शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारत आणि चीन रशिया-युक्रेन युद्धाला निधी देत ​​आहेत"; तेल खरेदीवरून ट्रम्प यांचा UNGA मध्ये आरोप
2
"भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे संपवली, पण कोणत्याही पंतप्रधानांनी मदत केली नाही," डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
3
Asia Cup 2025 : टॉपर श्रीलंकेचा सुपर फोरमध्ये फ्लॉप शो! पाक जिंकले तरी OUT होण्याचा धोका; ते कसं?
4
रशिया कसं थांबवेल युक्रेन युद्ध? ट्रम्प यांनी UNGA मध्ये सांगितला अमेरिकेचा प्लॅन; पुतिन यांचं टेन्शन वाढणार!
5
PAK vs SL War of Celebration :पाक गोलंदाजाने कळ काढली; हसरंगानं त्याचा बदला घेतला, पण... (VIDEO)
6
पाक गोलंदाजानं केली हसरंगाची कॉपी! मग IND vs PAK मॅचचा दाखला देत इरफाननं काढली 'लायकी' (VIDEO)
7
वैभव खेडेकरांच्या BJP प्रवेशाचा मुहूर्त मिळेना; कार्यकर्त्यांसह मुंबई गाठली पण पक्षप्रवेश नाही
8
पाकिस्तानच्या जाफर एक्सप्रेसमध्ये स्फोट; ट्रेन रुळावरून घसरुन उलटली, काही तासांपूर्वीच लष्कराला करण्यात आलं होतं लक्ष्य
9
बिग सरप्राइज! थेट टीम इंडियाची कॅप्टन्सी मिळाली अन् दिनेश कार्तिक पुन्हा मैदानात उतरण्यास झाला तयार
10
लग्नानंतर वैवाहिक संबध ठेऊ शकला नाही पती, पत्नीनं नपुंसक असल्याचा आरोप करत केली 2 कोटींची मागणी अन् मग...
11
IND vs PAK: पाकिस्तानच्या 'चिल्लर पार्टी'ला हरभजनचा इशारा, म्हणाला- थोडे मोठे व्हा नि मग...
12
"देशी गाय कोणी विकायला निघालं, तर त्याला फाशी द्या"; सदाभाऊ खोत यांची सरकारकडे मागणी, नेमकं काय म्हणाले?
13
भारताने जिंकलेल्या १९८३ वर्ल्डकप फायनलमधील पंच डिकी बर्ड यांचे ९२व्या वर्षी निधन
14
पावसाने झोडपले, शेतकरी संकटात, सरकार कर्जमाफीचा निर्णय कधी घेणार?; एकनाथ शिंदे म्हणाले...
15
“पंचनामे-सर्वे सोडा, ओला दुष्काळ जाहीर करा अन् सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये द्या”: सपकाळ
16
GST कपातीनंतर आता एवढी स्वस्त झालीय ५ स्टार रेटिंग असलेली Tata Punch; जाणून घ्या, कोण कोणत्या कारला देते टक्कर?
17
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांमुळे इमॅन्युएल मॅक्रॉन अडकले ट्रॅफिकमध्ये; फ्रान्सच्या प्रमुखांनी थेट लावला ट्रम्प यांनी फोन
18
"कधीतरी जबाबदारी घ्यायला शिका"; भाजपा खासदाराने ममता बॅनर्जींना सुनावले, म्हणाले- "सतत..."
19
"गर्भवती महिलांना पॅरासिटामॉल गोळीने..."; WHO ने फेटाळून लावला डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
20
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम? अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...

‘’लडाखमध्ये चीनने बळकावली भारताची पाच हजार चौकिमी जमीन?’’ काँग्रेसचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2020 22:15 IST

लडाख प्रश्नावरून केंद्र सरकारला सतत टीकेचे लक्ष्य करत असलेल्या काँग्रेसने आता चीनच्या घुसखोरीवरून गंभीर शंका उपस्थित केली आहे.

ठळक मुद्देलडाखमध्ये चीनच्या घुसखोरीमुळे भारताने पाच हजार चौरस किलोमीटर क्षेत्रफळाचा प्रदेश गमावला आहे का? युवा काँग्रेसचे अध्यक्ष श्रीनिवास बी. व्ही. यांनी मोदी सरकारवर टीका करताना केला हा गंभीर आरोप काल झालेल्या सर्वपक्षीय बैठकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारताच्या हद्दीत कुणी घुसलेला नाही, तसेच घुसलेले नव्हते, असे सांगितले होते

नवी दिल्ली - लडाखमधील गलवान खोऱ्यात चिनी सैन्याची घुसखोरी तसेच भारत आणि चीनच्या सैन्यात झालेली झटापट यामुळे देशात चिंतेचे वातावरण पसरलेले आहेत. त्यातच चीननेभारताच्या भूभागात घुसखोरी करून काही भागावर कब्जा केल्याचा दावा करण्यात येत असल्याने अनेत तर्कवितर्कांना उधाण आले आहे. त्याचदरम्यान, लडाख प्रश्नावरून केंद्र सरकारला सतत टीकेचे लक्ष्य करत असलेल्या काँग्रेसने आता चीनच्या घुसखोरीवरून गंभीर शंका उपस्थित केली आहे. लडाखमध्ये चीनच्या घुसखोरीमुळे भारताने पाच हजार चौरस किलोमीटर क्षेत्रफळाचा प्रदेश गमावला आहे का? असा सवाल काँग्रेसने उपस्थित केला आहे.  

युवा काँग्रेसचे अध्यक्ष श्रीनिवास बी. व्ही. यांनी मोदी सरकारवर टीका करताना हा गंभीर आरोप केला आहे. आपण लडाखमध्ये पाच हजार चौरस किमी क्षेत्रफळाचा प्रदेश गमावला आहे का? असा सवाल त्यांनी ट्विटरवरून विचारला आहे. ११ मार्च रोजी परराष्ट्र राज्यमंत्री व्ही मुरलीधरन यांनी लडाखमध्ये सुमारे ३८ हजार चौकिमी क्षेत्रावर चीनचा कब्जा आहे असे संसदेत सांगतले होते. तर आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वक्तव्यावर पीएमओने स्पष्टीकरण देताना लडाखचा सुमारे ४३ हजार चौकिमी भाग चीनच्या ताब्यात असल्याचे सांगितले. याचा अर्थ आपण पाच हजार चौकिमीचे क्षेत्रफळ असलेला भूभाग गमावला असा घ्यायचा का? अशी विचारणा श्नीनिवास यांनी केली आहे.

काल झालेल्या सर्वपक्षीय बैठकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारताच्या हद्दीत कुणी घुसलेला नाही, तसेच घुसलेले नव्हते, असे सांगितले होते. मात्र त्यावरून कांग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदींवर जोरदार टीका केली होती. आक्रमक चीनसमोर झुकत मोदींनी भारताच्या भूभागावरील चीनचा दावा मान्य केला, असा आरोप राहुल गांधींनी केला होता.  

इतर महत्त्वाच्या बातम्या

भारतच नाही एकूण २३ देशांच्या भूमीवर दावा, असे आहे चीनचे विस्तारवादी धोरण....

भारत-चीनमधील तो करार, ज्यामुळे सीमेवर होत नाही गोळीबार....

कोरोनाचे दोन रुग्ण सापडल्यानंतर हा देश झाला सावध, लष्कराकडे सोपवली मोठी जबाबदारी

ती संधी साधली आणि चीन अमेरिकेला आव्हान देणारी महासत्ता बनली

गाईच्या शरीरात सापडला कोरोनाला संपवण्याचा उपाय, या कंपनीने केले संशोधन दरम्यान, सर्वपक्षीय बैठकीतील पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विधानावरुन वाद होत असल्याने सरकारने याबाबत निवेदन काढत स्पष्टीकरण दिले आहे. सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वक्तव्याचा विपर्यास केला असल्याचा दावा केला. पंतप्रधानांनी स्पष्टपणे हे सांगितले होते की, लाइन ऑफ एक्चुअल कंट्रोल बदलण्यासाठी कोणत्याही प्रयत्नाला भारत सडेतोड उत्तर देईल. अशा कोणत्याही आव्हानांचा भारतीय सेना ठोस उत्तर देण्यास सक्षम आहे असं सांगितले आहे.

पंतप्रधान कार्यालयाने सांगितले की, यावेळी चीनचे सैनिक मोठ्या संख्येने एलएसीवर आले आहेत ही माहिती सर्वपक्षीय बैठकीत दिली. १५ जून रोजी गलवान येथे हिंसाचार झाला. कारण चीनी सैनिक एलएसीच्या जवळ हालचाली करत होते, त्याला रोखण्यासाठी गेलेल्या सैनिकांवर हल्ला झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी १५ जून रोजी गलवान येथे झालेल्या घटनेवर भाष्य केले आहे. ज्यात देशाचे २० सैनिक शहीद झालेत.

टॅग्स :ladakhलडाखIndiaभारतchinaचीनcongressकाँग्रेसCentral Governmentकेंद्र सरकार