शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
2
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
3
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
4
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
5
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
6
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
7
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
8
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
9
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
10
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
11
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
12
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
13
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
14
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...
15
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
16
Vivo Y400 5G: एमोलेड डिस्प्ले, ६००० mAh बॅटरी आणि बरेच काही; विवो व्हाय ४०० भारतात लॉन्च!
17
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
18
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
19
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
20
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?

'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2024 21:07 IST

CM Atishi on Delhi Pollution : भाजपशासित राज्यांमध्ये जाळ लावल्यामुळे दिल्लीत प्रदूषण होत असल्याचा दावा आतिशी यांनी केला आहे.

CM Atishi on Delhi Pollution : दिल्लीतीलप्रदूषणावरुन राजकारण चांगलेच तापले आहे. अशातच, दिल्लीतीलआपच्या मुख्यमंत्री आतिशी यांनी या प्रदूषणाला 'राष्ट्रीय आणीबाणी' म्हटले असून, या प्रदूषणाचे खापर केंद्र सरकारवर फोडले आहे. भाजपशासित राज्यांमध्ये रान/गवत जाळण्याच्या घटना वाढल्यामुळे दिल्लीत प्रदूषण होत असल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी केला आहे. 

हिंदी वृत्तवाहिनी आजतकशी बोलताना आतिशी म्हणाल्या, ही राष्ट्रीय आणीबाणी आहे. कोविडच्या काळात ज्याप्रमाणे आपण राष्ट्रीय वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीतून जात होतो, त्याचप्रमाणे आज संपूर्ण उत्तर भारत राष्ट्रीय वैद्यकीय आणीबाणीचा सामना करत आहे. कोविडमध्ये सर्व राज्ये एकत्र आली आणि केंद्रानेही पुढे येऊन अनेक पावले उचलली. पण, केंद्र सरकारला प्रदूषणाची पर्वा नाही. केंद्र सरकारने गेल्या 5 वर्षात रान जाळण्याच्या घटना कमी करण्यासाठी कोणती पावले उचलली? असा सवाल आतिशी यांनी केला. 

भाजपशासित प्रदेशात सर्वाधिक घटनाआतिशी यांनी यावेळी सर्वाधिक रान जाळण्याच्या घटना भाजपशासित प्रदेशात होत असल्याचा आरोप केला आहे. त्या म्हणाल्या, 'पंजाबमध्ये या घटना 80 ते 85 टक्क्यांनी कमी झाल्या आहेत. इतर राज्यांवर नजर टाकली तर उत्तर प्रदेशात हे प्रमाण वाढले आहे, तर मध्य प्रदेशात देशात सर्वाधिक प्रमाणात आहे. भोपाळ, इंदूरचा AQI वाढला आहे. बिकानेर, जयपूर, पाटणा, बुलंदशहरचाही AQI वाढला आहे. या सगळ्याला आम आदमी पार्टी जबाबदार आहे का?

पीएम मोदींनी तातडीची बैठक बोलावली का?केंद्र सरकारवर निशाणा साधत दिल्लीचे मुख्यमंत्री म्हणाले, आजपर्यंत पंतप्रधानांनी प्रदूषणाबाबत तातडीची बैठक बोलावली का? काही आपत्कालीन पावले उचलली का? गेल्या 5 वर्षांत त्यांनी एका राज्यातही पाऊल टाकले का? दिल्लीत रान जाळले जात नाही. देशाच्या विविध भागातून, वेगवेगळ्या राज्यांमधून हे दिल्लीत येते. भाजपशासित राज्यांमध्ये या घटनांमध्ये वाढ झाली आहे, असेही त्या यावेळी म्हणाल्या.

टॅग्स :delhiदिल्लीAAPआपBJPभाजपाpollutionप्रदूषण