शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
6
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
7
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
8
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
9
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
10
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
11
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
12
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
13
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
14
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
15
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
16
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
17
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
18
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
19
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
20
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."

खासगी नोकरी करता? मग पुढच्या महिन्यापासून वाढणार तुमचा पगार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2019 11:55 IST

सरकारच्या निर्णयाचा खासगी नोकरदारांना होणार फायदा

ठळक मुद्देसरकारकडून ईएसआय नियमात बदल३ कोटी ६० लाख कर्मचाऱ्यांना होणार फायदाईएसआय कमी केल्यानं पगार वाढणार

मुंबई: खासगी नोकरी करणाऱ्यांचा पगार लवकरच वाढणार आहे. सरकारनं कर्मचारी राज्य विमाच्या अंतर्गत कापण्यात येणाऱ्या रकमेत कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. १ जुलै २०१९ पासून याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. त्यामुळे ऑगस्ट महिन्यापासून खासगी नोकरदारांचा पगार वाढेल. २१ हजारांपर्यंत पगार असणाऱ्यांना सरकारच्या निर्णयाचा फायदा होईल. कर्मचारी राज्य विमा (ईएसआय) कायद्यानुसार आतापर्यंत खासगी नोकरी करणाऱ्यांच्या पगारातून ६.५ टक्के इतकी रक्कम कापली जात होती. यातील १.७५ टक्के हिस्सा कर्मचाऱ्याचा आणि ४.७५ टक्के हिस्सा कंपनीचा होता. मात्र यापुढे कर्मचाऱ्याच्या पगारातून ४ टक्के इतकीच रक्कम कापली जाईल. यातील ०.७५ टक्के कर्मचाऱ्यांच्या पगारातून कापली जाईल. त्यामुळे कर्मचाऱ्यांचा पगार १ टक्क्यानं वाढेल. याचा अर्थ २१ हजार पगार असलेल्यांच्या पगारात २१० रुपयांनी वाढ होईल.सरकारच्या निर्णयाचा फायदा खासगी कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या ३ कोटी ६० लाखांपेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना होईल. याचा लाभ कंपन्यांनादेखील होणार आहे. आधी कंपन्यांना कर्मचाऱ्याच्या पगाराच्या ४.७५ टक्के इतकी रक्कम ईएसआयच्या अंतर्गत द्यावी लागायची. मात्र आता हे प्रमाण ३.२५ टक्क्यांवर आल्यानं कंपन्यांना दिलासा मिळाला आहे. २१ हजारापेक्षा कमी पगार असलेल्या आणि १० पेक्षा अधिक कर्मचारी संख्या असलेल्या कंपनीतील कर्मचाऱ्यांना ईएसआय लागू होतो.  

टॅग्स :Employeeकर्मचारी