शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Update : मान्सूनच्या पावसाला कधीपासून सुरुवात होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
2
“राहुल गांधी यांच्या प्रश्नांना निवडणूक आयोग वस्तुनिष्ठ उत्तर का देत नाही?”: हर्षवर्धन सपकाळ
3
Raja Raghuvanshi : सोनम-राजाचा पाठलाग करत होती 'लाल' कार? नव्या CCTV फुटेजमध्ये दिसली संशयास्पद हालचाल
4
“एकनाथ शिंदेंना नकोत, आदित्य-उद्धव ठाकरेंना त्रास दिला, एकनिष्ठ व्यक्ती हवी”: चंद्रकांत खैरे
5
"पैसा वळवलेला नाही, बजेटनुसारच तो खर्च केलाय"; लाडकी बहीणवरुन CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
6
Priya Saroj Rinku Singh: रिंकूने अंगठी घालताच प्रिया सरोज यांना अश्रू अनावर; बघा साखरपुड्यातील व्हिडीओ
7
राजा रघुवंशीची हत्या, सोनम अजूनही बेपत्ता; मेघालयात हनिमूनसाठी गेलेल्या जोडप्यासोबत नेमकं काय घडलं?
8
LIC ने महिलांसाठी आणली खास योजना, दरमहा मिळतील ७००० रुपये; जाणून घ्या माहिती...
9
क्रिकेटर रिंकू सिंह आणि खासदार प्रिया सरोज यांचा साखरपुडा! दोघांच्या खास लूकची चर्चा; इथं पाहा Pics
10
पुण्यात अंधश्रद्धेचा कळस! झाडातून वाहू लागलं पाणी, लोकांनी पूजा करत घेतले दर्शन; नंतर कळलं की...
11
चाकू लागला तरी रिक्षाची चावी काढून पळाला अन्... परीक्षेसाठी आलेल्या तरुणाची पैशाच्या वादातून हत्या
12
सावधान! कोरोना हातपाय पसरतोय, देशभरात ६०००हून अधिक रुग्ण; २४ तासांत 'इतक्या' लोकांचा मृत्यू
13
मोदी सरकारने करून दाखवले! ११ वर्षांत भारतातील गरिबी किती घटली? आकडेवारीच समोर आली
14
“कार्यकर्त्यांच्या मनातला निर्णय होईल”; दोन्ही NCP एकत्र येण्यावर सुप्रिया सुळेंचे विधान
15
Viral : मेहुणीला बघून कंट्रोल सुटला, भर स्टेजवरच नवरदेवाने ताल धरला! व्हिडीओ होतोय व्हायरल
16
MS Dhoni च्या गॅरेजमध्ये 100 हून अधिक लक्झरी बाईक्स; किंमत ऐकून बसेल धक्का..!
17
मणिपूरमध्ये पुन्हा गोंधळ! निदर्शकांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला, पोलिसांशी हिंसक संघर्ष
18
“राहुल गांधी असामान्य नेते, भाजपा, मोदींना खोटे बोलण्याचा नोबेल पुरस्कार द्यावा”: संजय राऊत
19
भारत-इंग्लंड कसोटी आधी तेंडुलकर-अँडरसनमुळे वातावरण तापलं! ECB अन् BCCI असा काढणार तोडगा?
20
२३ पानांचं प्रेमपत्र लिहीत पुतण्यानं उचललं टोकाचं पाऊल! म्हणाला "काका आय लव्ह यु, मी तुमच्याशिवाय..."

मणिपूरमध्ये पुन्हा गोंधळ! निदर्शकांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला, पोलिसांशी हिंसक संघर्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2025 13:49 IST

मणिपूरच्या खोऱ्यातील जिल्ह्यांमध्ये मीतेई संघटनेच्या नेत्यासह अनेक जणांना अटक केल्यानंतर हिंसाचार उसळला.

मणिपूरमध्ये पुन्हा एकदा हिंसाचार उफाळून आला आहे. शनिवारी अनेक जिल्ह्यांमध्ये हिंसाचार उसळला, त्यानंतर प्रशासनाने बिष्णुपूर जिल्ह्यात कर्फ्यू लागू केला आणि पाच जिल्ह्यांमध्ये इंटरनेटवर बंदी घातली.

शनिवारी रात्री मेतेई संघटनेच्या नेत्या अरामबाई टेंगोल आणि इतर अनेक नेत्यांना पोलिसांनी अटक केल्यानंतर हिंसाचार सुरू झाला. निदर्शकांनी रस्त्यांवर आग लावली, बसेस जाळल्या, मालमत्तेची तोडफोड केली. त्यानंतर हिंसक संघर्ष सुरू झाला.

मोदी सरकारने करून दाखवले! ११ वर्षांत भारतातील गरिबी किती घटली? आकडेवारीच समोर आली

आंदोलकांनी प्रशासनाला स्वतःवर पेट्रोल ओतून आत्मदहन करण्याची धमकी दिली. याचा एक व्हिडिओही समोर आला आहे, यामध्ये अनेक आंदोलक उभे राहून स्वतःवर पेट्रोल ओतत असल्याचे दिसत आहे.

शनिवारी रात्री उशिरा अरंबाई टेंगगोल यांना अटक केल्यानंतर इम्फाळ पूर्व आणि पश्चिम जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात निदर्शने झाली. त्यानंतर, राजधानी इम्फाळच्या अनेक भागात निदर्शकांचे पोलिसांशी संघर्ष झाला. इम्फाळच्या खुराई लामलोंग भागात, निदर्शकांच्या संतप्त जमावाने बस जाळल्या, टायर जाळून रस्ते अडवले आणि सुरक्षा दलांशी संघर्ष केला.

निदर्शक इथेच थांबले नाहीत तर ते इंफाळ विमानतळाच्या तुलिहाल गेटबाहेर जमले. निदर्शकांनी रात्री विमानतळ रस्त्यावरील वाहतूक रोखली त्यांनी तिथेच रात्र काढली. 

राजधानीत वाढत्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी बळाचा वापर केला आणि अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. यादरम्यान, लाठीचार्जमध्ये जखमी झालेल्या एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर, बिष्णुपूर जिल्ह्यात संपूर्ण संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तर इंफाळ पूर्व, इंफाळ पश्चिम, थौबल आणि काकचिंगमध्ये पाचपेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास बंदी घालण्यात आली आहे. 

टॅग्स :Manipur Violenceमणिपूर हिंसाचार