शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दुष्काळामुळे स्थिती गंभीर: शरद पवारांनी राज्य सरकारकडे केल्या ७ महत्त्वाच्या मागण्या!
2
पुणे पोर्शे कार अपघात: फडणवीसांनी विरोधकांना सुनावले, “प्रत्येक गोष्टीत राजकारण योग्य नाही”
3
निवडणूक संपताच शिंदे गटात वादाचे फटाके; "गजानन किर्तीकरांवर कारवाई झाली तर..."
4
चालताना नेमकं काय लक्षात ठेवायचं... वेळ, पावलं की अंतर?; वजन लवकर होईल कमी
5
लैला खान हत्या प्रकरणात सावत्र वडिलांना फाशीची शिक्षा, १३ वर्षांनी अभिनेत्रीला मिळाला न्याय
6
विधान परिषदेच्या निवडणुकीची नवी तारीख जाहीर; शिक्षक, पदवीधर मतदारसंघांसाठी या दिवशी मतदान
7
"सांगली जिल्हाप्रमुखाचं विधान उबाठाला मार्ग दाखवणारं, जर..."; संजय शिरसाटांचा निशाणा
8
१ वर ३ फ्री शेअर देतेय ही एनर्जी कंपनी, रेकॉर्ड डेट दरम्यान शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या
9
"ब्राह्मण-बनिया समाजातही गरीब लोक, त्यांना आरक्षण मिळू नये का?" मोदींचा काँग्रेसवर घणाघात
10
“याचिकेची वेळ चुकली, आता निवडणुका झाल्यावर सुनावणी”; सुप्रीम कोर्टाचा दिलासा देण्यास नकार
11
Inflation Calculator: २० आणि २५ वर्षांनंतर किती असेल १ कोटी रुपयांचं मूल्य? गणित समूजन करा गुंतवणुकीचं प्लॅनिंग
12
कडक उन्हातून घरी आल्यावर किती वेळानंतर पाणी प्यावं?; जाणून घ्या हेल्थ एक्सपर्टचा सल्ला
13
Narendra Modi : "काँग्रेसच्या काळात पाकिस्तान डोक्यावर नाचायचा, आज त्याची काय अवस्था..."; मोदी कडाडले
14
IPL 2024: दिनेश कार्तिक पाठोपाठ टीम इंडियाच्या आणखी एका स्टार खेळाडूचे निवृत्तीचे संकेत
15
Rituals: मंदिरात घंटा का बांधतात? नवस फेडण्यासाठीही घंटेचा वापर का केला जातो ते जाणून घ्या!
16
प्रिटी वुमन! प्रिती झिंटानेही Cannes मध्ये लावली हजेरी, व्हाईट आऊटफिटमध्ये दिसली परी!
17
कोण कोणाला वाचवतेय! बाळाला पोर्शे कारची चावी कोणी दिली? बिल्डर बाप अन् आजोबा दोघेही म्हणतायत 'मी-मी'
18
"जिथं स्फोट झाला तिथे बॉयलर नव्हताच..."; डोंबिवलीतील स्फोटामागचं खरं कारण काय?
19
अशोक सराफ आणि रोहिणी हट्टंगडी यांना मराठी नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर
20
“लोकसभा निवडणूक ग्रामपंचायतसारखी केली, PM मोदींनी लक्ष्मणरेषा ओलांडली”: प्रकाश आंबेडकर

LACजवळ चीननं वाढवल्या हेलिकॉप्टर्सच्या घिरट्या; एअरबेसवर भारताची करडी नजर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 08, 2020 5:25 PM

गेल्या 8-10 दिवसांपासून सीमेच्या दोन्ही बाजूंनी खळबळ उडाली आहे, अशा परिस्थितीत चीन सतत आपले सामर्थ्य बळकट करत असल्याचे दिसते.

नवी दिल्लीः लडाख प्रदेशात भारत आणि चीनमध्ये अजूनही तणाव कायम आहे. दोन्ही देशांमधला हा सीमावाद चर्चेच्या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न केला जात आहे. 6 जून रोजी झालेल्या बैठकीत कोणताही ठोस निर्णय झालेला नाही, परंतु यादरम्यान चीनने पुन्हा एकदा सीमेवर हालचाली वाढवल्या आहेत. पूर्व लडाखच्या आसपासच्या सीमेजवळ चीनने हेलिकॉप्टरच्या हालचाली तीव्र केल्याची माहिती आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, हे हेलिकॉप्टर लडाखजवळ जमलेल्या चिनी सैनिकांना मदत करण्यासाठी वापरण्यात येत आहेत. गेल्या 8-10 दिवसांपासून सीमेच्या दोन्ही बाजूंनी खळबळ उडाली आहे, अशा परिस्थितीत चीन सतत आपले सामर्थ्य बळकट करत असल्याचे दिसते.या दिवसात चीनकडून पेट्रोलिंग, वस्तूंच्या पुरवठ्यासाठी हेलिकॉप्टरचा वापर केला जात होता, परंतु आता ते सर्व भारताच्या सीमेवर उडत आहेत. या व्यतिरिक्त चायनीज आर्मी पीएलएची लढाऊ विमानंही पूर्व लडाखजवळ एलएसीवर उडत असल्याचे दिसून आले आहे. चीनच्या हुतान आणि गलगुन्सा तळांवरही भारत नजर ठेवून आहे आणि चीनच्या प्रत्येक हालचालींवर भारताचं लक्ष आहे. महत्त्वाचे म्हणजे मे महिन्याच्या सुरुवातीपासूनच दोन्ही देशांमध्ये तणावाची परिस्थिती आहे. परंतु यापूर्वी चीनने कधीही लढाऊ विमान सीमेवर तैनात केली नव्हती, त्यामुळे आता परिस्थिती आणखी तीव्र बनली. आणि 2017मध्ये डोकलामदरम्यान निर्माण झालेल्या परिस्थितीच्या हा वाद पुढे गेला आहे.पूर्वीच्या लडाखजवळील क्षेत्र हुतान-गलगुन्सा तळाजवळ 10-12 चिनी लढाऊ विमानं तैनात करण्यात आली आहेत. एवढेच नाही तर चिनी विमानं हे पूर्व लडाखच्या पूर्वेस 30 किमी अंतरावर आहेत. आता ती विमानं तिकडे उडताना दिसली आहेत, जे आंतरराष्ट्रीय नियमांनुसार भारतीय सीमेच्या दहा किमी फक्त दूर आहे. भारत आणि चीनमधील या वादावर 6 जून रोजी लेफ्टनंट जनरल लेव्हलची बैठक झाली होती, परंतु अद्याप तोडगा निघाला नाही. दोन्ही देशांमध्ये चर्चा अद्यापही सुरू आहे.  

टॅग्स :chinaचीनIndiaभारत