शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
2
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
3
Raj Thackeray: राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
4
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
5
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
6
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
7
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
8
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
9
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
10
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
11
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
12
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
13
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!
14
Pune Rave Party: "तुमच्या तर दिव्याखालीच अंधार"; चित्रा वाघांनी सुप्रिया सुळे, रोहिणी खडसेंना सुनावले
15
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
16
आजारी लेकीला रुग्णालयात घेऊन चाललेले वडील, BMW ची धडक; मन हेलावून टाकणारी घटना
17
"कोणी ड्रममध्ये भरत आहे तर कोणी...", शिव ठाकरेला वाटते लग्नाची भीती, म्हणाला- "हा तर कर्मा..."
18
Pune Rave Party: रेव्ह पार्टी उधळल्यानंतर रोहिणी खडसेंच्या घराची झाडाझडती, पोलिसांना मिळाल्या तीन गोष्टी 
19
दुबईत सोनं खरंच स्वस्त मिळतं? भारतात आणण्याचे नियम काय? किती टॅक्स लागतो? सर्व काही जाणून घ्या
20
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं

तीन अंकी जागा जिंकण्याचा काँग्रेसला आत्मविश्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2019 06:20 IST

महाराष्ट्रासह गुजरात, राजस्थान, तामिळनाडू, आंध्र, दिल्ली, ओडिशा या राज्यांत चांगल्या कामगिरीची आशा

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकांत तीन अंकी जागा जिंकण्याचा आत्मविश्वास काँग्रेसला वाटत आहे. महाराष्ट्र, तामिळनाडू, गुजरात, छत्तीसगढ, मध्य प्रदेश, राजस्थान, पंजाब या राज्यांमध्ये काँग्रेसची कामगिरी चांगली राहील, असे या पक्षाच्या नेत्यांना वाटत आहे.काँग्रेसने १९९९च्या लोकसभा निवडणुकांत केवळ ११९ जागा जिंकल्या होत्या. मात्र २०१४च्या लोकसभा निवडणुकांत काँग्रेसला फक्त ४४ जागांवर विजय मिळाला. त्या वेळी गुजरात, राजस्थान, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, दिल्ली, ओडिशा या राज्यांमध्ये काँग्रेसला एकही जागा मिळाली नव्हती. एवढेच नव्हेतर, कोणत्याही राज्यात काँग्रेसला दोन अंकी जागा मिळाल्या नव्हत्या. या पार्श्वभूमीवर काँग्रेसला यंदा आपल्या जागा तीन अंकात म्हणजे १00 वा त्याहून अधिक असतील, अशी खात्री वाटत आहे.

राष्ट्रीय पक्ष असलेल्या काँग्रेसची अवस्था फारच केविलवाणी झाली होती. लोकसभेतील एकूण जागांच्या दहा टक्केही जागा जिंकता न आल्यामुळे काँग्रेसला विरोधी पक्षनेतेपदही मिळाले नव्हते. यंदाच्या लोकसभा निवडणुकांत आंध्र प्रदेश, तेलंगणा, हिमाचल प्रदेश, झारखंड, दिल्ली, ईशान्य भारतातील राज्ये येथे मोठे यश मिळणार नाही याची खूणगाठ काँग्रेसने मनाशी बांधली आहे. त्यामुळे महाराष्ट्रासह वरील सात राज्यांवर काँग्रेसची भिस्त दिसत आहे. 

लोकसभा निवडणुकांचा अंतिम म्हणजे सातवा टप्पा १९ मे रोजी पार पडल्यानंतर मतदारसंघनिहाय आढावा घेऊन आपल्याला किती जागा मिळू शकतील, याचा काँग्रेस पुन्हा अंदाज घेणार आहे. मोदी सरकार जनतेला नकोसे झाले असून ते बदलण्यासाठी लोकसभा निवडणुकांत जनतेने मतदान केल्याचा काँग्रेसचा दावा आहे. काँग्रेसने पक्षातर्फे देशभर जे सर्वेक्षण केले आहे, त्यातून हा निष्कर्ष निघाला असल्याचे समजते. अलीकडेच ज्या राज्यांत विधानसभा निवडणुकांत झाल्या, तेथील जागांमध्ये २0१४ च्या तुलनेत मोठी वाढ होईल, असे या सर्वेक्षणात नमूद करण्यात आले असल्याचे सांगण्यात येत आहे.

सिंघवी म्हणतात, सर्वाधिक जागा जिंकूलोकसभा निवडणुकांनंतर सर्वांत जास्त जागा जिंकणारा पक्ष म्हणून काँग्रेस पुढे येईल, असा दावा त्या पक्षाचे ज्येष्ठ नेते अभिषेक मनू सिंघवी यांनी केला आहे. पुरेशा बहुमताच्या बळावर बिगरभाजप सरकार केंद्रात स्थापन करणे शक्य होईल, असेही त्यांनी म्हटले आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकcongressकाँग्रेसMaharashtraमहाराष्ट्र