शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

आसाम, केरळमध्ये काँग्रेसचा परा‌भव अंतर्गत गटबाजीमुळे, सत्यशोधन समितीच्या अहवालाचा निष्कर्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2021 6:13 AM

Congress : समितीच्या एका सदस्याने ‘लोकमत’ शी बोलताना म्हटले की, ‘वृत्तपत्रांत आलेल्या बातम्या निराधार आहेत. या बातम्यांत आसाममध्ये झालेल्या पराभवाला बदरुद्दीन अजमल यांचा पक्ष एआययूडीएफशी काँग्रेसने केलेली युती जबाबदार असल्याचे म्हटले.

- शीलेश शर्मा

नवी दिल्ली : आसाम आणि केरळसारख्या राज्यांत काँग्रेसचा अंतर्गत कलह आणि गटबाजीमुळे पराभव झाला, असा खुलासा समितीच्या अहवालात करण्यात आला आहे. ही समिती माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली निवडणुकीतील पराभवाची कारणे शोधण्यासाठी पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी स्थापन केली होती.समितीच्या एका सदस्याने ‘लोकमत’ शी बोलताना म्हटले की, ‘वृत्तपत्रांत आलेल्या बातम्या निराधार आहेत. या बातम्यांत आसाममध्ये झालेल्या पराभवाला बदरुद्दीन अजमल यांचा पक्ष एआययूडीएफशी काँग्रेसने केलेली युती जबाबदार असल्याचे म्हटले. वस्तुस्थिती ही आहे की, राज्यस्तरावर नेत्यांमध्ये असलेल्या गटबाजीने कार्यकर्त्यांची गटागटांत विभागणी झाली. त्यांच्यात कोणताही समन्वय नव्हता. एआययूडीएफशी काँग्रेसने जर युती केली नसती तर पक्षाची कामगिरी आणखी वाईट झाली असती.’ केरळी चर्चा करताना हा सदस्य म्हणाला की, राहुल गांधी यांची उपस्थिती असतानाही ओमान चंडी तथा रमेश चेन्नीथला यांच्यात गटबाजी झाली. ते एक दुसऱ्याचे नुकसान करू लागले. 

नेते काय म्हणतात?पक्षाचे वरिष्ठ नेते म्हणतात की, ‘अंतर्गत गटबाजी काही नवी नाही; परंतु सत्तेतून दूर झाल्यामुळे प्रत्येक राज्यात गटबाजीने वेग घेतला आहे. हार्दिक पटेल यांनी याच गटबाजीमुळे काँग्रेसमधून बाहेर पडण्याची धमकी पक्षश्रेष्ठींना दिली आहे. पंजाब, राजस्थान, छत्तीसगडसह सर्व राज्यांत काँग्रेसमध्ये गट-तट आहेत. परंतु, नेतृत्व त्यावर उपाय शोधू शकले नाही. त्यामुळे गटबाजी वाढत आहे.’

टॅग्स :congressकाँग्रेसElectionनिवडणूक