शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
3
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
4
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
5
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
7
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
8
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
9
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
10
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
11
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
12
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
13
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
14
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
15
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
16
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
17
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
18
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
19
मस्तच! नवरात्रात कन्या पूजनानंतर मुलींना द्या 'ही' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकल्यांचे चेहरे
20
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  

नोटाबंदीनंतर आता 'नाणेबंदी'?, देशातील चारही टांकसाळीमध्ये उत्पादन बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2018 16:06 IST

नोटाबंदीनंतर आता केंद्र सरकार पुन्हा एक मोठा निर्णय घेण्याच्या विचारात आहे.

नवी दिल्ली- केंद्रातील मोदी सरकारला चार वर्ष पूर्ण होणार आहेत. चार वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करणाऱ्या केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने आर्थिक सुधारणा घडवून आणण्यासाठी नोटाबंदी सारखा महत्त्वाचा निर्णय घेतला. नोटाबंदीनंतर आता केंद्र सरकार पुन्हा एक मोठा निर्णय घेण्याच्या विचारात आहे. नोटाबंदीनंतर आता नाणेबंदी करण्याच्या तयारीत सरकार असल्याचं समजतं आहे. आजतकने हे वृत्त दिलं आहे. 

भारतात नोएडा, मुंबई, कोलकाता आणि हैदराबाद या चार ठिकाणच्या टांकसाळमध्ये नाण्याचं उत्पादन केलं जातं. पण आता या चारही टांकसाळीमध्ये मंगळवारपासून नाण्यांचं उत्पादन करणं बंद करण्यात आलं आहे, अशी माहिती आरबीआयच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. नोटाबंदीनंतर मोठ्याप्रमाणावर नाणी चलनात आणण्यात आली होती. नाण्यांचं उत्पादन मोठ्याप्रमाणावर करण्यात आलं होतं. त्यामुळे आरबीआयच्या स्टोरमध्ये नाण्यांचा साठा जास्त झाला आहे. त्यामुळेच आरबीआयने पुढील आदेश मिळेपर्यंत नाणी पाडण्याचं काम बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

मोदी सरकारने 8 नोव्हेंबर 2016 रोजी नोटाबंदी करण्याचा निर्णय घेतला होता. सरकारने ५०० आणि हजाराच्या नोटा बेकायदेशीर असल्याचं जाहीर केलं होतं. भ्रष्टाचार आणि काळा पैसा रोखण्यासाठीच हा निर्णय घेण्यात आल्याचं सरकारने सांगितलं होतं. या नोटा बंद केल्यानंतर सरकारने नव्या ५०० आणि दोन हजार रुपयांच्या नोटा बाजारात चलनात आणल्या होत्या. नोटाबंदीनंतर विरोधी पक्षांनी सरकारवर टीका करत नोटाबंदीचा प्रयोग फसल्याचं म्हंटलं होतं. नोटाबंदीच्या निर्णयानंतर देशातील एकत्र 85 टक्के करंसी रद्द करण्यात आली होती.  

टॅग्स :Note BanनोटाबंदीNarendra Modiनरेंद्र मोदीReserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँक