शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
3
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
क्रिकेटच्या देवाकडून जेमी-हरमनप्रीतला शाब्बासकी! ऐतिहासिक विजय युवी, एबी आणि गंभीरलाही भावला
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
8
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
9
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
10
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
11
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
12
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
13
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
14
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
15
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
16
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
17
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
18
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
19
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
20
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा

Atal Bihari Vajpayee Death: आशीर्वादाचा तो स्पर्श कायम सोबत राहील! मुख्यमंत्री फडणवीस यांनी जागवल्या आठवणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2018 23:10 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींना शब्दांजली

देशसेवेसाठी फकीरी पत्करलेल्या या ज्येष्ठ नेत्याबद्दल लहानपणी वाटणाऱ्या आकर्षणाचे रुपांतर नंतर श्रद्धेत झाले. अटलजींनी आशीर्वादासाठी माझ्या पाठीवर ठेवलेल्या हातांचा तो स्पर्श मला कायम जाणवत राहायचा. मला तो आधारासारखा वाटायचा, कामाची ऊर्जा द्यायचा, निराश झालो की सांभाळूनही घ्यायचा. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या संवेदनशील मनाने अटलजींना वाहिलेली ही शब्दांजली.....            

मी सुन्न आहे. बाहेरुन स्वत:ला शांत ठेवण्याचा प्रयत्न करीत असलो तरी आतून कोसळून गेलो आहे. श्रद्धेय अटलजींच्या कितीतरी आठवणी दाटून येत आहेत. नागपुरात जनसंघाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक होती. अटलजींसह देशातील सर्व मान्यवर नेते नागपुरात आले होते. अटलजींचे वडीलांशी स्रेहाचे संबंध होते. मी त्यांना भेटायला गेलो. आम्हाला त्यांच्यासोबत फोटो काढायचा होता. पण हिम्मत होत नव्हती. तसे मी वडिलांना सांगितलेही. पण काही कारणाने पहिल्या दिवशी ते साध्य झाले नाही. दुसऱ्या दिवशी मग मी प्रमोदजींकडे आग्रह धरला. प्रमोदजींनी अटलजींना विनंती केली आणि  त्यांनी होकार दिला. त्याचवेळी माझे वडील तेथे आले, तेव्हा अटलजी वडीलांना उद्देशून म्हणाले ‘दो शेरो के बिच मे मै खडा हू’ अटलजींच्या या कौतुकाने मी अक्षरश: भारावून गेलो होतो.वडील आजारी असताना ते दोन वेळा त्यांना भेटायला आले होते. प्रत्येक भेटीत त्यांची विनम्रता, साधेपणा मी आत्मसात करीत होतो. कार्यकर्त्यांबद्दल त्यांच्या मनात अमाप जिव्हाळा असल्याचे जाणवत होते. त्या वयात फार कळत नव्हते. पण या अनुकरणीय वयात होणारे संस्कार नकळत माझ्यावर होत होते. देशसेवेसाठी फकीरी पत्करलेल्या या ज्येष्ठ नेत्याबद्दल लहानपणी वाटणाऱ्या आकर्षणाचे रुपांतर नंतर श्रद्धेत झाले. अटलजींनी आशीर्वादासाठी माझ्या पाठीवर ठेवलेल्या हातांचा तो स्पर्श मला कायम जाणवत राहायचा. मला तो आधारासारखा वाटायचा, कामाची ऊर्जा द्यायचा, निराश झालो की सांभाळूनही घ्यायचा. ऋषीतुल्य माणसाच्या अशा आशीर्वादाचे आपल्या आयुष्यात फार मोठे बळ असते. पण ती व्यक्ती निघून गेली की, आयुष्यात एक पोरकेपण येते. ते दु:ख कुणाला सांगता येत नाही. आयुष्यभर ती पोकळी कधी भरुनही निघत नाही. 

टॅग्स :Atal Bihari Vajpayeeअटलबिहारी वाजपेयीDeathमृत्यूprime ministerपंतप्रधानDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपा