शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

खचाखच भरलेली ट्रेन आणि भीषण आग; बर्निंग ट्रेनमधून 'असा' वाचला 500 प्रवाशांचा जीव

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2023 10:37 IST

रेल्वेच्या तीन बोगींची जळून राख झाली. यामध्ये 8 जण जखमी झाले आहेत. स्टेशन मास्तरच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली आहे. 

छट पुजेनिमित्त रेल्वे विभागाकडून विशेष गाड्या चालवल्या आहेत. यामध्ये नवी दिल्ली ते दरभंगा जाणाऱ्या प्रवाशांसाठी 02570 क्लोन एक्स्प्रेसचाही समावेश आहे. मात्र बुधवारी म्हणजेच या ट्रेनला अचानक आग लागली. त्यामुळे रेल्वेच्या तीन बोगींची जळून राख झाली. यामध्ये 8 जण जखमी झाले आहेत. स्टेशन मास्तरच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली आहे. 

दिल्लीहून दरभंगाच्या दिशेने जाणारी 02570 क्लोन एक्स्प्रेस ट्रेन इटावापूर्वी सराई भूपत स्थानकावरून गेली तेव्हा स्टेशन मास्टरला स्लीपर कोचमधून धूर निघताना दिसला. त्यांनी तात्काळ याची माहिती वॉकीटॉकीच्या माध्यमातून रेल्वे चालक व गार्डला दिली. स्टेशन मास्तरकडून माहिती मिळाल्यानंतर ट्रेन थांबवण्यात आली तेव्हा दोन स्लीपर कोच आणि एक जनरल डबा जळत होता. ट्रेनही प्रवाशांनी खचाखच भरली होती. आग लागल्याचे लक्षात येताच ट्रेनमध्ये चेंगराचेंगरी झाली. सर्वत्र आरडाओरडा ऐकू येत होता. 

जीव वाचवण्यासाठी बोगीतून उड्या मारायला सुरुवात

ट्रेन थांबल्यावर प्रवाशांनी जीव वाचवण्यासाठी बोगीतून उड्या मारायला सुरुवात केली. ट्रेन थांबवलेल्या ठिकाणी अग्निशमन दलाच्या गाड्या पोहोचल्या. ट्रेनला लागलेली आग आटोक्यात आणण्यात आली. जखमी प्रवाशांना तातडीने रुग्णवाहिकेच्या मदतीने जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. तीनही बोगींमध्ये ठेवलेले प्रवाशांचे सामान पूर्णपणे जळून राख झाले. मात्र सुदैवाने स्टेशन मास्तरच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना होण्यापूर्वीच टळली. तीन डब्यांमध्ये 500 प्रवासी होते 

शॉर्ट सर्किटमुळे लागली आग, तपास सुरू

एसपी जीआरपी संजय कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, क्लोन एक्स्प्रेसमधील आग आटोक्यात आणल्यानंतर तिन्ही जळालेल्या बोगी बाहेर काढण्यात आल्या. त्यांच्या जागी नवीन बोगी जोडण्यात आल्या. त्यानंतर ही ट्रेन इच्छित स्थळी रवाना करण्यात आली. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. मात्र, याची अद्याप पुष्टी झालेली नाही. आगीचे खरं कारण काय, याचा शोध घेतला जात आहे.

ट्रेनने छपराला जाणाऱ्या एका प्रवाशाने सांगितलं की, ट्रेनच्या आत चार्जिंग पॉईंटमध्ये कोणीतरी चार्जर लावला होता. तेथून शॉर्ट सर्किट झालं. त्यानंतर धूर निघून आग लागली. त्यामुळे रेल्वेत गोंधळ उडाला. आग लागली तेव्हा ट्रेनचा वेग जास्त होता. ट्रेन थांबवण्यासाठी कुणीतरी साखळीही ओढली. त्यानंतर काही वेळाने ट्रेन एका ठिकाणी थांबली आणि सर्व प्रवाशांनी जीव वाचवण्यासाठी उड्या मारायला सुरुवात केली. या आगीत त्याच्या दोन बॅगही जळून खाक झाल्याचं प्रवाशाने सांगितलं. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

टॅग्स :railwayरेल्वेfireआगUttar Pradeshउत्तर प्रदेश