शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

Khela Hobe: आता पश्चिम बंगालमध्ये साजरा होणार ‘खेला होबे दिवस’; ममता बॅनर्जींनी केली घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2021 22:04 IST

Khela Hobe: ‘खेला होबे’चा दिवस साजरा करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी जाहीर केले.

कोलकाता: देशभरात होणाऱ्या निवडणुकांमध्ये कोणती ना कोणती घोषणा गाजत असते. अलीकडेच झालेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत अवघ्या देशाचे लक्ष लागले होते ते पश्चिम बंगाल निवडणुकांकडे. भाजपने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. मात्र, ममता बॅनर्जी यांनी भाजपला धोबीपछाड देत बंगालमध्ये तिसऱ्यांदा सत्ता स्थापन केली. या निवडणुकीसह यामध्ये देण्यात आलेली घोषणाही मोठ्या प्रमाणात गाजली. याच घोषणेचा म्हणजेच ‘खेला होबे’चा दिवस साजरा करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी जाहीर केले. (cm mamata banerjee says people have appreciated khela hobe so we will have khela hobe diwas)

ज्या घोषणेमुळे भाजपचा गेम ओव्हर झाला होता. ती ‘खेला होबे’ घोषणा लोकांनी स्वीकारली आहे. त्यामुळे ‘खेला होबे दिवस’ साजरा करणार असल्याची घोषणा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी विधानसभेत केली. ममता बॅनर्जी यांच्या निवडणुका सभांमध्ये वारंवार हा नारा दिला जात होता. त्याचे लक्ष्य थेट भाजपकडे होते. या निवडणुकीच्या घोषणेने टीएमसीच्या बाजूने वातावरण निर्माण करण्याचे काम केले.

अनिल अंबानींना मोठा धक्का! ‘या’ कंपनीच्या परवाना नुतनीकरणाला केंद्राचा नकार

खेला होबे, देखा होबे, जेता होबे

‘खेला होबे’ घोषणेसह ममता बॅनर्जी यांनी दिलेला आणखी एक नारा होता, ‘खेला होबे, देखा होबे, जेता होबे’. या व्यतिरिक्त ममता बॅनर्जी यांनी ‘जय श्री राम’ च्या घोषणेला उत्तर म्हणून ‘हरे कृष्णा हरे राम, विदा हो बीजेपी-वाम’ अशी घोषणा दिली होती. मात्र, आता अधिकृतपणे खेला होबे दिवस साजरा केला जाणार आहे. 

विधान परिषद स्थापन करण्याचा प्रस्ताव पारित

पश्चिम बंगाल विधानसभेने मंगळवारी भारतीय राज्यघटनेतील कलम ३६९ अन्वये राज्यामध्ये विधान परिषद स्थापन करण्याचा प्रस्ताव पारित केला. सभागृहात उपस्थित असलेल्या एकूण २६५ सभासदांपैकी १९६ सदस्यांनी प्रस्तावाच्या बाजूने मतदान केले. तर ६९ सदस्यांनी या प्रस्तावाला विरोध केला. पश्चिम बंगालमध्ये विधान परिषदेची स्थापना करण्याचे आश्वासन तृणमूल काँग्रेसने निवडणूक जाहीरनाम्यामधून दिले होते.

“केंद्रीय कृषी कायद्यांमुळे शेतकऱ्यांचे नुकसानच, साठेबाजीलाही मोकळे रान”; काँग्रेसची टीका

दरम्यान, भाजप आमदार हे शिष्टाचार आणि सभ्यता जाणत नाहीत. विधानसभेमध्ये राज्यपालांच्या अभिभाषणावेळी झालेल्या गोंधळामुळे हे सिद्ध झाले आहे. आमदारांनी केंद्रातील भाजप सरकारने नियुक्त केलेल्या राज्यपालांच्या अभिभाषणामध्ये अडथळा आणायला नको होता. राजनाथ सिंहांपासून ते सुषमा स्वराज यांच्यापर्यंत अनेक भाजपच्या नेत्यांना पाहिले आहे. मात्र, हा भाजपा वेगळा आहे, अशी टीका ममता बॅनर्जी यांनी विधानसभेत बोलताना केली.  

टॅग्स :PoliticsराजकारणMamata Banerjeeममता बॅनर्जीTrinamool Congressतृणमूल काँग्रेसBJPभाजपा