शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
2
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
3
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
4
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
5
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
6
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
7
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
8
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
9
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
10
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
11
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
12
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
13
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
14
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
15
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता
16
माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली...
17
Nag Panchami 2025: नागपंचमी का साजरी केली जाते, यामागील पौराणिक कथा वाचलीत का?
18
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
19
चीनचा भारताला मोठा 'धक्का'! 'रेअर अर्थ' बंदीमुळे 'या' ५ क्षेत्रांवर थेट परिणाम, SBI चा गंभीर इशारा!
20
"TCS मधील कपात तर सुरुवात आहे, अजून अनेक कंपन्यांमध्ये AI चा फटका बसणारे"

संपामुळे ७५ टक्के कोळसा उत्पादन बंद

By admin | Updated: January 7, 2015 23:29 IST

सार्वजनिक क्षेत्रातील कोळसा खाण कामगारांच्या संपामुळे ७५ टक्के उत्पादनावर बुधवारी परिणाम झाला

नवी दिल्ली : सार्वजनिक क्षेत्रातील कोळसा खाण कामगारांच्या संपामुळे ७५ टक्के उत्पादनावर बुधवारी परिणाम झाला. मंगळवारपासून सुरू झालेल्या या संपाचा थेट परिणाम वीजनिर्मितीवर होण्याची भीती व्यक्त होत आहे.संपात कोळसा आणि वीजमंत्री पीयूष गोयल यांनी हस्तक्षेप करायचा निर्णय घेतला व त्यामुळे संपकरी कामगार व सरकार यांच्यात चर्चा सुरू झाली. झारखंडमध्ये संपकरी कामगार आणि पोलिसांमध्ये चकमक झाल्याचे वृत्त आहे.कोल इंडिया लिमिटेडच्या ४३८ पैकी २९० खाणी संपामुळे बंद पडल्या आहेत. हा संप म्हणजे गेल्या ४० वर्षांतील सर्वांत मोठा औद्योगिक संप असल्याचे मानले जाते. देशातील अन्य कोळसा खाणींमधील उत्पादनावरही परिणाम झाला आहे. या संपामुळे देशातील १०० पेक्षा जास्त वीजनिर्मिती केंद्रांच्या कोळसापुरवठ्यावर परिणाम होणार आहे. आणीबाणीतील कोळसा साठाही फार दिवस पुरणार नाही. संप दीर्घकाळ राहिला तर आमच्याकडे वीज संकट निर्माण होईल, अशी भीती उत्तर प्रदेश आणि मध्यप्रदेशने व्यक्त केली आहे.संपामुळे बंद पडलेल्या २९० खाणींमधून कोळसा काढण्यासाठी व्यवस्थापन तात्पुरते कामगार आणण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप कामगार संघटनांनी केला आहे. मंगळवारी चर्चा अपयशी ठरल्यानंतर संघटनेच्या नेत्यांनी चर्चेसाठी राजकीय नेतृत्वाने आले पाहिजे असे म्हटले. (लोकमत न्यूज नेटवर्क)४सरकारने बळाचा वापर केल्यास संप हाताबाहेर जाऊ शकतो, असा इशारा इंडियन नॅशनल माईन वर्कर्स फेडरेशनचे (इंटक) अध्यक्ष राजेंद्र सिंग यांनी दिला आहे. दरम्यान, भाकपने (मार्क्सवादी) या संपाला पाठिंबा जाहीर केला आहे. ४कामगारांनी संपासाठी जी एकजूट दाखविली त्याचे भाकपने स्वागत केले आहे. सरकारचा प्रयत्न खाणींचे राष्ट्रीयीकरण रद्द करण्याचा असल्यामुळे यासंदर्भातील अध्यादेश मागे घेण्यात यावा, अशी मागणीही पक्षाने केली आहे.४पाच लाख खाण कामगार संपावर असून रोजचे दीड दशलक्ष टन कोळसा उत्पादन बंद पडले आहे. उत्पादनावर विपरीत परिणाम झाल्याचे कोल इंडियाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मान्य केले.