शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
6
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
7
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
8
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
9
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
10
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
11
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
12
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
13
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
14
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
15
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
16
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
17
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
18
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
19
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
20
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

वचन लाल डोळा दाखवण्याचे होते...: काँग्रेस! गलवान संघर्षानंतर काय बदलले? चिनी कम्युनिस्ट पक्षाचे शिष्टमंडळ भाजप मुख्यालयात; संकेत काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2026 12:08 IST

China Communist Party delegation BJP : गलवान संघर्षानंतर पहिल्यांदाच चीनच्या सत्ताधारी पक्षाचे शिष्टमंडळ भाजप मुख्यालयात पोहोचले. सन हाययान यांच्या नेतृत्वाखालील या भेटीचे राजकीय महत्त्व आणि भारत-चीन संबंधांवरील परिणाम जाणून घ्या.

नवी दिल्ली: भारत आणि चीनमधील सीमावादानंतर थंडावलेले संबंध आता पुन्हा एकदा राजकीय पातळीवर रुळावर येताना दिसत आहेत. चीनमधील सत्ताधारी कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायना (CPC) च्या एका उच्चस्तरीय शिष्टमंडळाने सोमवारी दिल्लीतील भारतीय जनता पक्षाच्या मुख्यालयाला भेट दिली. २०२० मधील गलवान खोऱ्यातील हिंसक संघर्षानंतर दोन्ही देशांतील सत्ताधारी पक्षांमध्ये झालेली ही पहिलीच मोठी औपचारिक भेट आहे. या भेटीवरून काँग्रेसने हा देशद्रोह असल्याची टीका केली आहे. या भेटीनंतर भारत-चीनमधील संबंध पुन्हा सुरळीत होणार का, याकडेही लक्ष लागले आहे. 

चिनी शिष्टमंडळाचे नेतृत्व सीपीसीच्या आंतरराष्ट्रीय विभागाच्या उपमंत्री सन हाययान यांनी केले. भाजपचे सरचिटणीस आणि राज्यसभा खासदार अरुण सिंह यांच्या नेतृत्वाखालील भाजप नेत्यांनी चिनी शिष्टमंडळाचे स्वागत केले. सीपीसीच्या आंतरराष्ट्रीय विभागाच्या उपमंत्री सुन हाययान यांनी या बैठकीचे नेतृत्व केले. या बैठकीत भारतातील चीनचे राजदूत जू फेइहोंग हे देखील उपस्थित होते. 

गलवाननंतर भारताने चिनी अॅप्सवर बंदी लादली होती. देशभरात चीनविरोधी वातावरण होते. आजही लोक चीनविरोधात आहेत. ऑपरेशन सिंदूरवेळी चीनने पाकिस्तानला साथ दिली होती. सर्व सॅटेलाईट, मिसाईल आदी गोष्टी पाकिस्तानच्या दिमतीला लावल्या होत्या. असे असताना भाजपाने चीनच्या शिष्टमंडळाला मुख्यालयात बोलविणे हे अनेकांना खटकणारे आहे. मुळात पाहिले तर भाजप आणि चीनच्या सीपीसीचे नेते २००० सालापासून भेटत आले आहेत. भाजपाने आपले शिष्टमंडळ अनेकदा चीनला पाठविलेले आहे. परंतू २०१७ पासूनच्या डोकलाम वादापासून परिस्थिती थोडी बदलली होती. यानंतर २०२० मध्ये भारतीय हद्दीत घुसून चिनी सैन्याने भारतीय सैन्यावर हल्ला केला होता. भारताने त्यात जशासतसे प्रत्यूत्तर दिले होते. यात भारताचे २० जवान शहीद झाले होते. चीनचे त्याहून अधिक सैनिक भारतीय सैन्याने मारले होते. कोरोना व्हायरस पसरविल्याच्या आरोपामुळे चीन आधीच विरोधात जात होता, त्यात हा हल्ला भारतीयांत चीनविरोधात ठिणगी पेटविण्यासाठी पुरेसा ठरला होता. केंद्र सरकारने चिनी कंपन्यांवर कारवाई सुरु केली होती आणि टिकटॉकसह अनेक अॅप्सवर बंदी आणली होती. तसेच देशात बनविलेल्याच वस्तू खरेदी करण्याची व कंपन्यांनाही देशातच वस्तू बनविण्याचे आवाहन करण्यात येत होते.

ऑक्टोबर २०२४ मध्ये रशियातील 'ब्रिक्स' परिषदेदरम्यान खरे भारत- चीनमधील तणाव निवळण्यास सुरुवात झाली होती. यानंतर कैलास मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू होणे, थेट विमानसेवा सुरु झाली होती. यानंतर सप्टेंबर २०२५ मध्ये मोदी चीनमधील एससीओ बैठकीला गेले होते, यानंतर भाजप आणि चीनमधील या राजकीय हालचालींना सुरुवात झाली होती. 

काँग्रेस म्हणतेय हा देशद्रोह...

हा देशद्रोह आहे, जो मोदी आणि त्यांचा पक्ष, भाजप करत आहेत. वचन "लाल डोळा" दाखवण्याचे होते, परंतु मोदी चीनसाठी "लाल गालिचा" अंथरत आहेत, अशा शब्दांत काँग्रेसने या भेटीवर टीका केली आहे.  "भाजपा चीनच्या कम्युनिस्ट पक्षासोबत त्यांच्या मुख्यालयात बैठक घेत आहे. दरम्यान, चीन जम्मू आणि काश्मीरमधील शक्सगाम खोऱ्याला आपला प्रदेश म्हणून दावा करत आहे. गलवान खोऱ्यात चीनशी लढताना आपले शूर सैनिक शहीद होत आहेत. ऑपरेशन सिंदूरमध्ये चीन पाकिस्तानला पाठिंबा देत आहे.", असे काँग्रेसने म्हटले आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : BJP-China Meet Sparks Controversy: Congress Accuses Modi of Betrayal After Border Clashes

Web Summary : A CPC delegation visited BJP headquarters, the first major meet after Galwan. Congress slammed it as betrayal, citing China's claims in Kashmir and support for Pakistan. Relations thaw after border tensions eased since 2024, despite earlier clashes and app bans.
टॅग्स :BJPभाजपाchinaचीनcongressकाँग्रेस