शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

CM Yogi : 'भाजपने इशारा दिल्यानेच राज्यात साडे चार वर्षात एकही दंगल नाही'

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2021 19:29 IST

उत्तर प्रदेशात यापूर्वीच्या सरकारमध्ये दंगली होत, खोट्या तक्रारी आणि गुन्हे दाखल केले जात. मूर्तीकारांच्या मुर्ती विकल्या जात नव्हत्या, दिवे बनविणाऱ्यांचे दिवेही विकले जात नसत.

ठळक मुद्देराज्यात मागील सरकारच्या काळात दंगली झाल्या, शांतता भंग झाली. पण, आता राज्य विकासाच्या मार्गावर असताना त्यांना हे पचनी पडत नाही, असा आरोप योगींनी केला आहे. 

लखनौ - उत्तर प्रदेशात आगामी विधानसभा निवडणुकांची चाहुल लागली असून नेतेमंडळींच्या भाषणातून याची जाणीव होते. भाजपा नेते आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सातत्याने विकासकामे आणि सरकारच्या यशस्वीतेची माहिती वेगवेगळ्या कार्यक्रमाद्वारे देताना दिसत आहेत. आता, उत्तर प्रदेशात गेल्या साडे चार वर्षात एकही दंगल झाली नसल्याचे त्यांनी म्हटलं आहे. यापूर्वी राज्याची ओळखच दंगलखोर अशी होती. मात्र, गेल्या 4.5 वर्षात एकही दंगल झाली नसल्याचं योगींनी म्हटलं. 

उत्तर प्रदेशात यापूर्वीच्या सरकारमध्ये दंगली होत, खोट्या तक्रारी आणि गुन्हे दाखल केले जात. मूर्तीकारांच्या मुर्ती विकल्या जात नव्हत्या, दिवे बनविणाऱ्यांचे दिवेही विकले जात नसत. सणासुदीला अंध:कार असायचा. मात्र, गेल्या 4.5 वर्षात आपण पाहिलंच आहे, राज्यात एकही दंगल झाली नाही, असे योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं आहे.

भाजपा सरकारने दंगलखोरांना पहिल्याच दिवशी इशारा दिला होता, जर दंगल कराल तर पुढील सात पिढ्यांना त्यांचे परिणाम भोगावे लागतील. योगींनी मागासवर्ग संमलेनात बोलताना राज्यात शांतता असल्याचे म्हटले. यापूर्वी 2017 च्या अगोदर राज्यात ज्या पक्षाचं सरकार होतं, तेही विकासाच्या बाता मारायचे, पण विकास केवळ त्यांच्याच घरचा झाला. स्वत:च्या कुटुंबीयांशिवाय त्यांना समाज आणि राष्ट्राची अजिबात काळजी नव्हती, असेही योगींनी म्हटले. 

राज्यात मागील सरकारच्या काळात दंगली झाल्या, शांतता भंग झाली. पण, आता राज्य विकासाच्या मार्गावर असताना त्यांना हे पचनी पडत नाही, असा आरोप योगींनी केला आहे.  

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथUttar Pradeshउत्तर प्रदेशBJPभाजपाcongressकाँग्रेस