शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
3
उद्धवसेना, शरद पवार गटाला खिंडार; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश
4
पालिकांमध्ये 'एक वॉर्ड-एक नगरसेवक' पद्धत लागू करा; मनसेची राज्य निवडणूक आयुक्तांकडे मागणी
5
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
6
सुवर्णयुगाचा अंत! 'देवदास' फेम बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, सिनेसृष्टीवर शोककळा
7
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
8
गणेश मंडळे दंड भरणार नाही, खड्यावर सरकारलाच दंड लावा
9
आलिशान कारमधून ३१ कोटींची ड्रग्ज तस्करी; ठाणे पालिकेचा लोगो लावून कारमधून सुरू होता कारभार
10
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार
11
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
12
आधार कार्ड, मतदार ओळखपत्र नागरिकत्वाचा पुरावा नाहीत! मतदार यादीतून वगळण्याचा अधिकार निवडणूक आयोगालाच
13
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
14
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
15
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
16
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
17
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
18
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
19
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
20
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं

वाहननिर्मिती क्षेत्राला केंद्राचे ‘इंधन’; उत्पादनवाढीसाठी २५,९३८ कोटी रुपयांचे प्रोत्साहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2021 05:32 IST

दूरसंचार क्षेत्रालाही दिलासा; ड्रोन उत्पादनवाढीसाठी १२० कोटी

लोकमत न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : कोरोना साथीच्या काळात मोठा फटका बसलेल्या देशातील वाहननिर्मिती उद्योगाला त्यातून सावरण्यासाठी केंद्र सरकारने प्रोत्साहन योजना राबविण्याचे ठरविले आहे. वाहन उत्पादनात वाढ व्हावी, यासाठी केंद्र सरकारने २८,९३८ कोटी रुपयांचे पॅकेज वाहननिर्मिती उद्योगांसाठी जाहीर केले आहे. तसेच दूरसंचार व ड्रोन कंपन्यांना दिलासा देणारे निर्णयही घेतले आहेत.

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत हे निर्णय घेण्यात आले. या प्रोत्साहन योजनेमुळे ७.५ लाख लोकांना रोजगार मिळेल, अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे. देशात इलेक्ट्रिक वाहनांच्या उत्पादनात वाढ होण्याकरिता या योजनेद्वारे प्रयत्न केले जातील.

केंद्रीय दूरसंचार खात्याचे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, दूरसंचार क्षेत्रामध्ये नऊ मोठ्या सुधारणा केल्या जाणार आहेत. समायोजित सकल महसूल (एजीआर)च्या संज्ञेत बदल केला जाणार आहे. एजीआरला बिगर दूरसंचार महसूलापासून वेगळे करण्यात येईल. एजीआरचा मुद्दा गेल्या काही महिन्यांपासून वादग्रस्त बनला आहे. यापुढे होणाऱ्या स्पेक्ट्रमच्या लिलावात यशस्वी बोली लावणाऱ्या कंपन्यांकडे ते स्पेक्ट्रम सुमारे तीस वर्षे राहणार आहे.

ड्रोन उत्पादनवाढीसाठी १२० कोटी

देशात ड्रोनचे उत्पादन वाढावे, यासाठी प्रोत्साहन योजनेनुसार या क्षेत्राकरिता केंद्र सरकारने १२० कोटी रुपये मंजूर केले आहेत. संरक्षणाच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या ड्रोनची आयात करण्यापेक्षा त्यांची स्वदेशातच निर्मिती करण्यावर केंद्र सरकारने भर दिला आहे.दूरसंचार क्षेत्रात १०० टक्के विदेशी गुंतवणुकीस परवानगी

- दूरसंचार क्षेत्रात ऑटोमेटिक रुटद्वारे १०० टक्के विदेशी गुंतवणूक करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाने परवानगी दिली आहे. 

- ते म्हणाले की, दूरसंचार क्षेत्राने कोणाला थकबाकी द्यायची असेल तर आता ती त्यांना चार वर्षे टाळता येऊ शकेल. 

- मात्र, या कालावधीचे व्याज दूरसंचार क्षेत्राला भरावे लागेल. हा निर्णय पूर्वलक्षी प्रभावाने नव्हे, तर आतापासून लागू होईल.

मोबाईलचे केवायसी फाॅर्म आता डिजिटल स्वरूपात

- मोबाईल कनेक्शनसाठी भरून घेण्यात येणारे केवायसी फॉर्म यापुढे डिजिटल स्वरुपात असतील. यापुढे कागदी फॉर्मचा वापर करण्यात येणार नाही. 

- आजवर भरलेले सुमारे ३०० ते ४०० कोटी केवायसीचे कागदी फॉर्म देशभरात विविध गोदामांमध्ये ठेवण्यात आले आहेत. त्या स्थितीकडे पाहूनच हा निर्णय घेण्यात आल्याचे केंद्रीय दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले.

टॅग्स :Central Governmentकेंद्र सरकारAutomobile Industryवाहन उद्योग