शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
3
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
4
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
5
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
6
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
7
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
8
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
9
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
10
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
11
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
12
'सिंघम 3' च्या सेटवरुन अजय देवगण-जॅकी श्रॉफचा फाईट सीन लीक, व्हिडीओ व्हायरल
13
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
14
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
15
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
16
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
17
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
18
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
19
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
20
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 

'हे रामराज्य आहे का किलिंग राज्य?', लखीमपूर हिंसाचारावरुन ममता बॅनर्जी कडाडल्या

By ऑनलाइन लोकमत | Published: October 04, 2021 7:46 PM

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी लखीमपूर येथील हिंसाचाराच्या प्रकरणावरुन केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे.

नवी दिल्ली:उत्तर प्रदेशमधील लखीमपूर येथे केंद्रीय राज्यमंत्री अजय मिश्रा तेनी यांच्या मुलाने कथितरित्या आंदोलक शेतकऱ्यांवर गाडी घातल्याची घटना घडली. त्यात काही शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर संतत्प शेतकऱ्यांनी अनेक गाड्यांची जाळपोळ केली. यादरम्यान झालेल्या हिंसाचारात नऊ जणांचा मृत्यू झालाय. दरचम्यान, या प्रकरणावर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी लखीमपूर प्रकरणावरुन भारतीय जनता पक्षावर जोरदार टीका केली आहे. 'भाजप सरकारचा लोकशाहीवर विश्वास नाही, फक्त हुकूमशाही कारभार येतो', असं त्या म्हणाल्या. तसेच, 'ही अत्यंत दुःखद आणि दुर्दैवी घटना आहे. या घटनेवर टीका करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. हे राम राज्य आहे का किलिंग राज्य?' असा सवाल त्यांनी केला.

राज्य सरकारकडून मदतीची घोषणादरम्यान, या हिंसक संघर्षात मरण पावलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना 45-45 लाख रुपयांची आर्थिक मदत आणि मृतांच्या कुटुंबातील एका सदस्याला सरकारी नोकरी देण्याची घोषणा राज्य सरकारकडून करण्यात आली आहे. यासह आठ दिवसांच्या आत या प्रकरणाची चौकशी करुन आरोपीला अटक करण्याचा विश्वासही सरकारने व्यक्त केलाय.

नेमकं काय घडलं ?उत्तर प्रदेशमधील लखीमपूर येथे केंद्रीय राज्यमंत्री अजय मिश्रा तेनी यांच्या मुलाने कथितरित्या आंदोलक शेतकऱ्यांवर गाडी घातल्याची घटना घडली. त्यात काही शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. त्या घटनेनंतर लखीमपूर येथे शेतकरी आक्रमक झाले आणि त्यांनी पोलिसांच्या गाडीसह इतर गाड्यांची जाळपोळ केली. हिंसाचारामध्ये एक पत्रकार आणि चार शेतकऱ्यांसह नऊ जणांचा मृत्यू झाला. या घटनेवर देशभरातील विरोधी पक्षांकडून सरकारचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात येत आहे. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशMamata Banerjeeममता बॅनर्जीFarmers Protestशेतकरी आंदोलन