शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

फेसबुक आणि व्हॉट्सअ‍ॅपचा राजकीय वापरावरून काँग्रेस-भाजपात जुंपली

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2020 06:57 IST

काँग्रेसने पूर्ण प्रकरणाच्या चौकशीसाठी संयुक्त संसदीय समितीची (जेपीसी) मागणी केली आहे तर भाजपचा आरोप आहे की, काँग्रेसने केंब्रिज एनलिट्काचा उपयोग केला होता आणि आता मात्र आमच्यावर आरोप करत आहे.

शीलेश शर्मा नवी दिल्ली : वॉल स्ट्रीट जनरलमध्ये फेसबुक आणि व्हॉट्सअ‍ॅपचा राजकीय वापरावरून प्रसिद्ध झालेल्या बातमीवरून काँग्रेस आणि भाजप एकमेकांवर हल्ले करत आहेत. काँग्रेसने पूर्ण प्रकरणाच्या चौकशीसाठी संयुक्त संसदीय समितीची (जेपीसी) मागणी केली आहे तर भाजपचा आरोप आहे की, काँग्रेसने केंब्रिज एनलिट्काचा उपयोग केला होता आणि आता मात्र आमच्यावर आरोप करत आहे.फेसबुकनेदेखील आरोप फेटाळून लावताना म्हटले की, आम्ही राजकीय पक्ष किंवा नेता पाहून निर्णय घेत नाही. त्याच्या दुसऱ्या एका अधिकाºयाने खुलासा केला की, फेसबुक भारतात व्यापारावर प्रतिकूल परिणामाच्या भीतीमुळे कोणतीही कारवाई करण्यास घाबरतो. काँग्रेसने संसदेचे अधिवेशन जवळ येत असताना या मुद्यावर तिखट हल्ले सुरू केले आहेत. पक्षाच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांनी फेसबुक आणि भाजपवर हल्ला करताना म्हटले की, ‘‘हे आमची लोकशाही कमकुवत व लोकशाहीची मुळे दुबळी करण्याचे प्रकरण आहे. या प्रकरणामुळे लोकांना संभ्रमित केले आहे. हे असे प्रकरण आहे की, आज हजारों-लाखों युवक फेसबुक युनिव्हर्सिटीतून शिक्षण घेत आहेत. ते त्यांचा धडा शिकत नाहीत. चुकीचे-वाईट फेसबुक आणि व्हॉटसअ‍ॅपवर सांगणाºया लोकांना ते आज कोट करत आहेत. सत्य प्रमाणित करत आहेत. म्हणून जेपीसीकडून चौकशी होणे गरजेचे आहे. यात काही विरोधाभास मला दिसत नाही.’’

कोण काय म्हणाले?काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी टष्ट्वीट केले होते की,‘‘भाजप -राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) भारतात फेसबुक आणि व्हॉट्सअ‍ॅपवर नियंत्रण ठेवतात. या माध्यमातून खोट्या बातम्या आणि द्वेष पसरवून मतदारांना चिथावणी देतात.’’ राहुल यांच्या या टष्ट्वीटवर दूरसंचारमंत्री रविशंकर प्रसाद यांनी उत्तर देताना म्हटले की, ज्यांचा खोटारडेपणा पकडला गेला तेच आरोप करीत आहेत.

टॅग्स :congressकाँग्रेसBJPभाजपाFacebookफेसबुक