शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
2
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
3
१ रुपया द्या आणि एसी घ्या, नव्या GST दरांवर सुरू केलं बुकिंग; ग्राहकांना खेचण्यासाठी कंपन्यांमध्ये स्पर्धा
4
'स्पोर्टिंग क्लब'च्या निवडणुकीत शिंदेसेनेला शह देण्यासाठी झाली भाजपा-मनसे-उद्धवसेनेची युती
5
TVS Success Story: इंग्रजांसमोर हार मानली नाही, बँकेची नोकरी सोडून सायकल रिपेरिंगचं काम सुरू केलं; आज आहे ₹१,६६,२०० कोटींची कंपनी
6
Crime: ट्यूशनसाठी गेली, नंतर तुकड्या-तुकड्यांमध्ये मिळाला मुलीचा मृतदेह; आईवडिलांचा आक्रोश, शिक्षकानेच...
7
पितृपक्ष २०२५: स्वतःचे आणि कुटुंबाचे पिंडदान केल्यावरच नागा साधू बनता येते; सविस्तर वाचा
8
आईकडे संपत्ती नसली, तरीही मुलांच्या संगोपनाचा तिला हक्क; जम्मू-काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयाचा निर्णय
9
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
10
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
11
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
12
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
13
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
14
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
15
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
16
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
17
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
18
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
19
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
20
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच

१९७१च्या भारत पाक युद्धावेळी बेपत्ता झालेला नवरा ४९ वर्षांनी जिवंत असल्याचं कळालं अन्... 

By पूनम अपराज | Updated: December 16, 2020 14:49 IST

1971 Indo - pak War : वास्तविक, सत्याचा नवरा मंगल सिंग १९६२च्या सुमारास भारतीय सैन्यात भरती झाला होता.१९७१मध्ये लान्स नाईक मंगल सिंगची रांची येथून कोलकाता येथे बदली झाली आणि त्यांची जबाबदारी बांगलादेशच्या मोर्चावर झाली.

ठळक मुद्देसत्या यांच्याबरोबर दोन मुलगेही ४९ वर्षे वडील मंगल सिंगच्या परत येण्याची वाट पहात आहेत. मंगल सिंगाचा मुलगा सेवानिवृत्त सैनिक दलजित सिंग म्हणाले की, गेल्या ४९ वर्षात मी माझ्या वडिलांच्या सुटकेसाठी खूप प्रयत्न केले. भारत आणि पाकिस्तान दरम्यान १९७१ मध्ये युद्ध झाले होते. या युद्धानंतरच पाकिस्तान दोन भागात विभागला गेला आणि बांगलादेशचा जन्म झाला. हे युद्ध ३ डिसेंबर १९७१ रोजी सुरू झाले आणि हा संघर्ष १६ डिसेंबर १९७१ पर्यंत चालला. सैनिकी इतिहासात या युद्धाला ढाल ऑफ ढाका अ

जालंधरच्या दातार शहरातील ७५ वर्षीय सत्या देवी यांची गोष्ट सामान्य महिलांसाठी एक असामान्य उदाहरण आहे. १९७१च्या युद्धात तिचा नवरा मंगल सिंग बेपत्ता झाला होता आणि नंतर त्यांना पाकिस्तानी सैन्याने अटक केली होती. त्यावेळी मंगल फक्त 27 वर्षांचा होता. सत्या देवीच्या पदरात दोन मुलगे होते. तेव्हापासून सत्याने पतीची प्रतीक्षा करण्यासाठी अनेक दशके घालवली आहेत, परंतु परराष्ट्र मंत्र्यांकडून नुकतेच प्राप्त झालेल्या पत्राने सत्याच्या आशा आता उंचावल्या आहेत. 

वास्तविक, सत्या देवी यांचा नवरा मंगल सिंग १९६२च्या सुमारास भारतीय सैन्यात भरती झाले होते.१९७१मध्ये लान्स नाईक मंगल सिंगची रांची येथून कोलकाता येथे बदली झाली आणि त्यांची जबाबदारी बांगलादेशच्या मोर्चावर झाली. काही दिवसांनंतर सैन्यातून एक टेलिग्राम आला की बांगलादेशात सैनिकांना नेणारी बोट बुडाली आणि मंगल सिंग यांच्यासह सर्व सैनिक मृत्युमुखी पडले. 

तेव्हापासून सत्या तिच्या नवऱ्याच्या परत येण्याची वाट पहात होता. मंगल याने सुटकेचा आग्रह धरला पण काहीच मदत मिळू शकली नाही. सत्या देवीने मुलांना मोठं करताना पतीची वाट पाहण्याची आशा सोडली नाही. कित्येक वर्षांनी भारत सरकारला अनेक पत्रे पाठविल्यानंतर, त्यांचे प्रयत्न संपले. आता ४९ वर्षानंतर, गेल्या आठवड्यात राष्ट्रपती आणि परराष्ट्र मंत्रालयाच्या कार्यालयाकडून एक पत्र पाठवून, सत्याला पती जिवंत असल्याची आनंदाची माहिती मिळाली आहे.परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, मंगल सिंग पाकिस्तानच्या कोट लखपत कारागृहात बंद आहे. पाकिस्तान सरकारशी बोलून त्यांच्या सुटकेला गती देण्यासाठी प्रयत्न केले जातील. सत्या आणि त्यांचे दोन मुलगे गेली ४९ वर्षे मंगल यांना पाहण्याच्या प्रतीक्षेत आहेत, आता त्यांना लवकरच परत येण्याची आशा आहे आणि यासाठी त्यांनी सरकारला आवाहनही केले आहे.परराष्ट्र मंत्रालयाकडून पत्र मिळाल्यानंतर सत्या देवी म्हणतात की, आता तिला आशा आहे की, तिचा नवरा पाकिस्तान तुरूंगातून सुटेल आणि आम्ही त्यांना भेटू शकू. पुढे ते म्हणाले की, मुलांना वाढविण्यात मला अनेक संघर्षांचा सामना करावा लागला परंतु मी कधीही हार मानली नाही. आता मला आशा आहे की, लवकरच माझा नवरा परत येईल.सत्या यांच्याबरोबर दोन मुलगेही ४९ वर्षे वडील मंगल सिंगच्या परत येण्याची वाट पहात आहेत. मंगल सिंगाचा मुलगा सेवानिवृत्त सैनिक दलजित सिंग म्हणाले की, गेल्या ४९ वर्षात मी माझ्या वडिलांच्या सुटकेसाठी खूप प्रयत्न केले. पण अद्यापपर्यंत कोणतेही यश मिळू शकलेले नाही. ते म्हणतात की, १९७१ मध्ये मी फक्त ३ वर्षांचा होतो आणि तेव्हापासून माझ्या वडिलांच्या भेटीची वाट पाहत होतो. भारत आणि पाकिस्तान दरम्यान १९७१ मध्ये युद्ध झाले होते. या युद्धानंतरच पाकिस्तान दोन भागात विभागला गेला आणि बांगलादेशचा जन्म झाला. हे युद्ध ३ डिसेंबर १९७१ रोजी सुरू झाले आणि हा संघर्ष १६ डिसेंबर १९७१ पर्यंत चालला. सैनिकी इतिहासात या युद्धाला ढाल ऑफ ढाका असेही म्हणतात.

टॅग्स :warयुद्धMissingबेपत्ता होणंSoldierसैनिकPakistanपाकिस्तानIndiaभारतPunjabपंजाब