराहुल गांधीManmohan Singhमनमोहन सिंगNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाGovernmentसरकार