शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
2
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
3
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
4
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
5
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
6
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
7
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
8
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
9
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
10
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
11
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
12
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
13
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
14
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
15
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
16
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
17
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
18
जबरदस्त कॅमेरा आणि दमदार बॅटरी, किंमत १० हजारांहून कमी; नव्या 5G फोनची सर्वत्र चर्चा!
19
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
20
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...

"भारतात EVM..."; मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांचं इलॉन मस्क यांना उत्तर, स्पष्टच बोलले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2025 17:30 IST

मस्क यांनी 15 जून 2024 रोजी केलेल्या एका ट्विटमध्ये म्हटले होते की, ईव्हीएमचा वापर बंद करायला हवा. हे एखाद्या व्यक्तीद्वारे अथवा आर्टीफिशिअल इंटेलिजन्स (एआय)च्या सहाय्याने हॅक केले जाऊ शकते.

इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन अर्थात ईव्हीएम हॅक होण्यासंदर्भातील सर्व आरोपांचे निवडणूक आयोगाने खंडन केले आहे. ईव्हीएमसंदर्भात कसल्याही प्रकारची छेडछाड होऊ शकत नाही, असे आयोगाने म्हटले आहे. खरे तर, गेल्या वर्षात झालेल्या लोकसभा निवडणुकीचे निकाल आल्यानंतर, टेस्ला आणि स्पेसएक्सचे मालक तथा जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेल्या इलॉन मस्क यांनी इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनच्या (ईव्हीएम) सुरक्षिततेसंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. ईव्हीएम हॅक केले जाऊ शकते, असे त्यांनी म्हटेले होते.

काय म्हणाले होते मस्क? -मस्क यांनी 15 जून 2024 रोजी केलेल्या एका ट्विटमध्ये म्हटले होते की, ईव्हीएमचा वापर बंद करायला हवा. हे एखाद्या व्यक्तीद्वारे अथवा आर्टीफिशिअल इंटेलिजन्स (एआय)च्या सहाय्याने हॅक केले जाऊ शकते.

निवडणूक आयोगाचे उत्तर -दिल्ली विधानसभा निवडणुकीची घोषणा करण्यासाठी मंगळवारी बोलावलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना राजीव कुमार यांनी EVM हॅक होण्यासंदर्भातील आरोपांना प्रत्युत्तर दिले. मात्र, मुख्य निवडणूक आयुक्तांनी कुणाचेही नाव घेतले नाही. ते म्हणाले, एक तंत्रज्ञ आहेत, जे ईव्हीएमवर प्रश्न उपस्थित करत आहेत. यासंदर्भात बोलताना ते म्हणाले, ते जे बोतत आहेत, तसे अमेरिकेत तर होऊ शकते. तेथे वेगवेगळ्या इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदान केले जाऊ शकते. तेथील मशीन्स इंटरनेटला कनेक्ट असतात. मात्र हे भारतात शक्य नाही."

"भारतामध्ये ईव्हीएमसोबत छेडछाड केली जाऊ शकत नाही. ईव्हीएममध्ये कुठल्याही प्रकारचे बग अथवा व्हायरस नाही. तसेच, हे हॅक केले जाऊ शकत नाही, हे निराधार आहे, असे सर्वोच्च न्यायालयानेही अनेक वेळा म्हटले आहे," असेही निवडणूक आयोगाने म्हटले आहे. निवडणूक आयोगाचे हे उत्तर इलॉन मस्क यांच्या 'त्या' विधानाशी जोडले जात आहे.

सायंकाळी 5 नंतर मतदानाची टक्केवारी कशी वाढते?पत्रकारांशी संवाद साधताना मुख्य निवडणूक आयुक्त म्हणाले की, आजकाल प्रत्येक निवडणुकांवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. मतदारांमध्ये मिस मॅच झाले, मतमोजणी मंदावली, ईव्हीएम हॅक केले...अशाप्रकारचे प्रश्न उपस्थित केले जातात. सायंकाळी 5 नंतर मतदानाची टक्केवारी वाढल्याचा आरोपही केला जातोय. पण, मतदानाची टक्केवारी कुठे वाढली, याची आम्हालाही माहिती द्या, आम्ही त्याची चौकशी करू. 

'या' सर्वांचा अभ्यास केल्यानंतर अंतिम आकडा जारी केला जातो -पोलिंग एजंट सकाळपासून संध्याकाळपर्यंत मतदान केंद्रातच असतात. ते मतदान प्रक्रियेवर लक्ष ठेवून असतात. सर्व काही त्यांच्या समोर घडते. मतदान संपण्यापूर्वी, मतदान केंद्र सोडण्यापूर्वी फॉर्म 17 सी भरला जातो, ज्यामध्ये मतांची संख्या नोंदवली जाते. सेक्टर मॅजिस्ट्रेट दिवसभरात वेगवेगळ्या वेळी मतदान केंद्राला भेट देतात आणि मतदानाची नोंद घेतात ट्रेंड समजून घेण्याचा प्रयत्न करतात. जगात कुठेही मतदान संपल्यानंतर 6 वाजता लगेचच मतदानाची टक्केवारी दिली जात नाही. 5 वाजल्यानंतर पीठासीन अधिकारी मतदारांना ठिकठिकाणी टोकन देतात. मग शेवटचे मतदान झाल्यानंतर ते पॅक केले जाते. फॉर्म 17 सी भरला जातो. त्याची संख्या लाखात आहे. या सर्वांचा अभ्यास केल्यानंतर अंतिम आकडा जारी केला जातो, अशी महत्वाची माहिती राजीव कुमार यांनी यावेळी दिली.  

टॅग्स :Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगelon muskएलन रीव्ह मस्कEVM Machineईव्हीएम मशीन