शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
2
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
3
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
4
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
5
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
6
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
7
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
8
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
9
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
10
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
11
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
12
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
13
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
14
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
15
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
16
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
17
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
18
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
19
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक
20
एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते!; ठाकरे गटाचा दावा

Chandrayaan-2: 'जय किसान, जय विज्ञान'... चांद्रयान-२ मोहिमेत शेतकरी पुत्राची मोलाची कामगिरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2019 17:33 IST

चंद्रकांता इस्त्रोमध्ये वरिष्ठ शास्त्रज्ञ आहेत. त्यांच्याकडे चांद्रयान-2 मोहिमेची जबाबदारी आहे. 

नवी दिल्ली : संपूर्ण भारतीयांसह जगाचे लक्ष लागलेल्या चांद्रयान-2 चे प्रक्षेपण सोमवारी यशस्वी झाले. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (इस्रो) चांद्रयान-2 आज दुपारी 2.43 मिनिटांनी चंद्राच्या दिशेने यशस्वी झेपावले. त्यानंतर इस्त्रोच्या शास्त्रज्ञांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आणि आनंद साजरा केला. दरम्यान, या शास्त्रज्ञांच्या टीममध्ये पश्चिम बंगालमधील  शिबपूर गावातील मधुसूदन कुमार या शेतकऱ्याचा एक मुलगा आहे. चंद्रकांता असे या शेतकऱ्याच्या मुलाचे नाव आहे. चंद्रकांता इस्त्रोमध्ये वरिष्ठ शास्त्रज्ञ आहेत. त्यांच्याकडे चांद्रयान-2 मोहिमेची जबाबदारी आहे. 

मधुसूदन कुमार यांनी एका वृत्तवाहिनीला सांगितले की, 'ज्यावेळी मिशन स्थगित करण्यात आले, त्यावेळी आम्ही दु:खी होतो. मात्र, आम्ही भारताच्या सर्वात कठीण चंद्र मिशनच्या लाँचिगसाठी तयार आहोत. आम्हाला खूप अभिमान आहे की, आमचा मुलगा त्या टीमचा एक हिस्सा आहे.' याचबरोबर, शेतातील कामात व्यस्त असल्यामुळे मला चंद्रकांता यांच्याकडे शिक्षणासाठी वेळ द्यायला मिळाला नाही. चंद्रकांता यांना त्यांच्या शिक्षकांनी मार्गदर्शन केले. चंद्रकांता नेहमी मेहनत करत होते. 2001 मध्ये इस्त्रोमध्ये रुजू झाले. त्यानंतर मेहनतीच्या जोरावर त्यांना महत्वपूर्ण अशा मिशनचे प्रमुख बनविण्यात आले, असे चंद्रकांता यांचे वडील मधुसूदन कुमार यांनी सांगितले. 

दरम्यान, चंद्रकांता यांचे लहान भाऊ सुद्धा शास्त्रज्ञ आहेत. त्यांचे नाव चंद्रावरुन शशिकांत ठेवले आहे. तर, चंद्रकांता यांचे नाव त्यांचे कुटुंबीय सूर्यकांत असे ठेवणार होते. मात्र, शाळेतील शिक्षकांनी त्यांना चंद्रकात ठेवायला सांगितले. 

चंद्रकांता यांच्याकडील इस्त्रोची जबाबदारीचंद्रकांता यांनी भारतीय उपग्रह आणि ग्राऊंड स्टेशनांसाठी एंटिना स्टिस्टम डिझाईन केली आहे. त्यांनी चांद्रयान -1, GSAT-12 आणि ASTROSAT साठी प्रोजेक्ट मॅनेजर, एंटिना सिस्टमसाठी काम केले. सध्या ते त्याठिकाणी डेप्युटी प्रोजेक्ट डायरेक्टर आहे. त्यामुळे त्यांच्याकडे चांद्रयान-2 ची आरएफ सिस्टमची जबाबदारी आहे. यूआर राव सॅटेलाईट सेंटरचे 'इलेक्ट्रोमॅग्नेटिक्स' विभागाचे प्रमुख आहेत.

'चांद्रयान-2' चं उड्डाण यशस्वी 

श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतरिक्ष केंद्रातून 'बाहुबली' रॉकेटच्या मदतीने चांद्रयान-2 यानाने  दुपारी 2 वाजून 43 मिनिटांनी यशस्वी उड्डाण केले. हे उड्डाण पाहण्यासाठी देशभरातून हजारो लोक आले होते. ‘चांद्रयान-2’ ला चंद्राच्या दक्षिण ध्रुवार्यंत पोहोचण्यास 48 दिवसांचा कालावधी लागणार आहे. 

 

पृथ्वीच्या चारी बाजूने अंडाकार चक्करमध्ये बदल, एपोजीमध्ये 60.4 किमीचे अंतर22 जुलै : ‘चांद्रयान-2’च्या प्रक्षेपणानंतर पृथ्वीच्या चारी बाजूने अंडाकार कक्षात घिरट्या घालेल. याचा पेरिजी (पृथ्वीपासून कमी अंतर) 170 किमी आणि एपोजी (पृथ्वीपासून जास्त अंतर) 39120 किमी असणार आहे. 15 जुलै : ‘चांद्रयान-2’ जर लाँच झाले असते तर याचा पेरिजी 170.06 किमी आणि एपोजी 39059.60 किमी होणार होता. म्हणजेच एपोजीमध्ये 60.4 किमी अंतर आणले असते. तसेच, पृथ्वीच्या चारी बाजूने घालणाऱ्या घिरट्या कमी केल्या असत्या. 

चंद्रावर पोहोचण्याच्या कालावधीत 6 दिवसांनी कमी  ‘चांद्रयान-2’ जर 15 जुलै रोजी यशस्वी प्रक्षेपण झाले झाले असते तर 6 सप्टेंबरला चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरले असते. मात्र. आज 22 जुलै रोजी प्रक्षेपण केल्यानंतर ‘चांद्रयान-2’ ला चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचण्यासाठी 48 दिवसांचा कालावधी लागणार आहे. म्हणजेच, ‘चांद्रयान-2’ हे 6 सप्टेंबरलाच चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणार आहे. ‘चांद्रयान-2’ आता पृथ्वीच्या चारी बाजूने 5 च्याऐवजी 4 घिरट्या घालणार आहे. 

वेलोसिटीमध्ये 1.12 मीटर प्रति सेकंद वाढ‘चांद्रयान-2’ चे आज प्रक्षेपण झाल्यानंतर चंद्रावर जास्त वेगात जाणार आहे. आता अंतराळात याचा वेग 10305.78  मीटर प्रति सेंकद असणार आहे. जर, 15 जुलैला प्रक्षेपण झाले असते तर याचा वेग 10,304.66 मीटर प्रति सेकंद असता. म्हणजेच, आज होणाऱ्या प्रक्षेपणात ‘चांद्रयान-2’ चा वेग 1.12 मीटर प्रति सेकंद वाढविण्यात आला आहे.

टॅग्स :Chandrayaan 2चांद्रयान-2isroइस्रो