शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

१९७१च्या भारत पाक युद्धावेळी बेपत्ता झालेला नवरा ४९ वर्षांनी जिवंत असल्याचं कळालं अन्... 

By पूनम अपराज | Updated: December 16, 2020 14:49 IST

1971 Indo - pak War : वास्तविक, सत्याचा नवरा मंगल सिंग १९६२च्या सुमारास भारतीय सैन्यात भरती झाला होता.१९७१मध्ये लान्स नाईक मंगल सिंगची रांची येथून कोलकाता येथे बदली झाली आणि त्यांची जबाबदारी बांगलादेशच्या मोर्चावर झाली.

ठळक मुद्देसत्या यांच्याबरोबर दोन मुलगेही ४९ वर्षे वडील मंगल सिंगच्या परत येण्याची वाट पहात आहेत. मंगल सिंगाचा मुलगा सेवानिवृत्त सैनिक दलजित सिंग म्हणाले की, गेल्या ४९ वर्षात मी माझ्या वडिलांच्या सुटकेसाठी खूप प्रयत्न केले. भारत आणि पाकिस्तान दरम्यान १९७१ मध्ये युद्ध झाले होते. या युद्धानंतरच पाकिस्तान दोन भागात विभागला गेला आणि बांगलादेशचा जन्म झाला. हे युद्ध ३ डिसेंबर १९७१ रोजी सुरू झाले आणि हा संघर्ष १६ डिसेंबर १९७१ पर्यंत चालला. सैनिकी इतिहासात या युद्धाला ढाल ऑफ ढाका अ

जालंधरच्या दातार शहरातील ७५ वर्षीय सत्या देवी यांची गोष्ट सामान्य महिलांसाठी एक असामान्य उदाहरण आहे. १९७१च्या युद्धात तिचा नवरा मंगल सिंग बेपत्ता झाला होता आणि नंतर त्यांना पाकिस्तानी सैन्याने अटक केली होती. त्यावेळी मंगल फक्त 27 वर्षांचा होता. सत्या देवीच्या पदरात दोन मुलगे होते. तेव्हापासून सत्याने पतीची प्रतीक्षा करण्यासाठी अनेक दशके घालवली आहेत, परंतु परराष्ट्र मंत्र्यांकडून नुकतेच प्राप्त झालेल्या पत्राने सत्याच्या आशा आता उंचावल्या आहेत. 

वास्तविक, सत्या देवी यांचा नवरा मंगल सिंग १९६२च्या सुमारास भारतीय सैन्यात भरती झाले होते.१९७१मध्ये लान्स नाईक मंगल सिंगची रांची येथून कोलकाता येथे बदली झाली आणि त्यांची जबाबदारी बांगलादेशच्या मोर्चावर झाली. काही दिवसांनंतर सैन्यातून एक टेलिग्राम आला की बांगलादेशात सैनिकांना नेणारी बोट बुडाली आणि मंगल सिंग यांच्यासह सर्व सैनिक मृत्युमुखी पडले. 

तेव्हापासून सत्या तिच्या नवऱ्याच्या परत येण्याची वाट पहात होता. मंगल याने सुटकेचा आग्रह धरला पण काहीच मदत मिळू शकली नाही. सत्या देवीने मुलांना मोठं करताना पतीची वाट पाहण्याची आशा सोडली नाही. कित्येक वर्षांनी भारत सरकारला अनेक पत्रे पाठविल्यानंतर, त्यांचे प्रयत्न संपले. आता ४९ वर्षानंतर, गेल्या आठवड्यात राष्ट्रपती आणि परराष्ट्र मंत्रालयाच्या कार्यालयाकडून एक पत्र पाठवून, सत्याला पती जिवंत असल्याची आनंदाची माहिती मिळाली आहे.परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, मंगल सिंग पाकिस्तानच्या कोट लखपत कारागृहात बंद आहे. पाकिस्तान सरकारशी बोलून त्यांच्या सुटकेला गती देण्यासाठी प्रयत्न केले जातील. सत्या आणि त्यांचे दोन मुलगे गेली ४९ वर्षे मंगल यांना पाहण्याच्या प्रतीक्षेत आहेत, आता त्यांना लवकरच परत येण्याची आशा आहे आणि यासाठी त्यांनी सरकारला आवाहनही केले आहे.परराष्ट्र मंत्रालयाकडून पत्र मिळाल्यानंतर सत्या देवी म्हणतात की, आता तिला आशा आहे की, तिचा नवरा पाकिस्तान तुरूंगातून सुटेल आणि आम्ही त्यांना भेटू शकू. पुढे ते म्हणाले की, मुलांना वाढविण्यात मला अनेक संघर्षांचा सामना करावा लागला परंतु मी कधीही हार मानली नाही. आता मला आशा आहे की, लवकरच माझा नवरा परत येईल.सत्या यांच्याबरोबर दोन मुलगेही ४९ वर्षे वडील मंगल सिंगच्या परत येण्याची वाट पहात आहेत. मंगल सिंगाचा मुलगा सेवानिवृत्त सैनिक दलजित सिंग म्हणाले की, गेल्या ४९ वर्षात मी माझ्या वडिलांच्या सुटकेसाठी खूप प्रयत्न केले. पण अद्यापपर्यंत कोणतेही यश मिळू शकलेले नाही. ते म्हणतात की, १९७१ मध्ये मी फक्त ३ वर्षांचा होतो आणि तेव्हापासून माझ्या वडिलांच्या भेटीची वाट पाहत होतो. भारत आणि पाकिस्तान दरम्यान १९७१ मध्ये युद्ध झाले होते. या युद्धानंतरच पाकिस्तान दोन भागात विभागला गेला आणि बांगलादेशचा जन्म झाला. हे युद्ध ३ डिसेंबर १९७१ रोजी सुरू झाले आणि हा संघर्ष १६ डिसेंबर १९७१ पर्यंत चालला. सैनिकी इतिहासात या युद्धाला ढाल ऑफ ढाका असेही म्हणतात.

टॅग्स :warयुद्धMissingबेपत्ता होणंSoldierसैनिकPakistanपाकिस्तानIndiaभारतPunjabपंजाब