शहरं
Join us  
Trending Stories
1
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
2
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
3
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
4
अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्टफोन, वाढणार मानधन; योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा
5
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
6
सुनेला वाचवण्यासाठी धावली सासू, पण तेवढ्यात धडाधड कोसळली भिंत, सून वाचली पण...  
7
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
8
सावधान! आयफोन १७च्या नावाखाली फसवणूक, सायबर गुन्हेगार 'असे' करतात खाते रिकामी
9
Sarva Pitru Amavasya 2025: सर्वपित्री अमावस्येला आहे सूर्यग्रहण; काळजीपूर्वक टाळा 'या' चुका!
10
बंगळुरुतील योग गुरुचा 8 महिलांवर अत्याचार; अल्पवयीन पीडितेने दाखवले धाडस, पोलिसांनी आवळल्या मुसक्या
11
३० पैशांवरुन २४ रुपयांवर आला 'हा' शेअर; १ लाखाचे केले ८ कोटी, गुंतवणूकदार मालामाल
12
GST कपातीनंतर Maruti ची मोठी घोषणा! S-Presso ₹ 3.50 लाखात तर Wagon R फक्त...
13
Surya Grahan 2025: ग्रहण सूर्याला मात्र 'या' राशींचे भाग्य येईल फळाला; १०० वर्षांनी जुळून आलाय अपूर्व योग!
14
पेन्शनधारकांसाठी गुड न्यूज! १ ऑक्टोबरपासून NPS चे नियम बदलणार, तरुणांना सर्वाधिक फायदा
15
पोहे आणि उपमा नेहमीच खातो पण त्याचे फायदे माहितीहेत का, दोघांपैकी आरोग्यासाठी बेस्ट काय?
16
पितृपक्ष २०२५ शिवरात्री: व्रतात ‘हे’ मंत्र म्हणा, महादेव प्रसन्न होतील, पूर्वज वरदान देतील!
17
Gold Silver Price 18 September: अचानक का कमी होताहेत सोन्या-चांदीचे दर; पुढेही सुरू राहणार का ही घसरण?
18
ऑनलाइन पद्धतीने मतदाराचे नाव मतदार यादीतून हटवता येते का? निवडणूक आयोग म्हणाले...
19
११ वर्षांनी लहान मुलाच्या प्रेमात पडली २८ वर्षांची तरुणी; लग्नाला नकार मिळाल्यावर मागू लागली ५० लाख!
20
Navi Mumbai: 'कपडे काढ नाहीतर तुझ्या भावालाच संपवेन'; 12 वर्षाच्या मुलीवर घरी नेऊन केला बलात्कार, नवी मुंबईतील घटना

Chandrayaan-2: 'जय किसान, जय विज्ञान'... चांद्रयान-२ मोहिमेत शेतकरी पुत्राची मोलाची कामगिरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2019 17:33 IST

चंद्रकांता इस्त्रोमध्ये वरिष्ठ शास्त्रज्ञ आहेत. त्यांच्याकडे चांद्रयान-2 मोहिमेची जबाबदारी आहे. 

नवी दिल्ली : संपूर्ण भारतीयांसह जगाचे लक्ष लागलेल्या चांद्रयान-2 चे प्रक्षेपण सोमवारी यशस्वी झाले. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (इस्रो) चांद्रयान-2 आज दुपारी 2.43 मिनिटांनी चंद्राच्या दिशेने यशस्वी झेपावले. त्यानंतर इस्त्रोच्या शास्त्रज्ञांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आणि आनंद साजरा केला. दरम्यान, या शास्त्रज्ञांच्या टीममध्ये पश्चिम बंगालमधील  शिबपूर गावातील मधुसूदन कुमार या शेतकऱ्याचा एक मुलगा आहे. चंद्रकांता असे या शेतकऱ्याच्या मुलाचे नाव आहे. चंद्रकांता इस्त्रोमध्ये वरिष्ठ शास्त्रज्ञ आहेत. त्यांच्याकडे चांद्रयान-2 मोहिमेची जबाबदारी आहे. 

मधुसूदन कुमार यांनी एका वृत्तवाहिनीला सांगितले की, 'ज्यावेळी मिशन स्थगित करण्यात आले, त्यावेळी आम्ही दु:खी होतो. मात्र, आम्ही भारताच्या सर्वात कठीण चंद्र मिशनच्या लाँचिगसाठी तयार आहोत. आम्हाला खूप अभिमान आहे की, आमचा मुलगा त्या टीमचा एक हिस्सा आहे.' याचबरोबर, शेतातील कामात व्यस्त असल्यामुळे मला चंद्रकांता यांच्याकडे शिक्षणासाठी वेळ द्यायला मिळाला नाही. चंद्रकांता यांना त्यांच्या शिक्षकांनी मार्गदर्शन केले. चंद्रकांता नेहमी मेहनत करत होते. 2001 मध्ये इस्त्रोमध्ये रुजू झाले. त्यानंतर मेहनतीच्या जोरावर त्यांना महत्वपूर्ण अशा मिशनचे प्रमुख बनविण्यात आले, असे चंद्रकांता यांचे वडील मधुसूदन कुमार यांनी सांगितले. 

दरम्यान, चंद्रकांता यांचे लहान भाऊ सुद्धा शास्त्रज्ञ आहेत. त्यांचे नाव चंद्रावरुन शशिकांत ठेवले आहे. तर, चंद्रकांता यांचे नाव त्यांचे कुटुंबीय सूर्यकांत असे ठेवणार होते. मात्र, शाळेतील शिक्षकांनी त्यांना चंद्रकात ठेवायला सांगितले. 

चंद्रकांता यांच्याकडील इस्त्रोची जबाबदारीचंद्रकांता यांनी भारतीय उपग्रह आणि ग्राऊंड स्टेशनांसाठी एंटिना स्टिस्टम डिझाईन केली आहे. त्यांनी चांद्रयान -1, GSAT-12 आणि ASTROSAT साठी प्रोजेक्ट मॅनेजर, एंटिना सिस्टमसाठी काम केले. सध्या ते त्याठिकाणी डेप्युटी प्रोजेक्ट डायरेक्टर आहे. त्यामुळे त्यांच्याकडे चांद्रयान-2 ची आरएफ सिस्टमची जबाबदारी आहे. यूआर राव सॅटेलाईट सेंटरचे 'इलेक्ट्रोमॅग्नेटिक्स' विभागाचे प्रमुख आहेत.

'चांद्रयान-2' चं उड्डाण यशस्वी 

श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतरिक्ष केंद्रातून 'बाहुबली' रॉकेटच्या मदतीने चांद्रयान-2 यानाने  दुपारी 2 वाजून 43 मिनिटांनी यशस्वी उड्डाण केले. हे उड्डाण पाहण्यासाठी देशभरातून हजारो लोक आले होते. ‘चांद्रयान-2’ ला चंद्राच्या दक्षिण ध्रुवार्यंत पोहोचण्यास 48 दिवसांचा कालावधी लागणार आहे. 

 

पृथ्वीच्या चारी बाजूने अंडाकार चक्करमध्ये बदल, एपोजीमध्ये 60.4 किमीचे अंतर22 जुलै : ‘चांद्रयान-2’च्या प्रक्षेपणानंतर पृथ्वीच्या चारी बाजूने अंडाकार कक्षात घिरट्या घालेल. याचा पेरिजी (पृथ्वीपासून कमी अंतर) 170 किमी आणि एपोजी (पृथ्वीपासून जास्त अंतर) 39120 किमी असणार आहे. 15 जुलै : ‘चांद्रयान-2’ जर लाँच झाले असते तर याचा पेरिजी 170.06 किमी आणि एपोजी 39059.60 किमी होणार होता. म्हणजेच एपोजीमध्ये 60.4 किमी अंतर आणले असते. तसेच, पृथ्वीच्या चारी बाजूने घालणाऱ्या घिरट्या कमी केल्या असत्या. 

चंद्रावर पोहोचण्याच्या कालावधीत 6 दिवसांनी कमी  ‘चांद्रयान-2’ जर 15 जुलै रोजी यशस्वी प्रक्षेपण झाले झाले असते तर 6 सप्टेंबरला चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरले असते. मात्र. आज 22 जुलै रोजी प्रक्षेपण केल्यानंतर ‘चांद्रयान-2’ ला चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचण्यासाठी 48 दिवसांचा कालावधी लागणार आहे. म्हणजेच, ‘चांद्रयान-2’ हे 6 सप्टेंबरलाच चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणार आहे. ‘चांद्रयान-2’ आता पृथ्वीच्या चारी बाजूने 5 च्याऐवजी 4 घिरट्या घालणार आहे. 

वेलोसिटीमध्ये 1.12 मीटर प्रति सेकंद वाढ‘चांद्रयान-2’ चे आज प्रक्षेपण झाल्यानंतर चंद्रावर जास्त वेगात जाणार आहे. आता अंतराळात याचा वेग 10305.78  मीटर प्रति सेंकद असणार आहे. जर, 15 जुलैला प्रक्षेपण झाले असते तर याचा वेग 10,304.66 मीटर प्रति सेकंद असता. म्हणजेच, आज होणाऱ्या प्रक्षेपणात ‘चांद्रयान-2’ चा वेग 1.12 मीटर प्रति सेकंद वाढविण्यात आला आहे.

टॅग्स :Chandrayaan 2चांद्रयान-2isroइस्रो