शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपला ४०० जागा मिळाल्या तर काय होईल? सीएम हिमंता बिस्वा सरमांचं मोठं विधान
2
जिथं मोदी जातील तिथं मविआ जिंकेल, संजय राऊतांचा दावा; भाजपावरही साधला निशाणा
3
ज्योतिरादित्य शिंदेंना मातृशोक; राजमाता माधवी राजेंचे दिल्ली एम्समध्ये निधन
4
Maneka Gandhi : "मला वाटत नाही विकास झालाय..."; राहुल आणि प्रियंका गांधींबद्दल काय म्हणाल्या मनेका गांधी?
5
कोस्टल रोड आणि सी-लिंकला जोडणारा दुसरा महाकाय गर्डर यशस्वीरित्या बसवला! 
6
'फुलेरा'मध्ये निवडणुकीचं वातावरण, कोण होणार नवा सचिव? 'पंचायत 3' चा ट्रेलर बघाच
7
Giriraj Singh : "काँग्रेसला देशात इस्लामिक स्टेट बनवायचाय; राहुल-सोनिया गांधी देश सोडून पळून जाणार"
8
TBO Tek IPO Listing : लिस्ट होताच गुंतवणूकदार मालामाल, ₹१४०० पार पोहोचला 'हा' शेअर; ५५ टक्क्यांचा तगडा नफा
9
सचिन तेंडुलकर यांच्याकडे अंगरक्षक असलेल्या सीआरपीएफ जवानाची गोळी झाडून आत्महत्या
10
मोदींच्या सभेपूर्वी ठाकरे गटाचे पाच कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात; अज्ञात स्थळी नजरकैदेत
11
Gautam Adani साठी 'अच्छे दिन', शेअर्सवर गुतवणूकदार तुटून पडले; बनला कमाईचा विक्रम
12
Sita Navami 2024: सीता माई जनकाला मिळाली तो दिवस सीता नवमी; या दिवशी उपास का करावा? वाचा!
13
धक्कादायक! आंध्र प्रदेशात भीषण अपघात, महामार्गावर बस-ट्रकची धडक, सहा जणांचा होरपळून मृत्यू
14
उमेदवार भाजपचा! सभेनंतर शिंदे गट- ठाकरे गट भिडले; वाकोल्यात 'गद्दार'वरून तणाव
15
Mobile Tariff Hike : निवडणुकांनंतर वाढणार Mobile चं बिल, पाहा किती होईल Jio, Airtel आणि Vi रिचार्ज? 
16
इन्स्टाग्राम रील्सच्या मदतीने ५५ लाखांची चोरी; मुंबई पोलिसांनी रायगडमधून दोन तरुणींना अटक
17
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; सिप्लाच्या शेअरमध्ये बंपर तेजी, HDFC आपटला
18
"त्या पेट्रोल पंपावर शाळेच्या मुलांनी भरलेली व्हॅन असती तर?", घाटकोपर दुर्घटनेवरून शशांक संतापला
19
"घे बोकांडी, कर दहिहंडी म्हणणाऱ्या याच..."; मनसे नेते प्रकाश महाजनांचा सुषमा अंधारेंवर पलटवार
20
'बजरंगी भाईजान'ची मुन्नी झाली १०वी पास! टक्के किती मिळाले माहित्येय?

प्रवासी विम्यातून कंपन्यांना मिळाले ४६ कोटी रुपये

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2019 2:15 AM

दाव्यांपोटी रेल्वे प्रवाशांना दिले ७.२९ कोटी

नवी दिल्ली : रेल्वेच्या विमा योजनेंतर्गत गत दोन वर्षांत खासगी विमा कंपन्यांना जवळपास ४६ कोटी रुपयांच्या प्रीमियमची कमाई झाली आहे. या काळात त्यांनी विमा दाव्यांसाठी ७ कोटी रुपये दिले आहेत. माहिती अधिकारांतर्गत हा खुलासा झाला आहे.

रेल्वे मंत्रालयाच्या मालकीच्या आयआरसीटीसीने विमा योजनेसाठी श्रीराम जनरल इन्श्योरन्स कंपनी लिमिटेड, आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इन्श्योरन्स कंपनी लिमिटेड आणि रॉयल सुंदरम जनरल इन्श्योरन्स कंपनी लिमिटेडशी करार केला आहे. या योजनेची सुरुवात सप्टेंबर, २०१६ मध्ये झाली होती. सुरुवातीला याचा प्रीमियम प्रति प्रवासी ०.९२ रुपये होता.

रेल्वेने ३१ ऑगस्ट २०१८ पर्यंत प्रीमियम स्वत: भरला, पण त्यानंतर प्रीमियम प्रवाशांकडून वसूल केला जाऊ लागला. हा प्रीमियम कमी करून ०.४९ रुपये प्रति प्रवासी आहे. या योजनेचा लाभ कन्फर्म वा आरएसी तिकीट असलेल्या व आयआरसीटीसीच्या अधिकृत वेबसाइटवरून तिकीट बुक करणाऱ्यांना मिळतो. रेल्वे अपघातात मृत्यू होणाºया वा जखमी होणाऱ्यांच्या नातेवाइकांना विमा रक्कम दिली जाते. मध्य प्रदेशातील चंद्रशेखर गौर यांनी केलेल्या अर्जातून ही माहिती समोर आली.

गत दोन वर्षांत आयआरसीटीसीने विमा कंपन्यांना प्रीमियमच्या स्वरूपात ३८.८९ कोटी दिले आहेत, तर विमा कंपन्यांनी प्रवाशांना ७.२९ कोटींची रक्कम दिली आहे. याबाबत अधिकारी म्हणाले की, गत दोन वर्षांत दुर्घटनांमध्ये घट झाली आहे व विमा दावेही कमी झाले आहेत.

टॅग्स :railwayरेल्वे