शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
3
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
4
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
5
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
6
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
7
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
8
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
9
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
10
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
11
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
12
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
13
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
14
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
15
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
16
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
17
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
18
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
19
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
20
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?

Car Accident: कारचा भीषण अपघात; गाडीला आग लागल्याने एकाच कुटुंबातील 5 जणांचा होरपळून मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2022 12:04 IST

Car Accident: भरधाव वेगाने येणारी कार पुलावर आदळली, यानंतर गाडीने अचानक पेट घेतला.

राजनांदगाव: छत्तीसगडमधील राजनांदगाव जिल्ह्यात एक मोठा अपघात झाला आहे. पुलावर आदळल्यानंतर एका कारने पेट घेतला, या अपघातात एकाच कुटुंबातील पाच जणांचा होरपळून मृत्यू झाला. तीन मुलींसह पती-पत्नी एका लग्न समारंभातून घरी परतत असताना हा अपघात झाला. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवार-शुक्रवारी मध्यरात्री राजनांदगाव खैरागड रोडवरील थेलकाडीह पोलीस स्टेशन अंतर्गत सिंगारपूर गावात हा अपघात झाला. लग्नातून परतत असताना अल्टो गाडी पुलावर आदळल्यानंतर गाडीने पेट घेतला. यात खैरागडच्या गोलबाजार येथील रहिवासी असलेल्या कोचर कुटुंबाचा होरपळून मृत्यू झाला. हे कुटुंब बालोद येथील एका लग्न समारंभातून घरी परतत होते. मृतांमध्ये पती पत्नी आणि तीन 20-25 वर्षांच्या मुलींचा समावेश आहे. 

घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. राजनांदगावचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक संजय महादेवा यांनी सांगितले की, पोलिस आणि फॉरेन्सिक टीम या घटनेचा तपास करत आहेत. पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. फॉरेन्सिक तपासणी अहवाल आल्यानंतरच अपघाताचे नेमके कारण समोर येईल. 

टॅग्स :AccidentअपघातChhattisgarhछत्तीसगडDeathमृत्यूfireआग