शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

१९७१च्या भारत पाक युद्धावेळी बेपत्ता झालेला नवरा ४९ वर्षांनी जिवंत असल्याचं कळालं अन्... 

By पूनम अपराज | Updated: December 16, 2020 14:49 IST

1971 Indo - pak War : वास्तविक, सत्याचा नवरा मंगल सिंग १९६२च्या सुमारास भारतीय सैन्यात भरती झाला होता.१९७१मध्ये लान्स नाईक मंगल सिंगची रांची येथून कोलकाता येथे बदली झाली आणि त्यांची जबाबदारी बांगलादेशच्या मोर्चावर झाली.

ठळक मुद्देसत्या यांच्याबरोबर दोन मुलगेही ४९ वर्षे वडील मंगल सिंगच्या परत येण्याची वाट पहात आहेत. मंगल सिंगाचा मुलगा सेवानिवृत्त सैनिक दलजित सिंग म्हणाले की, गेल्या ४९ वर्षात मी माझ्या वडिलांच्या सुटकेसाठी खूप प्रयत्न केले. भारत आणि पाकिस्तान दरम्यान १९७१ मध्ये युद्ध झाले होते. या युद्धानंतरच पाकिस्तान दोन भागात विभागला गेला आणि बांगलादेशचा जन्म झाला. हे युद्ध ३ डिसेंबर १९७१ रोजी सुरू झाले आणि हा संघर्ष १६ डिसेंबर १९७१ पर्यंत चालला. सैनिकी इतिहासात या युद्धाला ढाल ऑफ ढाका अ

जालंधरच्या दातार शहरातील ७५ वर्षीय सत्या देवी यांची गोष्ट सामान्य महिलांसाठी एक असामान्य उदाहरण आहे. १९७१च्या युद्धात तिचा नवरा मंगल सिंग बेपत्ता झाला होता आणि नंतर त्यांना पाकिस्तानी सैन्याने अटक केली होती. त्यावेळी मंगल फक्त 27 वर्षांचा होता. सत्या देवीच्या पदरात दोन मुलगे होते. तेव्हापासून सत्याने पतीची प्रतीक्षा करण्यासाठी अनेक दशके घालवली आहेत, परंतु परराष्ट्र मंत्र्यांकडून नुकतेच प्राप्त झालेल्या पत्राने सत्याच्या आशा आता उंचावल्या आहेत. 

वास्तविक, सत्या देवी यांचा नवरा मंगल सिंग १९६२च्या सुमारास भारतीय सैन्यात भरती झाले होते.१९७१मध्ये लान्स नाईक मंगल सिंगची रांची येथून कोलकाता येथे बदली झाली आणि त्यांची जबाबदारी बांगलादेशच्या मोर्चावर झाली. काही दिवसांनंतर सैन्यातून एक टेलिग्राम आला की बांगलादेशात सैनिकांना नेणारी बोट बुडाली आणि मंगल सिंग यांच्यासह सर्व सैनिक मृत्युमुखी पडले. 

तेव्हापासून सत्या तिच्या नवऱ्याच्या परत येण्याची वाट पहात होता. मंगल याने सुटकेचा आग्रह धरला पण काहीच मदत मिळू शकली नाही. सत्या देवीने मुलांना मोठं करताना पतीची वाट पाहण्याची आशा सोडली नाही. कित्येक वर्षांनी भारत सरकारला अनेक पत्रे पाठविल्यानंतर, त्यांचे प्रयत्न संपले. आता ४९ वर्षानंतर, गेल्या आठवड्यात राष्ट्रपती आणि परराष्ट्र मंत्रालयाच्या कार्यालयाकडून एक पत्र पाठवून, सत्याला पती जिवंत असल्याची आनंदाची माहिती मिळाली आहे.परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, मंगल सिंग पाकिस्तानच्या कोट लखपत कारागृहात बंद आहे. पाकिस्तान सरकारशी बोलून त्यांच्या सुटकेला गती देण्यासाठी प्रयत्न केले जातील. सत्या आणि त्यांचे दोन मुलगे गेली ४९ वर्षे मंगल यांना पाहण्याच्या प्रतीक्षेत आहेत, आता त्यांना लवकरच परत येण्याची आशा आहे आणि यासाठी त्यांनी सरकारला आवाहनही केले आहे.परराष्ट्र मंत्रालयाकडून पत्र मिळाल्यानंतर सत्या देवी म्हणतात की, आता तिला आशा आहे की, तिचा नवरा पाकिस्तान तुरूंगातून सुटेल आणि आम्ही त्यांना भेटू शकू. पुढे ते म्हणाले की, मुलांना वाढविण्यात मला अनेक संघर्षांचा सामना करावा लागला परंतु मी कधीही हार मानली नाही. आता मला आशा आहे की, लवकरच माझा नवरा परत येईल.सत्या यांच्याबरोबर दोन मुलगेही ४९ वर्षे वडील मंगल सिंगच्या परत येण्याची वाट पहात आहेत. मंगल सिंगाचा मुलगा सेवानिवृत्त सैनिक दलजित सिंग म्हणाले की, गेल्या ४९ वर्षात मी माझ्या वडिलांच्या सुटकेसाठी खूप प्रयत्न केले. पण अद्यापपर्यंत कोणतेही यश मिळू शकलेले नाही. ते म्हणतात की, १९७१ मध्ये मी फक्त ३ वर्षांचा होतो आणि तेव्हापासून माझ्या वडिलांच्या भेटीची वाट पाहत होतो. भारत आणि पाकिस्तान दरम्यान १९७१ मध्ये युद्ध झाले होते. या युद्धानंतरच पाकिस्तान दोन भागात विभागला गेला आणि बांगलादेशचा जन्म झाला. हे युद्ध ३ डिसेंबर १९७१ रोजी सुरू झाले आणि हा संघर्ष १६ डिसेंबर १९७१ पर्यंत चालला. सैनिकी इतिहासात या युद्धाला ढाल ऑफ ढाका असेही म्हणतात.

टॅग्स :warयुद्धMissingबेपत्ता होणंSoldierसैनिकPakistanपाकिस्तानIndiaभारतPunjabपंजाब