शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
2
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...
3
Badlapur: बदलापुरात रासायनिक कंपनीत आग!
4
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
5
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
6
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
7
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
8
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
9
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     
10
How To Deal With Heart Attack: घरात एकटे असताना 'हार्ट अटॅक' आला तर स्वत:चा जीव कसा वाचवाल? डॉक्टरांनी सांगितल्या 'या' सोप्या टिप्स
11
'नागपूरची लेक' वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखला नितीन गडकरींचा 'व्हिडीओ कॉल', काय झाल्या गप्पा?
12
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
13
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
14
वयोवृद्ध महिलेच्या खुनाचे रहस्य उलगडले, सावत्र मुलाला व पतीला अटक, गुन्हे शाखा दोनची कामगिरी
15
नागपुरला मिळाले ३५ वे पोलीस ठाणे; खापरखेडा पोलीस ठाणे आता नागपुरच्या कार्यकक्षेत
16
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
17
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
18
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
19
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
20
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा

"भारतात EVM..."; मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांचं इलॉन मस्क यांना उत्तर, स्पष्टच बोलले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2025 17:30 IST

मस्क यांनी 15 जून 2024 रोजी केलेल्या एका ट्विटमध्ये म्हटले होते की, ईव्हीएमचा वापर बंद करायला हवा. हे एखाद्या व्यक्तीद्वारे अथवा आर्टीफिशिअल इंटेलिजन्स (एआय)च्या सहाय्याने हॅक केले जाऊ शकते.

इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन अर्थात ईव्हीएम हॅक होण्यासंदर्भातील सर्व आरोपांचे निवडणूक आयोगाने खंडन केले आहे. ईव्हीएमसंदर्भात कसल्याही प्रकारची छेडछाड होऊ शकत नाही, असे आयोगाने म्हटले आहे. खरे तर, गेल्या वर्षात झालेल्या लोकसभा निवडणुकीचे निकाल आल्यानंतर, टेस्ला आणि स्पेसएक्सचे मालक तथा जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेल्या इलॉन मस्क यांनी इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनच्या (ईव्हीएम) सुरक्षिततेसंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. ईव्हीएम हॅक केले जाऊ शकते, असे त्यांनी म्हटेले होते.

काय म्हणाले होते मस्क? -मस्क यांनी 15 जून 2024 रोजी केलेल्या एका ट्विटमध्ये म्हटले होते की, ईव्हीएमचा वापर बंद करायला हवा. हे एखाद्या व्यक्तीद्वारे अथवा आर्टीफिशिअल इंटेलिजन्स (एआय)च्या सहाय्याने हॅक केले जाऊ शकते.

निवडणूक आयोगाचे उत्तर -दिल्ली विधानसभा निवडणुकीची घोषणा करण्यासाठी मंगळवारी बोलावलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना राजीव कुमार यांनी EVM हॅक होण्यासंदर्भातील आरोपांना प्रत्युत्तर दिले. मात्र, मुख्य निवडणूक आयुक्तांनी कुणाचेही नाव घेतले नाही. ते म्हणाले, एक तंत्रज्ञ आहेत, जे ईव्हीएमवर प्रश्न उपस्थित करत आहेत. यासंदर्भात बोलताना ते म्हणाले, ते जे बोतत आहेत, तसे अमेरिकेत तर होऊ शकते. तेथे वेगवेगळ्या इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदान केले जाऊ शकते. तेथील मशीन्स इंटरनेटला कनेक्ट असतात. मात्र हे भारतात शक्य नाही."

"भारतामध्ये ईव्हीएमसोबत छेडछाड केली जाऊ शकत नाही. ईव्हीएममध्ये कुठल्याही प्रकारचे बग अथवा व्हायरस नाही. तसेच, हे हॅक केले जाऊ शकत नाही, हे निराधार आहे, असे सर्वोच्च न्यायालयानेही अनेक वेळा म्हटले आहे," असेही निवडणूक आयोगाने म्हटले आहे. निवडणूक आयोगाचे हे उत्तर इलॉन मस्क यांच्या 'त्या' विधानाशी जोडले जात आहे.

सायंकाळी 5 नंतर मतदानाची टक्केवारी कशी वाढते?पत्रकारांशी संवाद साधताना मुख्य निवडणूक आयुक्त म्हणाले की, आजकाल प्रत्येक निवडणुकांवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. मतदारांमध्ये मिस मॅच झाले, मतमोजणी मंदावली, ईव्हीएम हॅक केले...अशाप्रकारचे प्रश्न उपस्थित केले जातात. सायंकाळी 5 नंतर मतदानाची टक्केवारी वाढल्याचा आरोपही केला जातोय. पण, मतदानाची टक्केवारी कुठे वाढली, याची आम्हालाही माहिती द्या, आम्ही त्याची चौकशी करू. 

'या' सर्वांचा अभ्यास केल्यानंतर अंतिम आकडा जारी केला जातो -पोलिंग एजंट सकाळपासून संध्याकाळपर्यंत मतदान केंद्रातच असतात. ते मतदान प्रक्रियेवर लक्ष ठेवून असतात. सर्व काही त्यांच्या समोर घडते. मतदान संपण्यापूर्वी, मतदान केंद्र सोडण्यापूर्वी फॉर्म 17 सी भरला जातो, ज्यामध्ये मतांची संख्या नोंदवली जाते. सेक्टर मॅजिस्ट्रेट दिवसभरात वेगवेगळ्या वेळी मतदान केंद्राला भेट देतात आणि मतदानाची नोंद घेतात ट्रेंड समजून घेण्याचा प्रयत्न करतात. जगात कुठेही मतदान संपल्यानंतर 6 वाजता लगेचच मतदानाची टक्केवारी दिली जात नाही. 5 वाजल्यानंतर पीठासीन अधिकारी मतदारांना ठिकठिकाणी टोकन देतात. मग शेवटचे मतदान झाल्यानंतर ते पॅक केले जाते. फॉर्म 17 सी भरला जातो. त्याची संख्या लाखात आहे. या सर्वांचा अभ्यास केल्यानंतर अंतिम आकडा जारी केला जातो, अशी महत्वाची माहिती राजीव कुमार यांनी यावेळी दिली.  

टॅग्स :Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगelon muskएलन रीव्ह मस्कEVM Machineईव्हीएम मशीन