शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

एकच नंबर! झाडं लावण्यात भारत, चीन अव्वल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2019 17:06 IST

नासानं दिलेल्या अहवालातील आकडेवारी समोर

वॉशिंग्टन: लोकसंख्येच्या बाबतीत आघाडीवर असलेल्या चीन आणि भारतामध्ये विकास वेगानं सुरू असल्यानं त्याचा परिणाम पर्यावरणावर होतो, अशी जगाची धारणा आहे. मात्र या समजुतीला छेद देणारा एक अहवाल समोर आला आहे. वृक्षारोपणात भारत आणि चीन आघाडीवर असल्याचं आकडेवारीतून सिद्ध झालं आहे. विशेष म्हणजे हा अहवाल प्रतिष्ठीत अशा नासा या संस्थेनं दिला आहे. नासानं उपग्रहांच्या माध्यमातून जगभरातील देशांमध्ये असलेल्या वृक्षांची संख्या विचारात घेतली. त्यात भारत आणि चीन झाडं लावण्यात अव्वल असल्याचं दिसून आलं. जगातील एकूण झाडांचा विचार केल्यास, त्यातील एक-तृतीयांश वृक्षवल्ली चीन आणि भारतात असल्याचं अहवालाचं लेखन करणाऱ्या ची. चेन यांनी सांगितलं. मात्र पृथ्वीवरील जंगलांचा विचार केल्यास आकडेवारी नेमकी उलट आहे. जगातील एकूण वनक्षेत्राचा विचार केल्यास, त्यातील केवळ 9 टक्के क्षेत्र भारत आणि चीनमध्ये असल्याचं चेन सांगतात. भारत आणि चीनमध्ये वेगानं शहरीकरण सुरू आहे. त्यामुळे झाडांवर कुऱ्हाड पडते आहे. मात्र तरीही हेच दोन देश वृक्ष लावण्यात अग्रेसर असल्याचं दिसून येतं. ही बाब आश्चर्यजनक असल्याचं बोस्टन विद्यापीठाच्या चेन यांनी म्हटलं.नेचर सस्टेनेबिलिटी मासिकात सोमवारी एक लेख प्रसिद्ध झाला. त्यामध्ये नासाच्या अहवालाची माहिती आहे. नासाच्या उपग्रहांनी गेल्या काही वर्षातील (2000 ते 2017) वृक्ष लागवडीचा वेग आणि प्रमाण टिपलं. त्याचं विश्लेषण करण्यात आलं. त्यात भारत आणि चीन वृक्ष लावण्यात आघाडीवर असल्याचं दिसून आलं. चीनमधील 42 टक्के क्षेत्र वन जमिनीखाली आहे. तर 32 टक्के भागात शेती केली जाते. त्यामुळे चीन हिरवागार आहे. मात्र भारताच्या बाबतीत हीच बाब नेमकी उलट आहे. भारतात तब्बल 82 टक्के जमिनीवर शेती केली जाते. मात्र भारतातील वनक्षेत्राचं प्रमाण केवळ 4.4 टक्के इतकंच आहे. वायू, जल, जमिनीवरील प्रदूषण रोखण्यासाठी चीननं महत्त्वाकांक्षी योजना हाती घेतली आहे. या योजनेच्या अंतर्गत चीननं प्रदूषण कमी करण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. त्याचे सकारात्मक परिणाम चीनमध्ये पाहायला मिळत आहेत.  

टॅग्स :NASAनासाIndiaभारतchinaचीनenvironmentवातावरणpollutionप्रदूषण