शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे वडिल पंचत्वात विलीन, योगींनी अशी वाहिली श्रद्धांजली

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2020 13:46 IST

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मंगळवारीही आपल्या निवासस्थानी कोरोनासंदर्भात कोअर टीमची  बैठक घेतली. बैठकीपूर्वी, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांच्या वडिलांना श्रद्धांजली अर्पण केली.

ठळक मुद्देमोठा मुलगा मानेंद्र सिंह यांनी आनंद सिंह बिष्त यांना मुखाग्नी दिलाऋषिकेश येथील गंगा आणि हेवल नदीच्या संगमावरील फूल चट्टी घाट येथे त्यांच्यावर विधिवत अंत्यसंस्कार करण्यात आलेआनंद सिंह बिष्त यांचे सोमवारी दिल्ली येथील एम्समध्ये निधन झाले होते

लखनौ :मुख्यमंत्रीयोगी आदित्यनाथ हे आपल्या पदाच्या कर्तव्याबरोबरच मुलाचे कर्तव्यही पार पाडत आहेत. त्यांचे वडील आनंद सिंह बिष्त यांचे सोमवारी दिल्ली येथील एम्समध्ये निधन झाले. यानंतर आज ऋषिकेश येथील गंगा आणि हेवल नदीच्या संगमावरील फूल चट्टी घाट येथे त्यांच्यावर विधिवत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचा मोठा मुलगा मानेंद्र सिंह बिष्त यांनी त्यांना मुखाग्नी दिला. यावेळी त्यांची मुले शैलेन्द्र सिंह आणि महेंद्र सिंह यांच्यासह संपूर्ण कुटुंब आणि गावातील नागरिक उपस्थित होते.

वडिलांच्या निधनानंतर योगी आदित्य नाथ यांनी त्यांच्या आईला एक भावनीक पत्रही लिहिले होते. तसेच एका योग्याची भूमिका पार पाडत ते कोरोना व्हायरसपासून राज्यातील जनतेला मुक्त करण्याच्या कामालाही लागले. मुख्यमंत्रीयोगी आदित्यनाथ यांनी मंगळवारीही आपल्या निवासस्थानी कोरोनासंदर्भात कोअर टीमची  बैठक घेतली. बैठकीपूर्वी, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांच्या वडिलांना दोन मिनिटे मौन धारण करून श्रद्धांजली अर्पण केली.

वडिलांना दोन मिनिटांची श्रद्धांजली अर्पण केल्यानंतर योगी आदित्यनाथ यांनी बैठकीला सुरुवात केली. यावेळी त्यांनी सर्व अधिकाऱ्यांना नागरी सेवा दिनाच्या शुभेच्छाही दिल्या. 

आईला लिहिले भावनिक पत्र -या पत्रत योगी यांनी म्हटले आहे, की 'पूजनीय वडिलांच्या जाण्याने मला अत्यंत दु:ख झाले आहे. ते माझे जन्मदाता आहेत. आयुष्यात प्रामानिकपणा, कठोर परिश्रम आणि निस्वार्थ तसेच समर्पण भावाने लोक कल्यानाचे कार्य करण्याची शिकवन त्यांनी बालपणी मला दिली. अखेरच्या क्षणी त्यांचे दर्शन घेण्याची अत्यंत इच्छा होती. मात्र, जागतीक महामारी कोरोना व्हायरसविरुद्ध देश लढत आहे. त्यात उत्तर प्रदेशच्या २३ कोटी  जनतेची जबाबदारी  माझ्यावर आहे. मी अखेरचे दर्शन घेऊ शकलो नाही. लॉकडाऊन यशस्वी करणे आणि कोरोनाचा पराभव करण्याच्या योजनेमुळे मला अंत्यविधीला येणे शक्य होणार नाही. पूजनीय आई आणि पूर्वाश्रमीच्या सर्व सदस्यांना विनंती करतो, की लॉकडाऊनचे पालन करून कमीत कमी लोकांनी अंत्यविधी पार पाडावा. पूजनीय वडिलांच्या स्मृतीस कोटी-कोटी प्रणाम करत त्यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो. लॉकडाऊननंतर दर्शनासाठी येईन.'

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथUttar Pradeshउत्तर प्रदेशChief Ministerमुख्यमंत्रीDeathमृत्यू