शहरं
Join us  
Trending Stories
1
'यशस्वी' सेंच्युरी... 'रो-को'ची फिफ्टी! टीम इंडियानं दाबात जिंकली दक्षिण आफ्रिकेविरुद्धची वनडे मालिका
2
“कोणतीही तडजोड अमान्य, अशी कारवाई करू की...”; Indigo प्रकरणी केंद्र सरकारची कठोर भूमिका
3
वयाच्या ६७ व्या वर्षी २५ वर्षांच्या तरुणीशी लग्न; संशयास्पद मृत्यूनंतर सून म्हणते, "लग्नानंतर दररोज..."
4
"IndiGo चा गोंधळ, प्रवाशांना त्रास हे भाजपा सरकारच्या नाकर्तेपणाचं उदाहरण"; विरोधक कडाडले
5
Yashasvi Jaiswal Century : आधी कसोटी खेळला! मग टी-२० स्टाईलमध्ये साजरी केली वनडेतील पहिली सेंच्युरी
6
“चार्टर्ड अकाउंटंटच देशाचे आर्थिक शिल्पकार”; ICAI परिषदेत DCM एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन
7
“संवैधानिक मुल्ये पायदळी तुडवणाऱ्या शक्तींविरोधात संघर्ष करण्याची वेळ”: हर्षवर्धन सपकाळ
8
Uddhav Thackeray : ​​​​​​​"...तर उपमुख्यमंत्रीपद रद्द करा", उद्धव ठाकरे यांची सरकारकडे मोठी मागणी
9
'लाडकी बहिण योजना' सर्वात जास्त 'लाडकी'! ४६% पुरुषांचाही महिलांच्या आर्थिक उन्नतीला पाठिंबा
10
अबतक २००००! हिटमॅन रोहित शर्मानं रचला इतिहास; आंतरारष्ट्रीय क्रिकेटमध्ये गाठला मैलाचा पल्ला
11
एकनाथ शिंदेमुळेच भाजपा पुन्हा सत्तेत, ताकदवान व्हायला उठावच कारणीभूत - शंभूराज देसाई
12
अरे बापरे! Grok वापरणाऱ्यांनो सावधान; लोकांच्या घराचे पत्ते, पर्सनल माहिती लीक, प्रायव्हसी धोक्यात
13
IND vs SA : कुलदीप KL राहुलकडे DRS चा हट्ट धरायला गेला, मग हिटमॅन रोहित 'कॅप्टन' झाला अन्... (VIDEO)
14
एलॉन मस्क यांच्या 'X' ला तब्बल १०८० कोटींचा दंड ! 'ब्लू टीक' संदर्भातील प्रकरणात बसला दणका
15
GenZमध्ये महाराष्ट्र सरकारची कार्यशैली लोकप्रिय; ६७% तरुणाईला देवेंद्र फडणवीसांवर 'विश्वास'
16
मार्गशीर्ष संकष्ट चतुर्थी २०२५: ‘या’ ५ गोष्टी अवश्य अर्पण करा; गणपतीची कायम कृपा मिळवा!
17
२०२६ला ६ महिन्यातच सगळी संकटे समस्या दूर होतील; संकष्ट चतुर्थीपासून ‘ही’ उपासना सुरू करा!
18
समस्या संपत नाहीत, पैसा राहत नाही? गणेशाचे प्रभावी स्तोत्र ११ वेळा म्हणा; अद्भूत अनुभव घ्या!
19
'बिनशर्त माफी मागा, अन्यथा पाच कोटींचा दावा ठोकणार' महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माजी मंत्री सुलेखा कुंभारे यांना नोटीस
20
America Visa : सोशल मीडियावर एक चूक कराल, तर तुमच्यासाठी बंद होतील अमेरिकेचे दरवाजे! काय आहे नियम?
Daily Top 2Weekly Top 5

"दिल टूट गया है..", कॉमेडियन श्याम रंगीलाचा उमेदवारी अर्ज फेटाळला, वाराणसीतून लढवता येणार नाही निवडणूक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2024 22:01 IST

lok sabha election 2024 : उमेदवारी रद्द झाल्याची माहिती श्याम रंगीलाने ट्विटरवरून दिली आहे. 

वाराणसी : सध्या देशात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांकडून प्रचारासोबत अर्ज भरण्यासाठी जोरदार तयारी सुरु आहे. दरम्यान, कॉमेडियन श्याम रंगीला याचा उमेदवारी अर्ज फेटाळण्यात आला. श्याम रंगीला वाराणसीतून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र, उमेदवारी अर्जात त्रुटी आढळल्याने त्याचा उमेदवारी अर्ज फेटाळण्यात आला. दरम्यान, उमेदवारी रद्द झाल्याची माहिती श्याम रंगीलाने ट्विटरवरून दिली आहे. 

उमेदवारी रद्द झाल्यानंतर श्याम रंगीला म्हणाला, "वाराणसीतून आपल्याला उमेदवारी दिली जाणार नाही, हे आता स्पष्ट झाले आहे. हृदय नक्कीच तुटले आहे, धैर्य तुटलेले नाही. तुमच्या सर्व सहकार्याबद्दल धन्यवाद. प्रसारमाध्यमांना आणि हितचिंतकांना विनंती आहे की, कृपया आता फोन करू नका, माझ्याकडे जी काही माहिती असेल, ती मी इथे देत राहीन, कदाचित आता थोडा वेळ बोलायची इच्छा नाही."

पुढे श्याम रंगीला म्हणाला, "माझ्यासारख्या अनेकांना, जे पहिल्यांदाच निवडणूक लढवत होते, त्यांना याची माहिती नव्हती. अशा परिस्थितीत कोणती कागदपत्रे सादर करायची आहेत. हे सांगणे हे निवडणूक अधिकाऱ्यांचे काम असले पाहिजे. अधिकारी काहीच बोलले नाहीत. फक्त चार पावत्या घेतल्या, डिपॉझिट स्लिप घेतली आणि आम्हाला बाहेर पाठवले. बाहेर आल्यानंतर आम्हाला वाटले की, आमचे नामांकन झाले आहे. मी माझ्या वकिलाला ते दाखवले तेव्हा त्यांनी थोडी चिंता व्यक्त केली, पण त्यात लिहिलेली वेळ अशी होती की, १४ मे रोजी ११ वाजेपर्यंत दुरुस्ती सादर करता येईल." 

"रात्री आम्ही धावत गेलो, पण मदत मिळाली नाही. सकाळी रांगेत उभा होतो. सायंकाळी ५ वाजता माझा नंबर लागला. यादरम्यान अजय राय यांनी १३ मे रोजी आमच्यासमोर उमेदवारी दाखल केली आणि ५ मिनिटांत ते निघून गेले. आम्ही नेते नसून सामान्य जनता होतो आणि लढायला बाहेर पडलो होतो. तसेच, इंदूर आणि सुरतमध्ये जे काही घडले, ते आम्हाला चुकीचे वाटले, म्हणून आम्ही संदेश देण्यासाठी वाराणसीतून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता. आमचा संदेश इतका जोरदार जाईल, याची आम्हाला कल्पना नव्हती", असे श्याम रंगीला म्हणाला.

अखेरच्या दिवशी अनेक उमेदवारांनी दाखल केले अर्ज वाराणसी लोकसभा मतदारसंघातून अनेक अपक्ष उमेदवार रिंगणात आहेत. उमेदवारी अर्जाच्या शेवटच्या दिवशी भाजपाचे उमेदवार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशिवाय लोक पार्टीचे विनय कुमार त्रिपाठी, भाजपाचे सुरेंद्र नारायण सिंह, अपक्ष उमेदवार दिनेशकुमार यादव, रीना राय, नेहा जैस्वाल, अजित कुमार जैस्वाल, अशोक कुमार पांडे, संदीप त्रिपाठी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशvaranasi-pcवाराणसीUttar Pradesh Lok Sabha Election 2024उत्तर प्रदेश लोकसभा निवडणूक निकाल २०२४lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४