'मानवी इतिहासाचा मार्ग बदलला', पंतप्रधान मोदींनी राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2025 09:10 IST2025-10-02T09:05:45+5:302025-10-02T09:10:17+5:30

"गांधी जयंती हा प्रिय बापूंच्या असाधारण जीवनाला श्रद्धांजली वाहण्याचा दिवस आहे. त्यांच्या आदर्शांनी मानवी इतिहासाचा मार्ग बदलला. धैर्य आणि साधेपणा कसा मोठा बदल घडवून आणू शकतो हे त्यांनी दाखवून दिले,असे मोदींनी लिहिले आहे.

Changed the course of human history, PM Modi pays tribute to Mahatma Gandhi at Rajghat | 'मानवी इतिहासाचा मार्ग बदलला', पंतप्रधान मोदींनी राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली

'मानवी इतिहासाचा मार्ग बदलला', पंतप्रधान मोदींनी राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली

महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी राजघाट येथे त्यांना आदरांजली वाहिली. त्यांनी विजय घाटालाही भेट दिली, तिथे त्यांनी माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांना पुष्पांजली अर्पण केली. 'महात्मा गांधींच्या आदर्शांनी मानवी इतिहासाचा मार्ग बदलला', असे पीएम मोदी म्हणाले.

"गांधी जयंती हा आपल्या प्रिय बापूंच्या असाधारण जीवनाला श्रद्धांजली वाहण्याचा दिवस आहे. त्यांच्या आदर्शांनी मानवी इतिहासाचा मार्ग बदलला. त्यांनी दाखवून दिले की धैर्य आणि साधेपणा कसा मोठा बदल घडवून आणू शकतो. त्यांनी सेवा आणि करुणा हे लोकांना सक्षम बनवण्याचे सर्वात मोठे साधन मानले. विकसित भारताच्या उभारणीच्या आमच्या कामात आम्ही त्यांच्या मार्गाचे अनुसरण करू", असे पंतप्रधान मोदींनी सोशल मिडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर लिहिले.

भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन

आज विशेष कार्यक्रमांचे आयोजन

२ ऑक्टोबर रोजी, महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त, सरकार १,००,००० आदिवासीबहुल गावांमध्ये विशेष ग्रामसभा आयोजित करेल. या गावांमध्ये, समुदाय आदि सेवा पर्वाचा भाग म्हणून आदिवासी गाव व्हिजन २०३० औपचारिकपणे स्वीकारतील, अशी माहिती आदिवासी व्यवहार मंत्रालयाने बुधवारी दिली.

केंद्रीय आदिवासी व्यवहार मंत्री जुएल ओराम म्हणाले, "प्रत्येक गावात आदिवासी गाव व्हिजन २०३० घोषणापत्र मंजूर केल्याने समुदायांना त्यांच्या स्वतःच्या विकासाचे सह-निर्माते बनण्यास सक्षम बनते. हा उपक्रम २०४७ पर्यंत विकसित भारताच्या दिशेने एक निर्णायक पाऊल आहे." 

१७ सप्टेंबर रोजी सुरू झालेला आणि २ ऑक्टोबर रोजी संपणारा आदि सेवा पर्व हा आदि कर्मयोगी अभियानाचा एक भाग आहे. पंतप्रधान मोदींनी १७ सप्टेंबर रोजी मध्य प्रदेशातील धार येथे या मोहिमेची सुरुवात केली.
 

Web Title : पीएम मोदी ने गांधी को श्रद्धांजलि दी, आदर्शों ने मानव इतिहास बदला

Web Summary : गांधी जयंती पर पीएम मोदी ने राजघाट पर महात्मा गांधी और विजय घाट पर लाल बहादुर शास्त्री को श्रद्धांजलि दी। उन्होंने कहा कि गांधी के आदर्शों ने मानव इतिहास को बदल दिया, सेवा और करुणा की वकालत की। आदिवासी गांवों में आदिवासी गांव विजन 2030 अपनाने के लिए विशेष ग्राम सभाएं आयोजित की जाएंगी।

Web Title : PM Modi Pays Tribute to Gandhi, Ideals Changed Human History

Web Summary : On Gandhi Jayanti, PM Modi honored Mahatma Gandhi at Rajghat and Lal Bahadur Shastri at Vijay Ghat. He stated Gandhi's ideals changed human history, advocating service and compassion. Special Gram Sabhas will be held in tribal villages to adopt Adivasi Gaon Vision 2030.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.