शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

पक्षासाठी काय'पण'! भाजपा उमेदवार पराभूत झाल्यास 'हा' गडी कापणार मिशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2018 17:45 IST

रायगढ जिल्ह्यात काँग्रेस आणि भाजपामध्ये काँटे की टक्कर

रायगढ: छत्तीसगढमधील रायगढ जिल्ह्यातील खरसिया विधानसभा मतदारसंघाची सध्या संपूर्ण राज्यात चर्चा आहे. या ठिकाणी काँग्रेस आणि भाजपात काँटे की टक्कर पाहायला मिळते आहे. विशेष म्हणजे या मतदारसंघात दोन्ही पक्षांकडून तरुण उमेदवार रिंगणात आहेत. काँग्रेसकडून युवक काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष उमेश पटेल मैदानात आहेत. तर भाजपानं जिल्हाधिकारी पदाचा राजीनामा दिलेल्या ओ. पी. चौधरींना तिकीट दिलं आहे. चौधरींच्या विजयासाठी भाजपानं पूर्ण ताकद लावली आहे. त्यामुळेच चौधरीच निवडणूक जिंकतील, असा विश्वास भाजपाच्या नेत्यांना आहे. त्यामुळेच भाजपाचे वरिष्ठ नेते डॉ. श्रवण श्रीवानी यांनी एक अजब पण केला आहे. चौधरी पराभूत झाल्यास आपण मिशी कापू, असं श्रीवानी यांनी म्हटलं आहे. डॉ. श्रवण श्रीवानी हे भाजपाचे जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी ओ. पी. चौधरी यांच्या विजयाची खात्री आहे. त्यामुळेच चौधरी पराभूत झाले, तर आपण मिशी कापू, असं त्यांनी जाहीरपणे सांगितलं आहे. आपल्याला मतदारांवर पूर्ण विश्वास असल्याचं ते म्हणाले. 'मतदारांनी ज्या पद्धतीनं चौधरी यांना पाठिंबा दिला आहे, ते पाहता त्यांचा विजय पक्का आहे. जर त्यांचा पराभव झाला, तर आयुष्यभर मिशांशिवाय फिरेन,' असा पण श्रीवानी यांनी केला आहे. काँग्रेसचे उमेश पटेल आणि भाजपाचे ओ. पी. चौधरी हे समवयस्क आहेत. दोन तरुण उमेदवार रिंगणात असल्यानं निवडणूक अतिशय चुरशीची झाली आहे. हे दोन्ही नेते मतदारसंघात लोकप्रिय असल्यानं निवडणुकीच्या निकालाकडे जनतेचं लक्ष लागलं आहे. खरसिया विधानसभा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र चौधरी यांनी दिलेल्या आव्हानामुळे या मतदारसंघात काँटे की टक्कर पाहायला मिळते आहे. याआधी हा मतदारसंघ काँग्रेसनं अगदी लिलया जिंकला होता. मात्र आता भाजपानं कंबर कसल्यानं काँग्रेसची वाट बिकट झाली आहे. 11 डिसेंबरला छत्तीसगढ विधानसभा निवडणुकीचा निकाल आहे.  

टॅग्स :Chhattisgarh Assembly Election 2018छत्तीसगड विधानसभा निवडणूक 2018BJPभाजपाcongressकाँग्रेस