शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
2
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
3
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
4
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
5
ब्राझीलच्या माजी राष्ट्रपतींना सुनावली २७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, निवडणूक हरल्यानंतर केलेली ती कृती भोवली
6
Python Hunting: अजगर मारून त्याचं मांस शिजवलं, दोन जणांना अटक! 
7
सिक्कीममध्ये निसर्गाचा कोप! भूस्खलनात ४ जणांचा मृत्यू, ३ जण बेपत्ता, बचावकार्य सुरू
8
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
9
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
10
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
11
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
12
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
13
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
14
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
15
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
16
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
17
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
18
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
19
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
20
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल

Car Accident: कारचा भीषण अपघात; गाडीला आग लागल्याने एकाच कुटुंबातील 5 जणांचा होरपळून मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2022 12:04 IST

Car Accident: भरधाव वेगाने येणारी कार पुलावर आदळली, यानंतर गाडीने अचानक पेट घेतला.

राजनांदगाव: छत्तीसगडमधील राजनांदगाव जिल्ह्यात एक मोठा अपघात झाला आहे. पुलावर आदळल्यानंतर एका कारने पेट घेतला, या अपघातात एकाच कुटुंबातील पाच जणांचा होरपळून मृत्यू झाला. तीन मुलींसह पती-पत्नी एका लग्न समारंभातून घरी परतत असताना हा अपघात झाला. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवार-शुक्रवारी मध्यरात्री राजनांदगाव खैरागड रोडवरील थेलकाडीह पोलीस स्टेशन अंतर्गत सिंगारपूर गावात हा अपघात झाला. लग्नातून परतत असताना अल्टो गाडी पुलावर आदळल्यानंतर गाडीने पेट घेतला. यात खैरागडच्या गोलबाजार येथील रहिवासी असलेल्या कोचर कुटुंबाचा होरपळून मृत्यू झाला. हे कुटुंब बालोद येथील एका लग्न समारंभातून घरी परतत होते. मृतांमध्ये पती पत्नी आणि तीन 20-25 वर्षांच्या मुलींचा समावेश आहे. 

घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. राजनांदगावचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक संजय महादेवा यांनी सांगितले की, पोलिस आणि फॉरेन्सिक टीम या घटनेचा तपास करत आहेत. पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. फॉरेन्सिक तपासणी अहवाल आल्यानंतरच अपघाताचे नेमके कारण समोर येईल. 

टॅग्स :AccidentअपघातChhattisgarhछत्तीसगडDeathमृत्यूfireआग