शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजानानं Live शोमध्ये लुटली मैफिल (VIDEO)
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
6
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
7
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
8
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
9
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
10
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
11
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
12
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
13
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
14
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
15
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
16
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
17
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
18
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
19
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
20
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन

संपामुळे ७५ टक्के कोळसा उत्पादन बंद

By admin | Updated: January 7, 2015 23:29 IST

सार्वजनिक क्षेत्रातील कोळसा खाण कामगारांच्या संपामुळे ७५ टक्के उत्पादनावर बुधवारी परिणाम झाला

नवी दिल्ली : सार्वजनिक क्षेत्रातील कोळसा खाण कामगारांच्या संपामुळे ७५ टक्के उत्पादनावर बुधवारी परिणाम झाला. मंगळवारपासून सुरू झालेल्या या संपाचा थेट परिणाम वीजनिर्मितीवर होण्याची भीती व्यक्त होत आहे.संपात कोळसा आणि वीजमंत्री पीयूष गोयल यांनी हस्तक्षेप करायचा निर्णय घेतला व त्यामुळे संपकरी कामगार व सरकार यांच्यात चर्चा सुरू झाली. झारखंडमध्ये संपकरी कामगार आणि पोलिसांमध्ये चकमक झाल्याचे वृत्त आहे.कोल इंडिया लिमिटेडच्या ४३८ पैकी २९० खाणी संपामुळे बंद पडल्या आहेत. हा संप म्हणजे गेल्या ४० वर्षांतील सर्वांत मोठा औद्योगिक संप असल्याचे मानले जाते. देशातील अन्य कोळसा खाणींमधील उत्पादनावरही परिणाम झाला आहे. या संपामुळे देशातील १०० पेक्षा जास्त वीजनिर्मिती केंद्रांच्या कोळसापुरवठ्यावर परिणाम होणार आहे. आणीबाणीतील कोळसा साठाही फार दिवस पुरणार नाही. संप दीर्घकाळ राहिला तर आमच्याकडे वीज संकट निर्माण होईल, अशी भीती उत्तर प्रदेश आणि मध्यप्रदेशने व्यक्त केली आहे.संपामुळे बंद पडलेल्या २९० खाणींमधून कोळसा काढण्यासाठी व्यवस्थापन तात्पुरते कामगार आणण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप कामगार संघटनांनी केला आहे. मंगळवारी चर्चा अपयशी ठरल्यानंतर संघटनेच्या नेत्यांनी चर्चेसाठी राजकीय नेतृत्वाने आले पाहिजे असे म्हटले. (लोकमत न्यूज नेटवर्क)४सरकारने बळाचा वापर केल्यास संप हाताबाहेर जाऊ शकतो, असा इशारा इंडियन नॅशनल माईन वर्कर्स फेडरेशनचे (इंटक) अध्यक्ष राजेंद्र सिंग यांनी दिला आहे. दरम्यान, भाकपने (मार्क्सवादी) या संपाला पाठिंबा जाहीर केला आहे. ४कामगारांनी संपासाठी जी एकजूट दाखविली त्याचे भाकपने स्वागत केले आहे. सरकारचा प्रयत्न खाणींचे राष्ट्रीयीकरण रद्द करण्याचा असल्यामुळे यासंदर्भातील अध्यादेश मागे घेण्यात यावा, अशी मागणीही पक्षाने केली आहे.४पाच लाख खाण कामगार संपावर असून रोजचे दीड दशलक्ष टन कोळसा उत्पादन बंद पडले आहे. उत्पादनावर विपरीत परिणाम झाल्याचे कोल इंडियाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मान्य केले.