शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
3
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
4
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
5
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
6
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
7
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
8
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
9
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
10
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
11
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
12
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
13
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
14
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
15
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
16
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
17
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
18
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
19
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
20
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन

Car Accident: कारचा भीषण अपघात; गाडीला आग लागल्याने एकाच कुटुंबातील 5 जणांचा होरपळून मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2022 12:04 IST

Car Accident: भरधाव वेगाने येणारी कार पुलावर आदळली, यानंतर गाडीने अचानक पेट घेतला.

राजनांदगाव: छत्तीसगडमधील राजनांदगाव जिल्ह्यात एक मोठा अपघात झाला आहे. पुलावर आदळल्यानंतर एका कारने पेट घेतला, या अपघातात एकाच कुटुंबातील पाच जणांचा होरपळून मृत्यू झाला. तीन मुलींसह पती-पत्नी एका लग्न समारंभातून घरी परतत असताना हा अपघात झाला. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवार-शुक्रवारी मध्यरात्री राजनांदगाव खैरागड रोडवरील थेलकाडीह पोलीस स्टेशन अंतर्गत सिंगारपूर गावात हा अपघात झाला. लग्नातून परतत असताना अल्टो गाडी पुलावर आदळल्यानंतर गाडीने पेट घेतला. यात खैरागडच्या गोलबाजार येथील रहिवासी असलेल्या कोचर कुटुंबाचा होरपळून मृत्यू झाला. हे कुटुंब बालोद येथील एका लग्न समारंभातून घरी परतत होते. मृतांमध्ये पती पत्नी आणि तीन 20-25 वर्षांच्या मुलींचा समावेश आहे. 

घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. राजनांदगावचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक संजय महादेवा यांनी सांगितले की, पोलिस आणि फॉरेन्सिक टीम या घटनेचा तपास करत आहेत. पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. फॉरेन्सिक तपासणी अहवाल आल्यानंतरच अपघाताचे नेमके कारण समोर येईल. 

टॅग्स :AccidentअपघातChhattisgarhछत्तीसगडDeathमृत्यूfireआग