शहरं
Join us  
Trending Stories
1
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
2
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
3
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
4
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
5
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
6
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
7
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
8
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
9
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
10
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
11
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
12
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
13
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
14
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
15
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
16
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले
17
आयुष्य कसं वळणं घेईल? काहीच सांगता येत नाही; एक स्वप्न तुटलं, सोनम राजला भेटली अन्...! मग त्याच्यासाठी केलं एवढं मोठं कांड!
18
'...तर पाकिस्तानात घुसून हल्ला करू', परराष्ट्रमंत्री जयशंकर यांचा पाकिस्तानला थेट इशारा
19
Video - "हनिमूनवरुन जिवंत परतणं ही मोठी कामगिरी..."; सोनम-राजा प्रकरणावर मीम्स व्हायरल
20
राजा रघुवंशीची हत्या, सोनम झालेली बेपत्ता; एकाच वेळी १२० पोलीस करत होते 'ऑपरेशन हनिमून'!

"भाजपा १५० च्या वर जाणार नाही", माजी केंद्रीय मंत्र्यांचा मोठा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2024 11:57 IST

Lok Sabha Elections 2024 : याच पार्श्वभूमीवर काँग्रेसचे उमेदवार आणि माजी माहिती आणि प्रसारण मंत्री मनीष तिवारी यांनी एका वृत्तवाहिनीशी चर्चा केली.

नवी दिल्ली : लोकसभा निवडणूक २०२४ च्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्यासाठी १ जून रोजी मतदान होणार आहे. मतदानाच्या या शेवटच्या टप्प्यात चंदीगडमध्येही मतदान होणार आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसचे उमेदवार आणि माजी माहिती आणि प्रसारण मंत्री मनीष तिवारी यांनी एका वृत्तवाहिनीशी चर्चा केली. यावेळी भाजपा १५० च्या वर जाणार नाही आणि यावेळी ४ जूनला केवळ इंडिया आघाडी सरकार स्थापन करेल, असा विश्वास मनीष तिवारी यांनी व्यक्त केला.

काँग्रेसचे उमेदवार मनीष तिवारी यांनी मतदानापूर्वी एबीपी न्यूजशी बोलताना आणखी अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. बाहेरचा माणूस असल्याच्या आरोपांवर मनीष तिवारी म्हणाले की, मी फक्त चंदीगडचा आहे. हे माझे वडिलोपार्जित घर आहे. माझे वडील या चंदीगडमध्ये शहीद झाले, त्यांना दहशतवाद्यांनी मारले. बाहेरचे भाजपाचे उमेदवार संजय टंडन हे स्वतः अमृतसरचे आहेत.

याचबरोबर, मनीष तिवारी यांनी आपल्या विजयाबद्दल मोठा दावा केला आहे. ते म्हणाले, "मला विश्वास आहे की, मी जिंकेन. भाजपा १५० च्या वर जाणार नाही आणि यावेळी ४ जूनला केवळ इंडिया आघाडी सरकार स्थापन करेल. मल्लिकार्जुन खर्गे हे अनुभवी नेते आहेत, ते समजत आहेत की यावेळी इंडिया आघाडी सरकार स्थापन करणार आहे, त्यामुळेच आघाडीच्या पार्टनर्सची बैठक बोलावली आहे."

दरम्यान, पवन बन्सल प्रचारात दिसत नसल्याबद्दल विचारल्यानंतर मनीष तिवारी म्हणाले, ते पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत आणि मी त्यांच्या घरी जाऊन त्यांचे आशीर्वाद घेतले, त्यांना माझा पाठिंबा असल्याचा मला पूर्ण विश्वास आहे. याशिवाय. मनीष तिवारी यांनी पहिल्यांदाच भाजपामध्ये प्रवेश करण्याच्या चर्चेवर मौन सोडले. ते म्हणाले, "मी गेली अनेक वर्षे राजकारणात आहे, त्यामुळे सर्वांशी माझे संबंध आहेत, पण मी कधीही भाजपामध्ये जाण्याचा विचार केला नाही आणि मी कधीही भाजपामध्ये प्रवेश करणार नाही. आमचा लढा त्यांच्या विचारधारेविरुद्ध आहे."

टॅग्स :BJPभाजपाlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४congressकाँग्रेसchandigarh lok sabha election 2024चंदीगड लोकसभा निवडणूक निकाल २०२४chandigarh-pcचंडीगढ़