शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिलीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
3
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
4
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
5
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
6
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
7
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
8
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
9
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
10
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
11
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
12
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
13
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
14
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
15
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
16
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
17
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
18
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
19
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
20
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
Daily Top 2Weekly Top 5

Maratha Reservation : केंद्राची फेरविचार याचिका न्यायालयाने फेटाळली

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2021 07:02 IST

मराठा आरक्षणाचे केंद्र सरकारलाच अधिकार

ठळक मुद्देआम्हाला फार काही तथ्य आढळले नाही

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत निर्णय घेण्याचा राज्य सरकारला अधिकार आहे अशी भूमिका मांडणारी केंद्र सरकारने केलेली फेरविचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी फेटाळून लावली. सामाजिक आणि आर्थिकृदृष्ट्या मागास असलेल्यांना आरक्षण देण्याचे अधिकार फक्त केंद्र सरकारलाच आहेत ही आपली भूमिका सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवली आहे.

राज्यघटनेमध्ये १०२व्या घटनादुरुस्तीद्वारे ३३८ बी या कलमाचा अंतर्भाव करण्यात आला होता. हे कलम राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे स्वरूप, कार्य व अधिकारांशी संबंधित आहे. तसेच ३४२ अ हे कलम एखाद्या विशिष्ट जातीला सामाजिक व आर्थिक दृष्ट्या मागासवर्गीय म्हणून घोषित करण्याबाबत राष्ट्रपतींना जे अधिकार आहेत त्याचे विवेचन करते. मराठा समाजाचे आरक्षण रद्द करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाने ५ मे रोजी दिलेल्या निकालाचा फेरविचार करण्यात यावा अशी याचिका केंद्राने दाखल केली होती.

पुन्हा तीच भूमिका

मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने केलेला कायदा सर्वोच्च न्यायालयाने ५ मे रोजी रद्द केला होता. राखीव जागांचे प्रमाण ५० टक्क्यांपेक्षा अधिक असता कामा नये हेच सूत्र सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवले होते. आता केंद्राची फेरविचार याचिका फेटाळून सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा तिच भूमिका घेतली आहे.

सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारच्या वतीने दाखल केलेली फेरविचार याचिका नाकारलेली आहे. याचा अर्थ असा की आता अधिकार केंद्र सरकारकडे आहे. योगायोगाने केंद्र सरकारचे लोकसभेचे अधिवेशन आहे तसेच राज्य सरकारचे देखील अधिवेशन आहे, यामध्ये राज्य सरकारने निर्णय करावा व केंद्राकडे पाठवून पाठपुरावा करावा. माझ्या वतीने व राज्य सरकारच्या वतीने करण्यात आलेल्या ‘रिव्ह्यू पिटीशन’चा निर्णय अद्याप बाकी आहे. यामध्ये ५० टक्क्यांची मर्यादा व मागास आयोगाचा अहवाल हा कसा खरा आहे हा निर्णय अपेक्षित आहे. - विनोद पाटील, याचिकाकर्ते

आम्हाला फार काही तथ्य आढळले नाही nही याचिका फेटाळून लावताना सर्वोच्च न्यायालयाचे न्या. अशोक भूषण यांच्या नेतृत्वाखालील पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाने म्हटले आहे की, केंद्र सरकारने सादर केलेल्या फेरविचार याचिकेमधील मुद्द्यांत आम्हाला फार काही तथ्य आढळले नाही. त्यामुळे ही याचिका फेटाळण्यात येत आहे. nमराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भातील फेरविचार याचिकेची खुली सुनावणी व्हावी ही केंद्र सरकारने केलेली मागणी देखील न्यायालयाने फेटाळून लावली. गुरुवारचा निर्णय देणाऱ्या खंडपीठात न्या. एल. नागेश्वर राव, न्या. एस. अब्दुल नझीर, न्या. हेमंत गुप्ता, न्या. एस. रवींद्र भट यांचा समावेश होता. या याचिकेची खंडपीठाने त्यांच्या चेंबरमध्ये २८ जूनपासून सुनावणी घेतली.

टॅग्स :marathaमराठाMaratha Reservationमराठा आरक्षणSupreme Courtसर्वोच्च न्यायालय