शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
3
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
4
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
5
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
6
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
7
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
8
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
9
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
10
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
11
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
12
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
13
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
14
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
15
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
16
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
17
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
18
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
19
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?

१९७१च्या भारत पाक युद्धावेळी बेपत्ता झालेला नवरा ४९ वर्षांनी जिवंत असल्याचं कळालं अन्... 

By पूनम अपराज | Updated: December 16, 2020 14:49 IST

1971 Indo - pak War : वास्तविक, सत्याचा नवरा मंगल सिंग १९६२च्या सुमारास भारतीय सैन्यात भरती झाला होता.१९७१मध्ये लान्स नाईक मंगल सिंगची रांची येथून कोलकाता येथे बदली झाली आणि त्यांची जबाबदारी बांगलादेशच्या मोर्चावर झाली.

ठळक मुद्देसत्या यांच्याबरोबर दोन मुलगेही ४९ वर्षे वडील मंगल सिंगच्या परत येण्याची वाट पहात आहेत. मंगल सिंगाचा मुलगा सेवानिवृत्त सैनिक दलजित सिंग म्हणाले की, गेल्या ४९ वर्षात मी माझ्या वडिलांच्या सुटकेसाठी खूप प्रयत्न केले. भारत आणि पाकिस्तान दरम्यान १९७१ मध्ये युद्ध झाले होते. या युद्धानंतरच पाकिस्तान दोन भागात विभागला गेला आणि बांगलादेशचा जन्म झाला. हे युद्ध ३ डिसेंबर १९७१ रोजी सुरू झाले आणि हा संघर्ष १६ डिसेंबर १९७१ पर्यंत चालला. सैनिकी इतिहासात या युद्धाला ढाल ऑफ ढाका अ

जालंधरच्या दातार शहरातील ७५ वर्षीय सत्या देवी यांची गोष्ट सामान्य महिलांसाठी एक असामान्य उदाहरण आहे. १९७१च्या युद्धात तिचा नवरा मंगल सिंग बेपत्ता झाला होता आणि नंतर त्यांना पाकिस्तानी सैन्याने अटक केली होती. त्यावेळी मंगल फक्त 27 वर्षांचा होता. सत्या देवीच्या पदरात दोन मुलगे होते. तेव्हापासून सत्याने पतीची प्रतीक्षा करण्यासाठी अनेक दशके घालवली आहेत, परंतु परराष्ट्र मंत्र्यांकडून नुकतेच प्राप्त झालेल्या पत्राने सत्याच्या आशा आता उंचावल्या आहेत. 

वास्तविक, सत्या देवी यांचा नवरा मंगल सिंग १९६२च्या सुमारास भारतीय सैन्यात भरती झाले होते.१९७१मध्ये लान्स नाईक मंगल सिंगची रांची येथून कोलकाता येथे बदली झाली आणि त्यांची जबाबदारी बांगलादेशच्या मोर्चावर झाली. काही दिवसांनंतर सैन्यातून एक टेलिग्राम आला की बांगलादेशात सैनिकांना नेणारी बोट बुडाली आणि मंगल सिंग यांच्यासह सर्व सैनिक मृत्युमुखी पडले. 

तेव्हापासून सत्या तिच्या नवऱ्याच्या परत येण्याची वाट पहात होता. मंगल याने सुटकेचा आग्रह धरला पण काहीच मदत मिळू शकली नाही. सत्या देवीने मुलांना मोठं करताना पतीची वाट पाहण्याची आशा सोडली नाही. कित्येक वर्षांनी भारत सरकारला अनेक पत्रे पाठविल्यानंतर, त्यांचे प्रयत्न संपले. आता ४९ वर्षानंतर, गेल्या आठवड्यात राष्ट्रपती आणि परराष्ट्र मंत्रालयाच्या कार्यालयाकडून एक पत्र पाठवून, सत्याला पती जिवंत असल्याची आनंदाची माहिती मिळाली आहे.परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, मंगल सिंग पाकिस्तानच्या कोट लखपत कारागृहात बंद आहे. पाकिस्तान सरकारशी बोलून त्यांच्या सुटकेला गती देण्यासाठी प्रयत्न केले जातील. सत्या आणि त्यांचे दोन मुलगे गेली ४९ वर्षे मंगल यांना पाहण्याच्या प्रतीक्षेत आहेत, आता त्यांना लवकरच परत येण्याची आशा आहे आणि यासाठी त्यांनी सरकारला आवाहनही केले आहे.परराष्ट्र मंत्रालयाकडून पत्र मिळाल्यानंतर सत्या देवी म्हणतात की, आता तिला आशा आहे की, तिचा नवरा पाकिस्तान तुरूंगातून सुटेल आणि आम्ही त्यांना भेटू शकू. पुढे ते म्हणाले की, मुलांना वाढविण्यात मला अनेक संघर्षांचा सामना करावा लागला परंतु मी कधीही हार मानली नाही. आता मला आशा आहे की, लवकरच माझा नवरा परत येईल.सत्या यांच्याबरोबर दोन मुलगेही ४९ वर्षे वडील मंगल सिंगच्या परत येण्याची वाट पहात आहेत. मंगल सिंगाचा मुलगा सेवानिवृत्त सैनिक दलजित सिंग म्हणाले की, गेल्या ४९ वर्षात मी माझ्या वडिलांच्या सुटकेसाठी खूप प्रयत्न केले. पण अद्यापपर्यंत कोणतेही यश मिळू शकलेले नाही. ते म्हणतात की, १९७१ मध्ये मी फक्त ३ वर्षांचा होतो आणि तेव्हापासून माझ्या वडिलांच्या भेटीची वाट पाहत होतो. भारत आणि पाकिस्तान दरम्यान १९७१ मध्ये युद्ध झाले होते. या युद्धानंतरच पाकिस्तान दोन भागात विभागला गेला आणि बांगलादेशचा जन्म झाला. हे युद्ध ३ डिसेंबर १९७१ रोजी सुरू झाले आणि हा संघर्ष १६ डिसेंबर १९७१ पर्यंत चालला. सैनिकी इतिहासात या युद्धाला ढाल ऑफ ढाका असेही म्हणतात.

टॅग्स :warयुद्धMissingबेपत्ता होणंSoldierसैनिकPakistanपाकिस्तानIndiaभारतPunjabपंजाब