शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
6
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
7
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
8
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
9
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
10
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
11
जीएसबी सेवा मंडळाचा ४७४ कोटींचा विमा; यामध्ये भाविकांचाही समावेश, एसीमध्ये दर्शन मिळणार
12
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
13
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
14
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
15
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
16
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
17
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

पाकच्या विजयासाठी चीनने लावता होता पूर्ण जोर, भारताची हेरगिरीही केली; अहवालातून माहिती समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2025 08:42 IST

भारतीय लष्कराने पाकिस्तानातील दहशतवाद्यांची ठिकाणे आणि पाकिस्तानी एअरफोर्सचे इन्फ्रास्ट्रक्चर उद्ध्वस्त करून पहलगाम हल्ल्याचा हिशेब बरोबर केला.

नवी दिल्ली : ऑपरेशन सिंदूरच्या काळात चीननेपाकिस्तानची मदत करण्यासाठी भारताची हेरगिरी केली होती, असा खुलासा एका अहवालातून करण्यात आला आहे. 

भारतीय लष्कराने पाकिस्तानातील दहशतवाद्यांची ठिकाणे आणि पाकिस्तानी एअरफोर्सचे इन्फ्रास्ट्रक्चर उद्ध्वस्त करून पहलगाम हल्ल्याचा हिशेब बरोबर केला. लष्कराने जैश-ए-मोहम्मद, लष्कर-ए-तैयबा आणि हिजबुल मुजाहिद्दीनच्या दहशतवादी अड्ड्यांवर हल्ला केला. या हल्ल्यात १०० हून अधिक दहशतवादी मारले गेले होते.

मात्र, लष्कराने छेडलेल्या ऑपरेशन सिंदूरच्या काळात चीनने पाकिस्तानची मदत करण्यासाठी भारताची हेरगिरी केली होती, असा खुलासा अहवालातून करण्यात आला. संरक्षण मंत्रालयाशी संबंधित ‘सेंटर फॉर जॉइंट वॉरफेअर स्टडीज’ या थिंक टँक संस्थेच्या अहवालात हा दावा करण्यात आला आहे. ऑपरेशन सिंदूरला अपयशी करून पाकिस्तानला विजयी करण्यासाठी चीनने पूर्ण जोर लावला होता. मात्र, भारतीय सैन्याने त्यांचे मनसुबे उधळून लावले.  पाकने चीनची मदत झाल्याची बाब नाकारली आहे, तर दुसरीकडे थिंक टँकच्या अहवालातून चीनने पाकिस्तानला धोरणात्मक, गुप्तचर आणि तांत्रिक मदत पुरविल्याचे स्पष्ट केले आहे. 

चीनने  काय केली मदत?अहवालानुसार, भारतीय सैन्याच्या हालचाली आणि जवानांच्या तैनातीची अचूक माहिती मिळविण्यासाठी पाकच्या एअर डिफेंस रडार यंत्रणेची दिशा नीट करण्यास चीनने मदत केली होती. 

हल्ल्यानंतर भारताच्या हालचाली अचूक आणि स्पष्ट टिपता येतील अशा पद्धतीने पाकच्या उपग्रहाला स्थापित करण्यात चीनने मदत केली होती. अर्थात, पाकचे रडार अशा प्रकारे सेट केले होते की, हल्ल्याची माहिती पाकला आधीच मिळेल, असे थिंक टँक सीजेडब्ल्यूएसचे महासंचालक मेजर जनरल (निवृत्त) अशोक कुमार म्हणाले. 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानchinaचीनIndiaभारतOperation Sindoorऑपरेशन सिंदूर