शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

Atal Bihari Vajpayee Death: आशीर्वादाचा तो स्पर्श कायम सोबत राहील! मुख्यमंत्री फडणवीस यांनी जागवल्या आठवणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2018 23:10 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींना शब्दांजली

देशसेवेसाठी फकीरी पत्करलेल्या या ज्येष्ठ नेत्याबद्दल लहानपणी वाटणाऱ्या आकर्षणाचे रुपांतर नंतर श्रद्धेत झाले. अटलजींनी आशीर्वादासाठी माझ्या पाठीवर ठेवलेल्या हातांचा तो स्पर्श मला कायम जाणवत राहायचा. मला तो आधारासारखा वाटायचा, कामाची ऊर्जा द्यायचा, निराश झालो की सांभाळूनही घ्यायचा. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या संवेदनशील मनाने अटलजींना वाहिलेली ही शब्दांजली.....            

मी सुन्न आहे. बाहेरुन स्वत:ला शांत ठेवण्याचा प्रयत्न करीत असलो तरी आतून कोसळून गेलो आहे. श्रद्धेय अटलजींच्या कितीतरी आठवणी दाटून येत आहेत. नागपुरात जनसंघाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक होती. अटलजींसह देशातील सर्व मान्यवर नेते नागपुरात आले होते. अटलजींचे वडीलांशी स्रेहाचे संबंध होते. मी त्यांना भेटायला गेलो. आम्हाला त्यांच्यासोबत फोटो काढायचा होता. पण हिम्मत होत नव्हती. तसे मी वडिलांना सांगितलेही. पण काही कारणाने पहिल्या दिवशी ते साध्य झाले नाही. दुसऱ्या दिवशी मग मी प्रमोदजींकडे आग्रह धरला. प्रमोदजींनी अटलजींना विनंती केली आणि  त्यांनी होकार दिला. त्याचवेळी माझे वडील तेथे आले, तेव्हा अटलजी वडीलांना उद्देशून म्हणाले ‘दो शेरो के बिच मे मै खडा हू’ अटलजींच्या या कौतुकाने मी अक्षरश: भारावून गेलो होतो.वडील आजारी असताना ते दोन वेळा त्यांना भेटायला आले होते. प्रत्येक भेटीत त्यांची विनम्रता, साधेपणा मी आत्मसात करीत होतो. कार्यकर्त्यांबद्दल त्यांच्या मनात अमाप जिव्हाळा असल्याचे जाणवत होते. त्या वयात फार कळत नव्हते. पण या अनुकरणीय वयात होणारे संस्कार नकळत माझ्यावर होत होते. देशसेवेसाठी फकीरी पत्करलेल्या या ज्येष्ठ नेत्याबद्दल लहानपणी वाटणाऱ्या आकर्षणाचे रुपांतर नंतर श्रद्धेत झाले. अटलजींनी आशीर्वादासाठी माझ्या पाठीवर ठेवलेल्या हातांचा तो स्पर्श मला कायम जाणवत राहायचा. मला तो आधारासारखा वाटायचा, कामाची ऊर्जा द्यायचा, निराश झालो की सांभाळूनही घ्यायचा. ऋषीतुल्य माणसाच्या अशा आशीर्वादाचे आपल्या आयुष्यात फार मोठे बळ असते. पण ती व्यक्ती निघून गेली की, आयुष्यात एक पोरकेपण येते. ते दु:ख कुणाला सांगता येत नाही. आयुष्यभर ती पोकळी कधी भरुनही निघत नाही. 

टॅग्स :Atal Bihari Vajpayeeअटलबिहारी वाजपेयीDeathमृत्यूprime ministerपंतप्रधानDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपा