शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! निवडणूक आयोग EVM मशीनला 'पाडू' नावाचे नवीन डिव्हाइस जोडणार; राज ठाकरेंच्या आरोपाने नव्या वादाला फोडणी
2
“राहुल गांधींची प्रभू श्रीरामांवर श्रद्धा, आता अयोध्येला जाणार”; काँग्रेस नेते म्हणाले…
3
जितेंद्र यांनी प्रॉपर्टी मार्केटमध्ये उडवली खळबळ; जपानी कंपनीसोबत ५५९.२५ कोटी रुपयांचा करार, नक्की प्रकरण काय?
4
राज्यातील 'या' शहरात नव्या मतदारांचा विस्फोट! ४४ टक्के एवढे प्रचंड संख्येने मतदार वाढले, फटका कोणाला? 
5
प्रशासकराजपूर्वी २९ पैकी किती महापालिकांत भाजपची सत्ता होती? समोर आली मोठी आकडेवारी...
6
ट्रम्प यांचा नवा 'रिअल इस्टेट' प्लॅन फसला! ग्रीनलँड विकत घेण्याच्या ऑफरला पंतप्रधानांचे सडेतोड उत्तर; म्हणाले...
7
पगारदारांनो लक्ष द्या! तुमच्या पीएफ खात्यावर मिळतोय ७ लाखांचा मोफत विमा; असा करा क्लेम
8
नोकरी सोडून शेतीची धरली कास! १३ लाखांच्या कर्जात बुडलेला तरुण आता कमावतोय वार्षिक २ कोटी
9
राधिका आपटेने बंडच पुकारलं! कामाच्या तासांवरुन निर्मात्यांसमोर ठेवल्या अटी, म्हणाली...
10
अत्यंत हलाखीची परिस्थिती, पत्र्याचं घर अन् गंभीर आजाराचा सामना; जालन्याचा काळू डॉन म्हणाला- "दर महिन्याला रक्त बदलावं लागतं..."
11
मुंबई १ नंबर, पुणे २...! राज्यातील तिसरे सर्वात मोठे शहर कोणते? ९९ टक्के लोक चुकणार हमखास...
12
आता चांदी ₹3 लाखच्या जवळ...! MCX वर 10800 रुपयांनी वधारला भाव; गुंतवणूकदारांना करतेय मालामाल
13
वंदे भारत, तेजस, शताब्दी की गतिमान; तिकीट दर वाढल्यावर कोणत्या ट्रेनचा प्रवास स्वस्त?
14
Thailand Train Accident: थायलंडमध्ये चालत्या ट्रेनवर कोसळली अवाढव्य क्रेन; २२ प्रवाशांचा मृत्यू, चिनी बनावटीचा हायस्पीड रेल्वे प्रकल्प वादाच्या भोवऱ्यात
15
८० वर्षांच्या डॉक्टरची १५ कोटींची फसवणूक! १७ दिवस 'डिजिटल अरेस्ट', ७०० बँक खात्यांत पैसा
16
भाजपाचे ज्येष्ठ नेते रविशंकर प्रसाद यांच्या निवासस्थानाला आग, अग्निशमन दलाची घटनास्थळी धाव
17
एका शेअरवर ५७ रुपयांचा डिविडंड देणार TATA समूहाची 'ही' कंपनी; रेकॉर्ड डेट जवळ, तुमच्याकडे आहे का?
18
नातूच झाला काळ! स्वतःच्या हाताने संपवलं आजी-आजोबांचं आयुष्य; आजीच्या एका खुणेने पकडला गेला
19
पंतप्रधान कार्यालयाला तक्रार, पत्र पाठवायचेय? आजपासून पत्ता बदलला, संक्रांतीच्या मुहूर्तावर नव्या जागेत स्थलांतर...
Daily Top 2Weekly Top 5

Chandrayaan-3 :भारताकडे आहे चंद्राचा एक दुर्मीळ तुकडा, कडेकोट सुरक्षेत इथे ठेवलाय जपून

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2023 15:40 IST

Chandrayaan-3: भारताने चंद्रावर पाठवलेलं चांद्रयान-३ आज चंद्रावर उतरणार आहे. आज संध्याकाळी सहा वाजता चांद्रयान-३ मधील विक्रम लँडर चंद्राच्या पृष्टभागावर उतरण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यामुळे सगळ्या देशवासियांच्या नजरा आता चंद्राकडे वळलेल्या आहेत.

भारताने चंद्रावर पाठवलेलं चांद्रयान-३ आज चंद्रावर उतरणार आहे. आज संध्याकाळी सहा वाजता चांद्रयान-३ मधील विक्रम लँडर चंद्राच्या पृष्टभागावर उतरण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यामुळे सगळ्या देशवासियांच्या नजरा आता चंद्राकडे वळलेल्या आहेत. चंद्रावर पहिलं पाऊल हे अमेरिकेच्या नासा या संशोधन संस्थेचे अंतराळवीर नील आर्मस्ट्राँग यांनी ठेवलं होतं हे सर्वांनाच माहिती आहे. मात्र नील आर्मस्ट्राँग आणि त्यांचे सहकारी एडविन एल्ड्रिच यांनी चंद्रावरून परत येताना तिथल्या दगड मातीचे काही नमुने पृथ्वीवर आणले होते, हे फारच थोड्या लोकांना माहिती असेल. नासाने अभ्यास करण्यासाठी यामधील दगडांचे काही नमुने जगातील विविध देशांना दिले आहेत. यामधील एक तुकडा भारतालाही देण्यात आला होता. 

चंद्रावरून आणलेल्या दगडांमधील एका दगडाचा हा तुकडा मुंबईमधील टाटा इन्स्टिट्युट ऑफ फंडामेंटल रिसर्च (TIFR) येथे सुरक्षित ठेवण्यात आला आहे. तेव्हापासून या तुकड्यावर अनेक शास्त्रज्ञांनी संशोधन केलं आहे. मुंबईमधील नेहरू तारांगणाचे माजी संचालक व्ही. एस. वेंकटवर्धन यांनी सांगितले की, अपोलो-११ मोहिमेवेळी आणलेल्या नमुन्यांमधील सुमारे १०० ग्रॅम नमुने भारताला मिळाले होते. चंद्राच्या या तुकड्याच्या मदतीने हाय एनर्जीच्या क्षेत्राचा अभ्यास करण्याचं आमचं लक्ष्य होतं. आजही अहमदाबादमधील फिजिकल रिसर्च लॅबमध्ये चंद्राचा एक तुकडा ठेवलेला आहे. मात्र भारताने अमेरिकेकडून मिळालेल्या नमुन्यांपैकी एक तृतियांश नमुने नासाला आधीच परत करण्यात आले आहेत.

पीआरएलचे माजी संचालक जे. एन. गोस्वामी यांनी सांगितले की, चंद्राच्या या तुकड्याला कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत काचेच्या एका कपाटामध्ये सांभाळून ठेवलं जातं. हा तुकडा एका जारमध्ये बंद करून ठेवलेला आहे. त्यावर अधिक चांगलं संशोधन करता यावं म्हणून तो टीआयएफआरमधून इथे आणण्यात आला आहे. गोस्वामी हे भारताची पहिली चंद्र मोहीम असलेल्या चंद्रयान-१ मधील एक संशोधक आहेत.

सर्वसाधारणपणे संशोधनासाठी चंद्राचे जे नमुने नासाकडून घेतले जातात. ते एका ठराविक काळानंतर परत करावे लागतात. मात्र नासाने हा नमुने ठेवून घेण्यासाठी भारताला परवानगी दिली आहे. मात्र त्यासाठी नासाच्या काही कठोर नियमांचं पालन करावं लागतं. कुठलाही संशोधक थेट या नमुन्याला हात लावू शकत नाही. हा नमुना सुरक्षितपणे सांभाळून ठेवण्यात आला आहे. तसेच हा तुकडा ठेवण्यासाठी दर तीन वर्षांनी नासाकडून परवानगी घ्यावी लागते. स्पष्ट शब्दात सांगायचं तर दर तीन वर्षांनी नासाकडून हा नमुना ठेवून घेण्यासाठीच्या परवान्याचं नुतनीकरण करून घ्यावं लागतं. आज भारत चांद्रयान-३ च्या माध्यमातून चंद्रावर उतरणार असेल, तर त्यामध्ये चंद्राच्या या तुकड्याचाही वाटा आहे.  

टॅग्स :Chandrayaan-3चंद्रयान-3Indiaभारतisroइस्रोNASAनासाscienceविज्ञान