शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

Chandrayaan-3 :भारताकडे आहे चंद्राचा एक दुर्मीळ तुकडा, कडेकोट सुरक्षेत इथे ठेवलाय जपून

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2023 15:40 IST

Chandrayaan-3: भारताने चंद्रावर पाठवलेलं चांद्रयान-३ आज चंद्रावर उतरणार आहे. आज संध्याकाळी सहा वाजता चांद्रयान-३ मधील विक्रम लँडर चंद्राच्या पृष्टभागावर उतरण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यामुळे सगळ्या देशवासियांच्या नजरा आता चंद्राकडे वळलेल्या आहेत.

भारताने चंद्रावर पाठवलेलं चांद्रयान-३ आज चंद्रावर उतरणार आहे. आज संध्याकाळी सहा वाजता चांद्रयान-३ मधील विक्रम लँडर चंद्राच्या पृष्टभागावर उतरण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यामुळे सगळ्या देशवासियांच्या नजरा आता चंद्राकडे वळलेल्या आहेत. चंद्रावर पहिलं पाऊल हे अमेरिकेच्या नासा या संशोधन संस्थेचे अंतराळवीर नील आर्मस्ट्राँग यांनी ठेवलं होतं हे सर्वांनाच माहिती आहे. मात्र नील आर्मस्ट्राँग आणि त्यांचे सहकारी एडविन एल्ड्रिच यांनी चंद्रावरून परत येताना तिथल्या दगड मातीचे काही नमुने पृथ्वीवर आणले होते, हे फारच थोड्या लोकांना माहिती असेल. नासाने अभ्यास करण्यासाठी यामधील दगडांचे काही नमुने जगातील विविध देशांना दिले आहेत. यामधील एक तुकडा भारतालाही देण्यात आला होता. 

चंद्रावरून आणलेल्या दगडांमधील एका दगडाचा हा तुकडा मुंबईमधील टाटा इन्स्टिट्युट ऑफ फंडामेंटल रिसर्च (TIFR) येथे सुरक्षित ठेवण्यात आला आहे. तेव्हापासून या तुकड्यावर अनेक शास्त्रज्ञांनी संशोधन केलं आहे. मुंबईमधील नेहरू तारांगणाचे माजी संचालक व्ही. एस. वेंकटवर्धन यांनी सांगितले की, अपोलो-११ मोहिमेवेळी आणलेल्या नमुन्यांमधील सुमारे १०० ग्रॅम नमुने भारताला मिळाले होते. चंद्राच्या या तुकड्याच्या मदतीने हाय एनर्जीच्या क्षेत्राचा अभ्यास करण्याचं आमचं लक्ष्य होतं. आजही अहमदाबादमधील फिजिकल रिसर्च लॅबमध्ये चंद्राचा एक तुकडा ठेवलेला आहे. मात्र भारताने अमेरिकेकडून मिळालेल्या नमुन्यांपैकी एक तृतियांश नमुने नासाला आधीच परत करण्यात आले आहेत.

पीआरएलचे माजी संचालक जे. एन. गोस्वामी यांनी सांगितले की, चंद्राच्या या तुकड्याला कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत काचेच्या एका कपाटामध्ये सांभाळून ठेवलं जातं. हा तुकडा एका जारमध्ये बंद करून ठेवलेला आहे. त्यावर अधिक चांगलं संशोधन करता यावं म्हणून तो टीआयएफआरमधून इथे आणण्यात आला आहे. गोस्वामी हे भारताची पहिली चंद्र मोहीम असलेल्या चंद्रयान-१ मधील एक संशोधक आहेत.

सर्वसाधारणपणे संशोधनासाठी चंद्राचे जे नमुने नासाकडून घेतले जातात. ते एका ठराविक काळानंतर परत करावे लागतात. मात्र नासाने हा नमुने ठेवून घेण्यासाठी भारताला परवानगी दिली आहे. मात्र त्यासाठी नासाच्या काही कठोर नियमांचं पालन करावं लागतं. कुठलाही संशोधक थेट या नमुन्याला हात लावू शकत नाही. हा नमुना सुरक्षितपणे सांभाळून ठेवण्यात आला आहे. तसेच हा तुकडा ठेवण्यासाठी दर तीन वर्षांनी नासाकडून परवानगी घ्यावी लागते. स्पष्ट शब्दात सांगायचं तर दर तीन वर्षांनी नासाकडून हा नमुना ठेवून घेण्यासाठीच्या परवान्याचं नुतनीकरण करून घ्यावं लागतं. आज भारत चांद्रयान-३ च्या माध्यमातून चंद्रावर उतरणार असेल, तर त्यामध्ये चंद्राच्या या तुकड्याचाही वाटा आहे.  

टॅग्स :Chandrayaan-3चंद्रयान-3Indiaभारतisroइस्रोNASAनासाscienceविज्ञान