शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
2
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
3
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
4
कोण आहे अविष्कार राऊत?; नेपाळमधील Gen Z आंदोलनापूर्वी केलेले जोरदार भाषण व्हायरल
5
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार ही कंपनी; ३ महिन्यांत पैसे केले डबल, कंपनीत स्टेट बँकेचीही गुंतवणूक
6
Infosys चं बायबॅक 'शॉपिंग'; १९% प्रीमिअमवर खरेदी करणार आपलेच शेअर्स, स्टॉक सुस्साट
7
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
8
उमेश-प्रियाची 'बिन लग्नाची गोष्ट', १३ वर्षांनी पडद्यावर आली रिअल लाईफ जोडी; कसा आहे सिनेमा? वाचा रिव्ह्यू
9
पितृपक्ष २०२५: पितृअष्टमीला करा गजलक्ष्मी व्रत; लक्ष्मीपूजनाएवढेच महत्त्व, सुख संपत्तीने नांदतात सर्व!
10
Pitru Paksha 2025: पितृपक्षाचा एक आठवडा शिल्लक; पितृदोष कसा ओळखावा? उपाय कोणते? ते पाहू
11
ब्राझीलच्या माजी राष्ट्रपतींना सुनावली २७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, निवडणूक हरल्यानंतर केलेली ती कृती भोवली
12
Python Hunting: अजगर मारून त्याचं मांस शिजवलं, दोन जणांना अटक! 
13
सिक्कीममध्ये निसर्गाचा कोप! भूस्खलनात ४ जणांचा मृत्यू, ३ जण बेपत्ता, बचावकार्य सुरू
14
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
15
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
16
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
17
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
18
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
19
आसुरी अहंकार नको, संस्कृतीसोबत सत्कृतीही जोपासायला हवी : मोरारीबापू
20
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले

द्वेष नव्हे तर नोकरी निवडा; 'इंडिया' येणार अन् ३० लाख नोकऱ्या देणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2024 06:25 IST

राहुल गांधी यांना विश्वास; 'भाजप'च्या हातातून निवडणूक निसटल्याचा केला दावा

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली: पंतप्रधानांच्या हातातून लोकसभा निवडणूक हळूहळू निसटत चालली असून, आता देशातील तरुणांचे - लक्ष दुसरीकडे वळविण्यासाठी ते नवीन काहीतरी नाटक करण्याचा प्रयत्न करतील. मात्र, तरुणांनी विचलित होऊ नये. ४ जूनरोजी इंडिया आघाडीचे सरकार सत्ता स्थापन करणार असून, आम्ही १५ ऑगस्टपर्यंत आम्ही ३० लाख नोकऱ्या देण्याचे काम सुरू करणार असल्याचा दावा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला.

हिंदूची लोकसंख्या घटल्याचा दावा करणारा एक अहवाल येताच त्यांनी एक व्हिडीओ प्रसारित केला. तरुण हे देशाची ताकद आहे. चार-पाच दिवसांत काहीतरी नाटक करून तुमचे लक्ष विचलित करण्याचा - प्रयत्न होईल. मात्र, तुम्ही तुमचे लक्ष विचलित होऊ देऊ नये, असे त्यांनी म्हटले आहे.

आम्ही नोकरीची गॅरंटी देणारदेशातील तरुणानो, ४ जून रोजी 'इंडया'चे सरकार स्थापन होत आहे. आम्ही गॅरंटी देतो की, १५ ऑगस्टपर्यंत आम्ही ३० लाख रिक्त सरकारी पदांवर भरतीचे काम सुरू करू, भाजपच्या खोट्या प्रचाराने विचलित होऊ नका, आपल्या मुद्द्यांवर ठाम राहा. 'इंडिया'चे ऐका. द्वेष नव्हे तर नोकरी निवडा.- राहुल गांधी, काँग्रेस नेते

देशात सध्या बेरोजगारी ही सर्वात मोठी समस्या असून, दोन कोटी तरुणांना रोजगार देऊ, असे आश्वासन पंतप्रधानांनी दिले होते. मात्र, ते खोटे बोलले आणि त्यांनी नोटबंदी केली. चुकीचा जीएसटी लागू केला आणि उद्योगपतींसाठी काम केले. आम्ही नोकरीची गॅरंटी योजना आणत आहोत. सरकार येतात ३० लाख तरुणांना नोकऱ्या देण्याचे काम सुरू करू, असे त्यांनी म्हटले आहे.

कुटुंब नियोजनाचा कायदा तत्काळ लागू करादेशात तत्काळ कुटुंब नियोजनाचा कायदा लागू केला पाहिजे. पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेने दिलेल्या अहवालातील निष्कर्षांवर सर्वांनीच गांभीर्याने विचार करण्याची आवश्यकता आहे.-साक्षी महाराज, खासदार, भाजप

भाजप देशावरील महत्त्वाच्या प्रश्नांपासून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवू पाहात आहे. लोकांच्या आयुष्याशी निगडित असलेल्या प्रश्नांवर चर्चा झाली पाहिजे. बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न, महिलांची सुरक्षा अशा विषयांवर भाजप बोलायला तयार नाही. या मुद्द्यांवर चर्चा होऊ नये, असा त्यांचा प्रयत्न असतो.- प्रियांका गांधी, सरचिटणीस, काँग्रेस

१९५० ते २०१५ या कालावधीत भारतात हिंदूंची संख्या ७.८२ टक्क्यांनी घटली आहे, असा निष्कर्ष पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेच्या एका अहवालात काढण्यात आला आहे. ही आकडेवारी पाहिली तर विरोधी पक्ष भारताला इस्लामी देश बनविण्याच्या तयारीला लागल्याचे दिसून येते. काँग्रेसने भारताला धर्मशाळा बनविले. बांगलादेशी घुसखोर, रोहिंग्या यांची मतपेढी वाढविण्याचा या पक्षाचा प्रयत्न आहे. आता मुसलमानांना आरक्षण देण्याच्या गोष्टी केल्या जात आहेत.- गिरीराज सिंह, केंद्रीय मंत्री

मुस्लिमांच्या वाढत्या लोकसंख्येबाबतचा अहवाल हा व्हॉट्सअॅप विद्यापीठाचा आहे. अहवाल अभ्यासूनच प्रतिक्रिया देईन.-असदुद्दीन ओवैसी, 'एआयएमआयएम'चे प्रमुख

आर्थिक सल्लागार परिषदेने तयार केलेल्या अहवालाद्वारे लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा व विद्वेष पसरविण्याचा प्रयत्न केला जात आहे. भाजपचा हा अजेंडा आहे. गेली १० वर्षे या पक्षाच्या केंद्र सरकारने जनतेची फसवणूक केली आहे. २०११च्या नंतर जनगणना करण्यात आली नाही. ती २०२१ साली होणे आवश्यक होते. मात्र, २०२४ साल उजाडले तरी जनगणना झालेली नाही.-तेजस्वी यादव, 'राजद नेते

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसBJPभाजपाlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४