शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
5
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
6
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
7
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
8
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
9
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
10
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
11
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
12
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
13
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
14
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
15
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
16
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
17
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
18
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
19
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट

2024च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस 300 जागा जिंकू शकत नाही; काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याचा पक्षाला घरचा आहेर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2021 10:00 IST

लोकसभेत बहुमत असलेले सरकारच कलम 370 हटवू शकते. 2024 च्या निवडणुका जिंकून काँग्रेसचे 300 खासदार संसदेत पोहोचतील, असे मला वाटत नाही.

नवी दिल्ली:काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद(Ghulam Nabi Azad) यांनी 2024 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या कामगिरीबद्दल निराशाजनक दावा केला आहे. 'सध्याची परिस्थिती अशीच राहिली तर 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस 300 जागाही जिंकू शकेल, असे मला वाटत नाही,' असे ते म्हणाले.

काँग्रेसची परिस्थिती बिकटबुधवारी जम्मू-काश्मीरच्या पूंछ येथे एका सभेला संबोधित करताना आझाद यांनी आपल्याच पक्षाला घरचा आहेर दिला. यावेळी बोलताना ते म्हणाले की, काँग्रेसची सध्याची परिस्थिती वाईट आहे. भविष्यातही आताची परिस्थिती कायम राहिल्यास आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला 300 जागा मिळतील, असे मला वाटत नाही. 370 चे प्रकरण प्रलंबित आहे. यावर सर्वोच्च न्यायालय आणि केंद्र सरकारच निर्णय घेऊ शकते. त्यामुळे मी तुम्हाला खोटी आशा दाखवणार नाही.

तुम्हाला खोटे वचन देणार नाही...गुलाम नबी आझाद पुढे म्हणाले की, फक्त तुम्हाला खूश करण्यासाठी जे आपल्या हातात नाही, त्यावर मी बोलणार नाही. मी तुम्हाला खोटी आश्वासने देणे, कलम 370 बद्दल बोलणे योग्य नाही. लोकसभेत बहुमत असलेले सरकारच कलम 370 हटवू शकते. सरकार स्थापन करण्यासाठी 300 खासदारांची गरज आहे. 2024 च्या निवडणुका जिंकून आमचे 300 नेते संसदेत पोहोचतील असे मी वचन देऊ शकत नाही. 2024 मध्ये आम्ही 300 जागांवर जाऊ असेही मला वाटत नाही. मी तुम्हाला कोणतेही चुकीचे वचन देणार नाही, असेही ते म्हणाले.

माझे भाषण चुकीच्या पद्धतीने दाखवलेजम्मू प्रांतातील किश्तवार जिल्ह्यात एका जाहीर सभेला संबोधित करताना, ओमर अब्दुल्ला यांनी आझाद यांच्या कथित वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली होती. आझाद यांनी कलम 370 बद्दल बोलणे व्यर्थ असल्याचे म्हटले होते. त्यावर आझाद म्हणाले की, माध्यमांनी काश्मीरमधील माझ्या भाषणाचे चुकीचे चित्रण केले आणि माझ्या त्या भाषणाला चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आले. कलम 370 वर  आमची एकच भूमिका आहे, हे मी स्पष्ट करतो.  

 

टॅग्स :congressकाँग्रेसGhulam Nabi Azadगुलाम नबी आझादArticle 370कलम 370Article 35 Aकलम 35-एJammu Kashmirजम्मू-काश्मीर