शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

छत्तीसगड लोकसभा निवडणूक निकाल २०१९ : विधानसभेतील पराभवाचा भाजपने काढला वचपा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2019 05:03 IST

विधानसभा निवडणुकांतील पराभवाच्या धक्क्यातून लगेच सावरत ११ पैकी ९ जागांवर विजय मिळवत भाजपाने जनमानसाचा गमावलेला विश्वास परत मिळविल्याचेच चित्र आहे.

- योगेश पांडे विधानसभा निवडणुकांतील पराभवाच्या धक्क्यातून लगेच सावरत ११ पैकी ९ जागांवर विजय मिळवत भाजपाने जनमानसाचा गमावलेला विश्वास परत मिळविल्याचेच चित्र आहे. विधानसभेत तब्बल ७५ टक्के जागांवर विजय मिळविणाऱ्या काँग्रेसचा विजयरथ भाजपाने थांबविला आहे. काँग्रेसचे उमेदवार अवघ्या दोन जागांवर आघाडीवर होते.विधानसभेतील चुकांपासून धडा घेत भाजपाने यंदा सर्वच उमेदवार बदलत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. विधानसभेत ९० पैकी १५ जागांवर विजय मिळविणाºया भाजपाला नवीन प्रदेशाध्यक्ष विक्रम उसेंडी यांच्या नेतृत्वात लोकसभेत दणदणीत यश मिळाले आहे. अरुण साव (बिलासपूर), गुहाराम आजगले (जांजगिर),गोमती साई (रायगड), सुनील सोनी (रायपूर), संतोष पांडे (राजनांदगाव), रेणुका सिंग (सरगुजा) या भाजपच्या सहा उमेदवारांनी तर लाखाहून अधिक मताधिक्य मिळविले. तर इतरांनीदेखील सन्मानजनक मतं मिळविली आहेत. दुसरीकडे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या नेतृत्वात काँग्रेसला दारुण अपयशाचा सामना करावा लागला आहे. २०१४ च्या तुलनेत काँग्रेसची एक जागा वाढली असली तरी ही पक्षाची नामुष्कीच मानली जात आहे. छत्तीसगडमध्ये पाच महिन्यांतच जनतेने सत्ताधारी काँग्रेसला नाकारले आहे. भाजपाने नियोजनबद्ध पद्धतीने तळागाळात जाऊन मतदारांशी संपर्क केला. प्रत्येक मतदारसंघातील स्थानिक मुद्यांंना प्रचारात स्थान देण्यावर भर दिला.निकालाची कारणेविधानसभेतील पराभवानंतर प्रदेश नेतृत्वात बदल करण्यात आला. तसेच संघटन मजबुतीवर विशेष भर देण्यात आला.जनतेमधील नाराजी लक्षात घेऊन सर्व खासदारांचे तिकीट कापून नवीन उमेदवारांना संधी देण्यात आली.पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा व माजी मुख्यमंत्री डॉ.रमण सिंह यांच्या प्रचाराची ‘जादू’ चालली.

टॅग्स :Lok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालChhattisgarh Lok Sabha Election 2019छत्तीसगढ लोकसभा निवडणूक 2019BJPभाजपाcongressकाँग्रेस