शहरं
Join us  
Trending Stories
1
पीडित कुटुंबाला न्याय मिळणार का? 'दीनानाथ'चौकशीप्रकरणी तीनही समित्यांनी केले अहवाल सादर
2
"कुराण आन्...!" NIA कोठडीत दहशतवादी तहव्वुर राणानं मागितल्या या तीन गोष्टी
3
विशाल गवळीची हत्या केली, त्याला फसवलं गेलंय; विशालच्या कुटुंबीयांचा आरोप
4
आता फ्लॅटच्या देखभाल खर्चावरही लागणार GST! सरकारच्या निर्णयाने मध्यमवर्गीयांना धक्का
5
ताजिकिस्तानात २४ तासांत दोनदा जमीन हादरली; ६.१ रिश्टर स्केलच्या धक्क्यानं लोक घाबरले
6
आला उन्हाळा, तब्येत सांभाळा! आजारांना ठेवा दूर, आरोग्य निरोगी; काय आहे थ्री ड्रिंक थिअरी?
7
राज ठाकरेंनी बोलावलं अन् तालुकाप्रमुख बनवलं; बच्चू कडूंची राजकीय एन्ट्री कशी झाली?
8
८ ची सरासरी, ८० चा स्ट्राईक रेट! २७ कोटींची बोली लागलेला रिषभ पंत पुन्हा फ्लॉप, फलंदाजीचा क्रम बदलला पण...
9
बिअर बारमध्ये चोरी, चोरट्यानं दारू पिऊन मालकाला लिहिली चिठ्ठी; वाचणारे झाले भावूक
10
स्वतंत्र बॅरेक, डाएट, रुटीन चेकअप... पतीची हत्या करणाऱ्या मुस्कानला जेलमध्ये स्पेशल ट्रीटमेंट
11
...तरीही आमचा संसार  सुखाचा झाला! सचिन अहिरांच्या प्रेमाची गोष्ट
12
कल्याणमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून हत्या करणाऱ्या आरोपी विशाल गवळीने संपवलं जीवन, तळोजा कारागृहातील घटना 
13
"तारीख महत्वाची होती...", 'फुले' सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलल्याने प्रतीक गांधीने व्यक्त केली नाराजी
14
"इंडस्ट्रीत लेखक नाही म्हणतात अन् आहे त्याला मानच देत नाहीत", चिन्मय मांडलेकरची खदखद
15
पक्ष्यांचीही निवडणूक घेणारे गाडगीळ दाम्पत्य, पक्षी संवर्धन झाला जीवनाचा ध्यास
16
नद्या पाण्याच्या की सांडपाण्याच्या? जलप्रदूषण करणारे घटक येतातच कुठून?
17
युक्रेनमधील भारतीय कंपनीवर रशियाचा हल्ला! २८ देशांसाठी वाईट बातमी; काय होतं उत्पादन
18
मामी-भाच्याची लव्हस्टोरी... दोनदा घरातून पळाले; मामाने अपमान करताच रचला भयंकर कट
19
कुटुंबीयांच्या संमतीने ठरलं तरी जोडप्याने पळून जाऊन केलं लग्न; कारण समजल्यावर व्हाल हैराण
20
..तर आयफोनसाठी खरच किडन्या विकाव्या लागतील? ३ लाखांपर्यंत जाणार किंमत? काय आहे कारण?

भारतासमोर चीन अन् पाकिस्तान टिकणार नाहीत! अमेरिकन F-35, रशियन Su-57 पेक्षाही मजबूत लढाऊ विमाने बनवणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2025 14:23 IST

भारत आता आपल्या हवाई दलाला बळकट करण्यासाठी स्वतःच्या निर्मित लढाऊ विमानांवर अधिक लक्ष केंद्रित करत आहे.

भारत आता स्वत: लढाऊ विमाने बनवण्यासाठी मोठी तयारी करत आहे. जगातील काही देशांनी आधीच चौथ्या आणि पाचव्या पिढीतील लढाऊ विमाने तयार केली आहेत. यापैकी अमेरिकेच्या एफ-३५ ची सर्वाधिक चर्चा झाली आहे. याशिवाय रशियाचे एसयू-५७ आणि अमेरिकेचे एफ-२१ देखील प्रसिद्ध आहेत.

भारत यापैकी एक जेट विमान देखील खरेदी करू करणार आहे, अशी चर्चा होती. पण आता भारत या परदेशी विमानांपेक्षा आपल्या स्वदेशी लढाऊ विमानांवर अधिक लक्ष केंद्रित करणार आहे.

"कुराण आन्...!" NIA कोठडीत दहशतवादी तहव्वुर राणानं मागितल्या या तीन गोष्टी

मल्टीरोल फायटर एअरक्राफ्ट प्रकल्पांतर्गत भारताने यापूर्वी ११४ नवीन लढाऊ विमाने खरेदी करण्याचा प्लॅन केला होता. या योजनेत F-35, Su-57, F-21, ग्रिपेन, राफेल, युरोफायटर टायफून आणि F-15EX सारख्या परदेशी लढाऊ विमानांचा समावेश होता. पण ही योजना अनेक वर्षांपासून रखडली आहे आणि त्यात खूप विलंब होत आहे. यामुळे आता परदेशी विमानांवर अवलंबून राहण्याऐवजी स्वतःच्या देशात बनवलेल्या विमानांमध्ये सुधारणा करेल आणि त्यांना प्राधान्य देईल.

भारतीय हवाई दलाकडे ३१ लढाऊ स्क्वॉड्रन आहेत तर ४२.५ स्क्वॉड्रनची आवश्यकता आहे. जुनी मिग-२१ विमाने हळूहळू काढून टाकली जात आहेत. त्यामुळे, हवाई दल मजबूत ठेवण्यासाठी, भारत आता आपल्या स्वदेशी लढाऊ विमानांवर अधिक लक्ष केंद्रित करणार आहे.

लढाऊ शस्त्रे बनवण्यासाठी प्राधान्य

भारत सरकार आणि संरक्षण मंत्रालयाने 'आत्मनिर्भर भारत' आणि 'मेक इन इंडिया' अंतर्गत देशात शस्त्रे आणि लढाऊ विमानांच्या निर्मितीला प्राधान्य दिले आहे. याअंतर्गत, भारत आता त्याच्या दोन स्वदेशी लढाऊ विमान प्रकल्पांवर अधिक लक्ष केंद्रित करेल. पहिला म्हणजे पाचव्या पिढीतील AMCA लढाऊ विमान आणि दुसरा म्हणजे चौथ्या पिढीतील तेजस Mk-2, भारतीय हवाई दल अधिक मजबूत व्हावे आणि इतर देशांवरील अवलंबित्व कमी व्हावे यासाठी सरकार या दोन्ही लढाऊ विमानांची संख्या वाढवण्याची योजना आखत आहे.

टॅग्स :airforceहवाईदलIndiaभारत