शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

तेलुगू देसम ; विरोधी पक्षांमध्ये बलवान होण्याची दुसरी वेळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2018 12:39 IST

गेल्या चार वर्षांमध्ये भाजपा आणि रालोआच्या बहुमतासमोर विरोधीपक्ष निष्प्रभ ठरले.

मुंबई: आंध्र प्रदेशाला विशेष दर्जा मिळण्यासाठी तेलुगू देसम पार्टीने लोकसभेत भाजपाला सळो की पळो करुन सोडले. त्यानंतर त्यांनी आपले दोन मंत्रीही केंद्रीय मंत्रिमंडळातून माघारी बोलावले. आता तर सत्ताधारी भाजपाप्रणित रालोआतून बाहेर पडून सरकारविरोधात अविश्वास ठराव आणण्याचीही तयारीही चालविली आहे.गेल्या चार वर्षांमध्ये भाजपा आणि रालोआच्या बहुमतासमोर विरोधीपक्ष निष्प्रभ ठरले. लोकसभेत दुसऱ्या क्रमांकाच्या जागा मिळवण्याचा मान काँग्रेसने कसाबसा मिळवला. त्यापाठोपाठ अण्णाद्रमुक, तृणमूल काँग्रेस यांचा नंबर लागतो. प्रबळ विरोधी पक्ष म्हणूनही काँग्रेसने या चार वर्षांमध्ये विशेष प्रयत्न केले नाहीत. विरोधी पक्षनेते पदाचा दर्जा न मिळाल्यामुळे काँग्रेसला लोकसभेत प्रभाव टाकता आला नाही. अधूनमधून येणाऱ्या मुद्द्यांवर काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, तेलगू देसम किंवा तेलंगण राष्ट्र समिती कधी स्वतंत्र किंवा कधी वेगवेगळे विरोध करत राहिले.  आता सरकारमध्ये असणारा घटक पक्ष बाहेर पडून सरकारविरोधात अविश्वासदर्शक ठराव आणत आहे. सरकारमधून बाहेर पडलेल्या पक्षाला मदत करण्याची किंवा त्यांच्या मागे जाण्याची वेळ काँग्रेससह इतर विरोधी पक्षांना आली आहे. तेलुगू देसमची लोकसभेत इतर विरोधी पक्षांपेक्षा संख्या कमी असूनही त्यांनी सरकारविरोधात उभं राहण्याचा निर्णय घेतला आहे. १९८४ साली काँग्रेसने लोकसभा निवडणुकांमध्ये एकतर्फी विजय मिळवत न भूतो न भविष्यती असं बहुमत प्राप्त केलं होतं. विरोधी पक्षांचे मोठेमोठे नेते या निवडणुकीमध्ये पराभूत झाले होते. भारतीय जनता पार्टीला केवळ २ जागांवर समाधान मानावे लागले. पण या निवडणुकीमध्ये तेलुगू देसम पक्षाने 30 जागा मिळवून लोकसभेत दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष होण्याचा मान मिळवला होता. एखाद्या प्रादेशिक पक्षाने राष्ट्रीय पक्षांपेक्षा अधिक जागा मिळवण्याची ही पहिलीच वेळ होती. विरोधीपक्ष नेतेपदाची जागा तेलुगू देसमला मिळाली नसली तरीही तेलुगू देसमचे पी. उपेंद्र यांनी विरोधीपक्ष नेतेपदाप्रमाणेच भूमिका बजावली होती. १९८४-१९८९ या पाच वर्षांसाठी पी. उपेंद्र यांना ही संधी मिळाली होती. तेलुगू देसम पक्षाचा लोकसभेतील ताकदीचा इतिहास अशाच विचित्र चढ-उतारांनी भरलेला आहे. १९८२ साली या पक्षाची स्थापना झाल्यावर पहिल्याच लोकसभेत त्यांना ३० जागा मिळाल्या. त्यानंतर १९८९ साली या पक्षाला केवळ २ जागा मिळाल्या. १९९१ मध्ये ११ जागा वाढून त्या १३ झाल्या. १९९६ साली त्यात आणखी तीनची वाढ होऊन ती १६ झाली. १९९८ च्या निवडणुकीत १२ जागांवर घसरलेल्या टीडीपीने १९९९मध्ये २९ जागा मिळवून रालोआ सरकारमध्ये महत्त्वाचं स्थान मिळवलं आणि सरकारमध्ये महत्त्वाची खातीही मिळवली. मात्र पुढच्याच निवडणुकीत रालोआ सरकारच्या घसरणीमध्ये या पक्षालाही मोठा फटका बसला. २००४ आणि २००९ या निवडणुकांमध्ये आंध्र प्रदेशात काँग्रेसने चांगली कामगिरी बजावली होती. त्यामुळे या दोन्ही निवडणुकांत तेलुगू देसमला अनुक्रमे ५ आणि ६ जागांवर समाधान मानावे लागले होते. २०१४ साली आंध्र प्रदेश राज्य विभाजनामुळे तयार झालेल्या प्रश्नामुळे काँग्रेसला जबरदस्त पराभव सहन करावा लागला. तेलंगणमध्ये तेलंगण राष्ट्र समिती तर अर्वरित आंध्र प्रदेशात तेलुगू देसम पक्ष प्रबळ झाला. तेलुगू देसमला १६ खासदार निवडून आणण्यात यश आले. याबळावर तेलुगू देसमने एक कॅबिनेट मंत्रिपद आणि एक राज्यमंत्रीपद केंद्रात मिळवले होते. आता सत्तेततून बाहेर पडूनही तेलुगू देसम आपली ताकद दाखवून देत आहे.

टॅग्स :Chandrababu Naiduचंद्राबाबू नायडूNo Confidence motionअविश्वास ठरावLoksabhaलोकसभा