शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

नागरिकत्व दुरुस्ती विधेयकामुळे ‘आयडिया ऑफ इंडिया’ला धोका: शशी थरूर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2019 1:17 AM

देश विभाजनाचा विचार मुस्लिम लीग-हिंदू महासभेचा

- टेकचंद सोनवणे नवी दिल्ली : हिंदू महासभा व मुस्लिम लीग यांनीच पहिल्यांदा स्वातंत्र्यपूर्व भारतात धर्मावर आधारित विभाजनाची मागणी केली. काँग्रेसने सदैव देशाच्या अखंडतेचा विचार केला. केंद्र सरकार मात्र नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाच्या आड पुन्हा देशाचे विभाजन करू पाहत आहे. संख्याबळाच्या जोरावर सत्ताधाऱ्यांनी देशाच्या प्रजासत्ताक असण्यावर घाला घातला आहे, असा घणाघाती हल्ला काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी भाजपवर केला. ‘लोकमत संसदीय पुरस्कारा’च्या तिसºया पर्वानिमित्त आयोजित परिसंवादात थरूर यांनी रोखठोक मते मांडली.लोकमत मीडिया ग्रुपचे कार्यकारी संचालक करण दर्डा यांनी शशी थरूर यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार केला. सीएनएन न्यूज १८ चे संपादक (आऊटपूट) जाका जेकब यांनी थरूर यांच्याशी संवाद साधला.

'राजकारणात प्रादेशिक पक्षांची भूमिका'या विषयावर बोलताना थरूर यांनी विद्यमान राजकीय स्थितीवर भाष्य केले. प्रादेशिक पक्षांचा विस्तार स्थानिक मुद्यांवर झाला. राष्ट्रीय राजकारणात त्यांच्या विस्ताराला त्यामुळे नेहमीच मर्यादा राहील, असे नमूद करून थरूर म्हणाले की, भाजपने हिंदू, हिंदुत्व व हिंदुस्थान या त्रिसूत्रीला महत्त्व दिले. काही प्रादेशिक पक्षांनी सर्वसमावेशक भूमिका मांडली. त्यामुळे अनेक राज्यांत एनआरसीला विरोध होईल.

प्रादेशिक पक्ष व केंद्रामध्ये संघर्ष होईल, कारण चार राज्यांचा अपवाद वगळता देशातील सर्व राज्ये आंतरराष्ट्रीय सीमेवर अथवा सागरी किनारपट्टी आहेत. एनआरसी धर्मनिरपेक्ष 'आयडिया आॅफ इंडिया'च्या विरोधात आहे. काँग्रेसने देशाचे विभाजन केल्यानेच एनआरसीची गरज पडली, असा आरोप गृहमंत्री अमित शहा यांनी केला होता.

शहा यांनी कदाचित शाळेत इतिहासाच्या तासाला लक्ष दिले नाही, अशा शेलक्या शब्दात थरूर यांनी समाचार घेतला. हिंदू महासभा व मुस्लीम लीग या संघटनांनीच धर्मावर आधारित विभाजनाचा प्रस्ताव मांडला होता. महात्मा गांधी, पंडीत नेहरू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना धर्माधिष्ठित विभाजन मान्य नव्हते, असे थरूर म्हणाले.

घुसखोरीच्या मुद्द्याद्वारे भाजपने महागाई, अर्थव्यवस्थेतील अपयशावरून देशवासीयांचे लक्ष हटवण्याचा प्रयत्न चालविला आहे. एनआरसीचा फटका मुस्लिम समुदायालाच बसणार असल्याने भाजपने योजनापूर्वक हे विधेयक आणले. मात्र काँग्रेस प्रादेशिक पक्षांना सोबत घेऊ न भाजपचा विचार निष्प्रभ करेल, असा विश्वास थरूर यांनी व्यक्त केला.

कलम ३७० मुळे काय झाले हे सर्वांनी पाहिले. जम्मू-काश्मीरमध्ये लोकांचा आवाज दाबण्यात आला. एकीकडे संचारबंदी तर दुसरीकडे दहशतवाद्यांची भीती या दुहेरी अस्वस्थतेत काश्मिरी आहेत. एनआरसीमुळेही एका समुदायाच्या मनात हीच भावना वाढली असल्याचे थरूर म्हणाले.

टॅग्स :Shashi Tharoorशशी थरूरcongressकाँग्रेसLokmatलोकमत