शहरं
Join us  
Trending Stories
1
"ड्रग्ज... शिंदे... माजी पोलीस अधिकारी..., राज्याचं राजकारण नशेबाज झालंय!"; राऊतांचा फडणवीसांवर निशाणा
2
गोपनीय बैठका अन् भाजपाच्या 'एकहाती' सत्तेला खिंडार पाडण्याची रणनीती; जळगावात 'कणकवली पॅटर्न'?
3
मसाला बनवणाऱ्या कंपनीनं मागितलेले ₹३८ कोटी, गुंतवणूकदारांनी झोळीत टाकले ₹२५,००० कोटी; पाहा डिटेल्स
4
कॅनडात दोन आठवड्यात दोन भारतीयांची हत्या; कोण होते शिवांक अवस्थी आणि हिमांशी खुराणा?
5
Vijay Hazare Trophy: किंग कोहलीचं शतक हुकलं! पण 'फिफ्टी प्लस'च्या 'सिक्सर'सह पुन्हा दाखवला क्लास
6
BSNL ग्राहकांसाठी महत्वाची बातमी! 3G सेवा कायमची बंद केली जाणार; तुम्हाला मोबाईल अन सिम बदलावे लागणार...
7
AI मुळे नोकरी गेली, खर्च भागवण्यासाठी कपल बनलं 'बंटी-बबली'; १५ लाखांच्या चोरीची पोलखोल
8
Travel : 'या' देशात मुस्लिम  बहुसंख्य, पण नोटांवर आहे गणपती! भारतातून १००००० रुपये घेऊन जाल तर कोट्यधीश व्हाल
9
"आता ट्रम्प आणि फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉनही जाणार यांच्या पक्षात, कारण...!"; राऊतांचा भाजपाला बोचरा टोमणा 
10
"माणूसकीचा विसर पडण्याच्या आत...", बांगलादेशमध्ये हिंदू युवकाची हत्या, जान्हवी कपूर संतापली
11
गणपती बाप्पा मोरया… २०२६ मध्ये किती वेळा अंगारक योग जुळून येणार? ‘या’ अंगारकी चतुर्थी खास!
12
करोडपती होण्याचे स्वप्न आता आवाक्यात! दरमहा इतक्या रुपयांची SIP; पाहा चक्रवाढ व्याजाची कमाल
13
महायुतीत खदखद वाढली, इच्छुकांच्या नाराजीचा भूकंप?; काठावर बसलेले मविआच्या संपर्कात
14
कॅनडात आणखी एका भारतीय विद्यार्थ्याची हत्या, शिवांकला विद्यापीठ परिसरातच घातल्या गोळ्या
15
बांगलादेशात क्रूरतेचा कळस! दीपू दास हत्याकांडात ४ आरोपींची गुन्ह्याची कबुली; पोलीस म्हणाले...
16
किडनी विक्रीतून रामकृष्णने घेतली २० एकर जमीन; फेसबुक ग्रुपद्वारे विणले अवयव तस्करीसाठी एजंटांचे जाळे
17
नव्या वर्षापासून UPI साठी लागू होणार नवा नियम; ई-कॉमर्स कंपन्यांच्या चलाखीवर बसणार चाबूक, प्रकरण काय?
18
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये जाणार की उद्धवसेनेत?; उद्धव ठाकरेंचा फोन, पुण्यात राजकीय ट्विस्ट
19
भारतातील युपीआय व्यवहारांत मोठी प्रादेशिक दरी; महाराष्ट्र अग्रस्थानी तर बिहार पिछाडीवर, कारण काय?
20
खोपोलीत शिंदेसेनेच्या नगरसेविकेच्या पतीची हत्या! मुलाला शाळेत सोडून परत येत असताना केला हल्ला
Daily Top 2Weekly Top 5

एकच नंबर! झाडं लावण्यात भारत, चीन अव्वल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2019 17:06 IST

नासानं दिलेल्या अहवालातील आकडेवारी समोर

वॉशिंग्टन: लोकसंख्येच्या बाबतीत आघाडीवर असलेल्या चीन आणि भारतामध्ये विकास वेगानं सुरू असल्यानं त्याचा परिणाम पर्यावरणावर होतो, अशी जगाची धारणा आहे. मात्र या समजुतीला छेद देणारा एक अहवाल समोर आला आहे. वृक्षारोपणात भारत आणि चीन आघाडीवर असल्याचं आकडेवारीतून सिद्ध झालं आहे. विशेष म्हणजे हा अहवाल प्रतिष्ठीत अशा नासा या संस्थेनं दिला आहे. नासानं उपग्रहांच्या माध्यमातून जगभरातील देशांमध्ये असलेल्या वृक्षांची संख्या विचारात घेतली. त्यात भारत आणि चीन झाडं लावण्यात अव्वल असल्याचं दिसून आलं. जगातील एकूण झाडांचा विचार केल्यास, त्यातील एक-तृतीयांश वृक्षवल्ली चीन आणि भारतात असल्याचं अहवालाचं लेखन करणाऱ्या ची. चेन यांनी सांगितलं. मात्र पृथ्वीवरील जंगलांचा विचार केल्यास आकडेवारी नेमकी उलट आहे. जगातील एकूण वनक्षेत्राचा विचार केल्यास, त्यातील केवळ 9 टक्के क्षेत्र भारत आणि चीनमध्ये असल्याचं चेन सांगतात. भारत आणि चीनमध्ये वेगानं शहरीकरण सुरू आहे. त्यामुळे झाडांवर कुऱ्हाड पडते आहे. मात्र तरीही हेच दोन देश वृक्ष लावण्यात अग्रेसर असल्याचं दिसून येतं. ही बाब आश्चर्यजनक असल्याचं बोस्टन विद्यापीठाच्या चेन यांनी म्हटलं.नेचर सस्टेनेबिलिटी मासिकात सोमवारी एक लेख प्रसिद्ध झाला. त्यामध्ये नासाच्या अहवालाची माहिती आहे. नासाच्या उपग्रहांनी गेल्या काही वर्षातील (2000 ते 2017) वृक्ष लागवडीचा वेग आणि प्रमाण टिपलं. त्याचं विश्लेषण करण्यात आलं. त्यात भारत आणि चीन वृक्ष लावण्यात आघाडीवर असल्याचं दिसून आलं. चीनमधील 42 टक्के क्षेत्र वन जमिनीखाली आहे. तर 32 टक्के भागात शेती केली जाते. त्यामुळे चीन हिरवागार आहे. मात्र भारताच्या बाबतीत हीच बाब नेमकी उलट आहे. भारतात तब्बल 82 टक्के जमिनीवर शेती केली जाते. मात्र भारतातील वनक्षेत्राचं प्रमाण केवळ 4.4 टक्के इतकंच आहे. वायू, जल, जमिनीवरील प्रदूषण रोखण्यासाठी चीननं महत्त्वाकांक्षी योजना हाती घेतली आहे. या योजनेच्या अंतर्गत चीननं प्रदूषण कमी करण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. त्याचे सकारात्मक परिणाम चीनमध्ये पाहायला मिळत आहेत.  

टॅग्स :NASAनासाIndiaभारतchinaचीनenvironmentवातावरणpollutionप्रदूषण