शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
4
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
5
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
6
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
7
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
8
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
9
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
10
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
11
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
12
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
13
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
14
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
15
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
16
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
17
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
18
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
19
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
20
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
Daily Top 2Weekly Top 5

CM Yogi : 'भाजपने इशारा दिल्यानेच राज्यात साडे चार वर्षात एकही दंगल नाही'

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2021 19:29 IST

उत्तर प्रदेशात यापूर्वीच्या सरकारमध्ये दंगली होत, खोट्या तक्रारी आणि गुन्हे दाखल केले जात. मूर्तीकारांच्या मुर्ती विकल्या जात नव्हत्या, दिवे बनविणाऱ्यांचे दिवेही विकले जात नसत.

ठळक मुद्देराज्यात मागील सरकारच्या काळात दंगली झाल्या, शांतता भंग झाली. पण, आता राज्य विकासाच्या मार्गावर असताना त्यांना हे पचनी पडत नाही, असा आरोप योगींनी केला आहे. 

लखनौ - उत्तर प्रदेशात आगामी विधानसभा निवडणुकांची चाहुल लागली असून नेतेमंडळींच्या भाषणातून याची जाणीव होते. भाजपा नेते आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सातत्याने विकासकामे आणि सरकारच्या यशस्वीतेची माहिती वेगवेगळ्या कार्यक्रमाद्वारे देताना दिसत आहेत. आता, उत्तर प्रदेशात गेल्या साडे चार वर्षात एकही दंगल झाली नसल्याचे त्यांनी म्हटलं आहे. यापूर्वी राज्याची ओळखच दंगलखोर अशी होती. मात्र, गेल्या 4.5 वर्षात एकही दंगल झाली नसल्याचं योगींनी म्हटलं. 

उत्तर प्रदेशात यापूर्वीच्या सरकारमध्ये दंगली होत, खोट्या तक्रारी आणि गुन्हे दाखल केले जात. मूर्तीकारांच्या मुर्ती विकल्या जात नव्हत्या, दिवे बनविणाऱ्यांचे दिवेही विकले जात नसत. सणासुदीला अंध:कार असायचा. मात्र, गेल्या 4.5 वर्षात आपण पाहिलंच आहे, राज्यात एकही दंगल झाली नाही, असे योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं आहे.

भाजपा सरकारने दंगलखोरांना पहिल्याच दिवशी इशारा दिला होता, जर दंगल कराल तर पुढील सात पिढ्यांना त्यांचे परिणाम भोगावे लागतील. योगींनी मागासवर्ग संमलेनात बोलताना राज्यात शांतता असल्याचे म्हटले. यापूर्वी 2017 च्या अगोदर राज्यात ज्या पक्षाचं सरकार होतं, तेही विकासाच्या बाता मारायचे, पण विकास केवळ त्यांच्याच घरचा झाला. स्वत:च्या कुटुंबीयांशिवाय त्यांना समाज आणि राष्ट्राची अजिबात काळजी नव्हती, असेही योगींनी म्हटले. 

राज्यात मागील सरकारच्या काळात दंगली झाल्या, शांतता भंग झाली. पण, आता राज्य विकासाच्या मार्गावर असताना त्यांना हे पचनी पडत नाही, असा आरोप योगींनी केला आहे.  

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथUttar Pradeshउत्तर प्रदेशBJPभाजपाcongressकाँग्रेस