शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
2
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
3
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
4
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
5
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
6
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
7
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
8
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
9
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता
10
माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली...
11
Nag Panchami 2025: नागपंचमी का साजरी केली जाते, यामागील पौराणिक कथा वाचलीत का?
12
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
13
चीनचा भारताला मोठा 'धक्का'! 'रेअर अर्थ' बंदीमुळे 'या' ५ क्षेत्रांवर थेट परिणाम, SBI चा गंभीर इशारा!
14
"TCS मधील कपात तर सुरुवात आहे, अजून अनेक कंपन्यांमध्ये AI चा फटका बसणारे"
15
Jharkhand: झारखंडमध्ये भीषण अपघात, कावडियांची बस ट्रकवर आदळली; १९ जणांचा मृत्यू
16
२५ वर्षीय CA तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; 'हेलियम गॅस' शरीरात घेत आयुष्याचा शेवट केला, कारण...
17
Stock Market Today: सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात विक्रीचा सपाटा, Sensex २७१ अंकांनी घसरला; IT-मेटल स्टॉक्स कमकुवत
18
"सलमानने चाकू माझ्या गळ्यावर धरला आणि जोरात...", अशोक सराफ यांनी सांगितला भाईजानचा तो प्रसंग
19
भीषण! गाझामध्ये उपासमारीने १४७ लोकांचा मृत्यू, ४० हजार लहान मुलांचा जीव धोक्यात
20
FD-RD झाली जुनी, आता ‘या’ ५ स्कीम्सची चर्चा; वर्षभरात तगडा नफा हवा असेल तर ही डिटेल्स तपासा

"भाजपा १५० च्या वर जाणार नाही", माजी केंद्रीय मंत्र्यांचा मोठा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2024 11:57 IST

Lok Sabha Elections 2024 : याच पार्श्वभूमीवर काँग्रेसचे उमेदवार आणि माजी माहिती आणि प्रसारण मंत्री मनीष तिवारी यांनी एका वृत्तवाहिनीशी चर्चा केली.

नवी दिल्ली : लोकसभा निवडणूक २०२४ च्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्यासाठी १ जून रोजी मतदान होणार आहे. मतदानाच्या या शेवटच्या टप्प्यात चंदीगडमध्येही मतदान होणार आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसचे उमेदवार आणि माजी माहिती आणि प्रसारण मंत्री मनीष तिवारी यांनी एका वृत्तवाहिनीशी चर्चा केली. यावेळी भाजपा १५० च्या वर जाणार नाही आणि यावेळी ४ जूनला केवळ इंडिया आघाडी सरकार स्थापन करेल, असा विश्वास मनीष तिवारी यांनी व्यक्त केला.

काँग्रेसचे उमेदवार मनीष तिवारी यांनी मतदानापूर्वी एबीपी न्यूजशी बोलताना आणखी अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. बाहेरचा माणूस असल्याच्या आरोपांवर मनीष तिवारी म्हणाले की, मी फक्त चंदीगडचा आहे. हे माझे वडिलोपार्जित घर आहे. माझे वडील या चंदीगडमध्ये शहीद झाले, त्यांना दहशतवाद्यांनी मारले. बाहेरचे भाजपाचे उमेदवार संजय टंडन हे स्वतः अमृतसरचे आहेत.

याचबरोबर, मनीष तिवारी यांनी आपल्या विजयाबद्दल मोठा दावा केला आहे. ते म्हणाले, "मला विश्वास आहे की, मी जिंकेन. भाजपा १५० च्या वर जाणार नाही आणि यावेळी ४ जूनला केवळ इंडिया आघाडी सरकार स्थापन करेल. मल्लिकार्जुन खर्गे हे अनुभवी नेते आहेत, ते समजत आहेत की यावेळी इंडिया आघाडी सरकार स्थापन करणार आहे, त्यामुळेच आघाडीच्या पार्टनर्सची बैठक बोलावली आहे."

दरम्यान, पवन बन्सल प्रचारात दिसत नसल्याबद्दल विचारल्यानंतर मनीष तिवारी म्हणाले, ते पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत आणि मी त्यांच्या घरी जाऊन त्यांचे आशीर्वाद घेतले, त्यांना माझा पाठिंबा असल्याचा मला पूर्ण विश्वास आहे. याशिवाय. मनीष तिवारी यांनी पहिल्यांदाच भाजपामध्ये प्रवेश करण्याच्या चर्चेवर मौन सोडले. ते म्हणाले, "मी गेली अनेक वर्षे राजकारणात आहे, त्यामुळे सर्वांशी माझे संबंध आहेत, पण मी कधीही भाजपामध्ये जाण्याचा विचार केला नाही आणि मी कधीही भाजपामध्ये प्रवेश करणार नाही. आमचा लढा त्यांच्या विचारधारेविरुद्ध आहे."

टॅग्स :BJPभाजपाlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४congressकाँग्रेसchandigarh lok sabha election 2024चंदीगड लोकसभा निवडणूक निकाल २०२४chandigarh-pcचंडीगढ़